शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये गावचा मुखियाच करायचा शिक्षक नियुक्ती! राज्यपाल राजेंद्र आर्लेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 09:36 IST

नितीशकुमार सरकार व्यवस्था बदलण्याच्या वाटेवर

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : बिहारमध्ये प्राथमिक शाळांत शिक्षकाची नियुक्ती गावचा सरपंच म्हणजेच मुखिया करतो. हा प्रकार पाहून मी स्तंभित झालो. आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा नियम बदलण्यास सुरुवात केली असून सरकार शिक्षण व्यवस्थेबाबत गंभीर झाल्याचे बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

राज्यपाल आर्लेकर यांनी 'लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. राज्यपाल म्हणाले, की हिमाचल प्रदेशमध्ये नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले जाते, तसे गोव्यातही द्यायला हवे. दोन लाख शेतकरी नैसर्गिक शेती करत आहेत. विदर्भातील सुरेश पालकर नॅचरल फार्मिंगचा उपक्रम तिथे चालू आहे. प्राकृतिक शेतीचा प्रयोग गोव्यातही व्हायला हवा.

अनेकदा बिहारमधील गावांना भेटी देण्याचा योग येतो. त्यावेळी एखाद्या गावातच मुक्काम करतात. त्यावेळी अधिकारी गैरसोयीविषयी सांगतात. त्यावर मी रात्री झोपायला सतरंजी असली तरी चालेल. ती नसेल तर मी राजभवनमधून आणतो, असे सांगून मुक्काम करतोच. शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतो व अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देशही देतो.

माफियांचा उच्छाद

उद्योगांबाबत बिहार अजून मागासलेला आहे. गोव्यात एका औद्योगिक वसाहतीत जेवढे उद्योग आहेत. तेवढे संपूर्ण बिहारात देखील नसतील, असे तेथील एका खासदारानेच आपल्याला सांगितल्याचे आर्लेकर म्हणाले. एकेकाळी साखर कारखान्यांनी समृध्द असलेल्या बिहारात आज चार साखर कारखाने शिल्लक राहिले आहेत. वाळू माफियांचा तेथे उच्छाद आहे. अन्य क्षेत्रांमध्येही माफिया आहेत, असे आर्लेकर म्हणाले.

हजेरीपटावर नाव, शाळेत मात्र गैरहजर

मुखियांनी नेमलेले काही शिक्षक अजून शाळांमध्ये आहेत. विशेष म्हणजे जो मुखिया शिक्षकाची नियुक्ती करतो, तो अनेकवेळा स्वतःच अशिक्षित असतो. हजेरीपटावर शिक्षकाचे नाव आहे, परंतु प्रत्यक्षात शाळेत शिक्षकच नाही, असे प्रकारही आढळत आहे. मात्र, यावर उपाय योजना करण्यात येत असल्याचे राज्यपाल आर्लेकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा