शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्राकडे गेलो! विजय सरदेसाई, 'एनडीए'त जाण्याचा प्रश्नच नाही

By किशोर कुबल | Updated: June 9, 2023 11:06 IST

राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्रीय मंत्र्यांकडे कैफियत मांडावी लागल्याचे ते 'लोकमत'शी बोलताना म्हणाले. 

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क पणजी :गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावल्याने ते एनडीएमध्ये जाण्याच्या तर तयारीत नसावेत ना, असा होरा व्यक्त होत असतानाच सरदेसाई यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे.

राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्रीय मंत्र्यांकडे कैफियत मांडावी लागल्याचे ते 'लोकमत'शी बोलताना म्हणाले. यापूर्वीच्या सरकारमध्ये विजय सरदेसाई हे मंत्री होते. गोवा फॉरवर्डच्या तत्कालीन तिन्ही आमदारांना २०१७ च्या निवडणुकीनंतर पर्रीकर सरकारने मंत्रिमंडळात घेतले होते. परंतु जुलै २०१९ मध्ये बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधून फुटून आलेल्या दहा आमदारांना भाजप प्रवेश देऊन सरदेसाई व अन्य दोन मंत्र्यांना सावंत यांनी मंत्रिमंडळातून डच्चू दिला. त्यानंतरही काही काळ सरदेसाई यांनी एनडीएशी संबंध ठेवले होते. परंतु नंतर ते तोडले.

सरदेसाई म्हणाले की, माझी ही दिल्ली भेट राजकीय स्वरूपाची मुळीच नव्हती. लोकप्रतिनिधी या नात्याने मी लोकांचे प्रश्न घेऊन गेलो होतो. बरे, या समस्या केवळ माझ्या फातोर्डा मतदारसंघापुरत्या मर्यादितही नव्हत्या. सासष्टी तालुक्यातील तसेच भोम- करमळी बगलमार्गाचा विषयही मी मांडला. करमल घाटात झाडे वाचवण्यासाठी व्हायाडक्ट बांधणे आवश्यक आहे, याकडेही मी लक्ष वेधले. बाणावली राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील वेस्टर्न बगल मार्ग स्टिल्ट्सवर बांधण्यात यावा ज्यामुळे पर्यावरणाचे नुकसान टाळता येईल आणि वाहतूक सुरळीत होईल, हे मी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पटवून दिलेले आहे. स्टिल्टवर बांधकाम झाले नाही तर बाणावलीहून फातोर्ल्यापर्यंत पाणी येण्याचा धोका आहे. ५०० कोटी रुपये खर्चून दक्षिण जिल्हा इस्पितळ बांधले. आता ही इमारत खासगी मेडिकल कॉलेजसाठी खासगी कंपन्यांना लाटण्याचा घाट घातला जात आहे. लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टी केंद्रासमोर मांडाव्यात, असे मला वाटले.

जनताच त्यांना धडा शिकवणार

मी माझी वैयक्तिक कामे घेऊन गेलो नव्हतो. मी राज्याच्या समस्या मांडल्या आहेत. गडकरींनी मला यासंबंधी आश्वासन दिलेले आहे. गोव्यातील पायाभूत सुविधांबाबतच्या गंभीर समस्या मी त्यांच्या नजरेस आणून दिल्या. कोणी जर ही कामे अडवत असतील तर त्यांना जनताच धडा शिकवील. राज्य सरकार लोकांना त्रास देण्यासाठी आहे का, असा उलट सवाल सरदेसाई यांनी केला.

गडकरी, मांडविया यांची भेट

सरदेसाई यांचे केंद्रातील भाजप नेते, मंत्री यांच्याशी चांगले संबंध आहेत. काल ते नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना भेटले. गडकरींसारख्या केंद्रातील वजनदार भाजप नेत्याने सरदेसाई यांना अपॉइंटमेंट दिली. दोन दिवस सरदेसाई भाजप नेत्यांना भेटले. त्यामुळे ते पुन्हा एनडीएकडे सोयरीक करू पाहत आहेत का? अशी शक्यता राजकीय विश्लेषकही व्यक्त करीत आहेत. 'लोकमत' प्रतिनिधीशी बोलताना सरदेसाई यांनी तसे काही नसल्याचे सांगून विषयाला बगल दिली.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण