शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

गोव्यात चार महिन्यात ६७ जणांचा अपघाती मृत्यू, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने २९,३३८ जणांना ‘चलान’

By किशोर कुबल | Updated: September 26, 2023 20:45 IST

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी आरटीओने २९,३३८ जणांना ‘चलान’ दिले.

पणजी : गोव्यात अपघातांचे सत्र चालूच आहे. गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत राज्यात रस्ता अपघातांमध्ये ६७ जणांनी प्राण गमावले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी आरटीओने २९,३३८ जणांना ‘चलान’ दिले.

बाणस्तारीचा अपघात हा सर्वात भीषण अपघात होता. आरटीओकडून प्राप्त अधिकृत माहितीनुसार मे मध्ये लहान मोठ्या एकूण २६१  अपघातांची नोंद झाली.या महिन्यात अपघातांमध्ये एकूण १८ जण ठार झाले. १६  जण गंभीर जखमी झाले.  ९ चालक तर ७ पादचारी ठार झाले. वाहतूक नियम तोडल्या प्रकरणी ७३७ जणांना ‘चलान’ देण्यात आले..

जूनमध्ये वाहतूक नियम तोडल्या प्रकरणी ११,१८७ जणांना ‘चलान’ देण्यात आले. या महिन्यात रस्ता अपघातांमध्ये १७ जण ठार झाले. १८ जण गंभीर जखमी झाले. लहान मोठ्या एकूण २३१  अपघातांची नोंद झाली. अपघातांमध्ये ८ चालक ठार झाले तर मागे बसलेले चार व दोन पादचारी ठार झाले.

जुलैमध्ये लहान मोठ्या एकूण २०९  अपघातांची नोंद झाली. वाहतूक नियम उल्लंघनात ७२५१ जणांना ‘चलान’ देण्यात आले. अपघातांमध्ये २१ जण ठार झाले. १२ जण गंभीर जखमी झाले. १३ चालक ठार झाले तर मागे बसलेला एक व पाच पादचारी ठार झाले.

ॲागस्ट महिन्यात वाहतूक नियम उल्लंघनाबद्दल १०,१६३ वाहनचालकांना ‘चलान’ देण्यात आले. या महिन्यात रस्ता अपघातांमध्ये ११ जण ठार झाले. १७ जण गंभीर जखमी झाले. लहान मोठ्या एकूण २३२ अपघातांची नोंद झाली. अपघातांमध्ये ९ चालक ठार झाले तर मागे बसलेले दोघे व एक पादचारी ठार झाला. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिसAccidentअपघात