शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

बिहारमध्ये गावचा मुखियाच करायचा शिक्षक नियुक्ती! राज्यपाल राजेंद्र आर्लेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 09:36 IST

नितीशकुमार सरकार व्यवस्था बदलण्याच्या वाटेवर

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : बिहारमध्ये प्राथमिक शाळांत शिक्षकाची नियुक्ती गावचा सरपंच म्हणजेच मुखिया करतो. हा प्रकार पाहून मी स्तंभित झालो. आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा नियम बदलण्यास सुरुवात केली असून सरकार शिक्षण व्यवस्थेबाबत गंभीर झाल्याचे बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

राज्यपाल आर्लेकर यांनी 'लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. राज्यपाल म्हणाले, की हिमाचल प्रदेशमध्ये नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले जाते, तसे गोव्यातही द्यायला हवे. दोन लाख शेतकरी नैसर्गिक शेती करत आहेत. विदर्भातील सुरेश पालकर नॅचरल फार्मिंगचा उपक्रम तिथे चालू आहे. प्राकृतिक शेतीचा प्रयोग गोव्यातही व्हायला हवा.

अनेकदा बिहारमधील गावांना भेटी देण्याचा योग येतो. त्यावेळी एखाद्या गावातच मुक्काम करतात. त्यावेळी अधिकारी गैरसोयीविषयी सांगतात. त्यावर मी रात्री झोपायला सतरंजी असली तरी चालेल. ती नसेल तर मी राजभवनमधून आणतो, असे सांगून मुक्काम करतोच. शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतो व अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देशही देतो.

माफियांचा उच्छाद

उद्योगांबाबत बिहार अजून मागासलेला आहे. गोव्यात एका औद्योगिक वसाहतीत जेवढे उद्योग आहेत. तेवढे संपूर्ण बिहारात देखील नसतील, असे तेथील एका खासदारानेच आपल्याला सांगितल्याचे आर्लेकर म्हणाले. एकेकाळी साखर कारखान्यांनी समृध्द असलेल्या बिहारात आज चार साखर कारखाने शिल्लक राहिले आहेत. वाळू माफियांचा तेथे उच्छाद आहे. अन्य क्षेत्रांमध्येही माफिया आहेत, असे आर्लेकर म्हणाले.

हजेरीपटावर नाव, शाळेत मात्र गैरहजर

मुखियांनी नेमलेले काही शिक्षक अजून शाळांमध्ये आहेत. विशेष म्हणजे जो मुखिया शिक्षकाची नियुक्ती करतो, तो अनेकवेळा स्वतःच अशिक्षित असतो. हजेरीपटावर शिक्षकाचे नाव आहे, परंतु प्रत्यक्षात शाळेत शिक्षकच नाही, असे प्रकारही आढळत आहे. मात्र, यावर उपाय योजना करण्यात येत असल्याचे राज्यपाल आर्लेकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा