शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्राकडे गेलो! विजय सरदेसाई, 'एनडीए'त जाण्याचा प्रश्नच नाही

By किशोर कुबल | Updated: June 9, 2023 11:06 IST

राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्रीय मंत्र्यांकडे कैफियत मांडावी लागल्याचे ते 'लोकमत'शी बोलताना म्हणाले. 

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क पणजी :गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावल्याने ते एनडीएमध्ये जाण्याच्या तर तयारीत नसावेत ना, असा होरा व्यक्त होत असतानाच सरदेसाई यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे.

राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्रीय मंत्र्यांकडे कैफियत मांडावी लागल्याचे ते 'लोकमत'शी बोलताना म्हणाले. यापूर्वीच्या सरकारमध्ये विजय सरदेसाई हे मंत्री होते. गोवा फॉरवर्डच्या तत्कालीन तिन्ही आमदारांना २०१७ च्या निवडणुकीनंतर पर्रीकर सरकारने मंत्रिमंडळात घेतले होते. परंतु जुलै २०१९ मध्ये बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधून फुटून आलेल्या दहा आमदारांना भाजप प्रवेश देऊन सरदेसाई व अन्य दोन मंत्र्यांना सावंत यांनी मंत्रिमंडळातून डच्चू दिला. त्यानंतरही काही काळ सरदेसाई यांनी एनडीएशी संबंध ठेवले होते. परंतु नंतर ते तोडले.

सरदेसाई म्हणाले की, माझी ही दिल्ली भेट राजकीय स्वरूपाची मुळीच नव्हती. लोकप्रतिनिधी या नात्याने मी लोकांचे प्रश्न घेऊन गेलो होतो. बरे, या समस्या केवळ माझ्या फातोर्डा मतदारसंघापुरत्या मर्यादितही नव्हत्या. सासष्टी तालुक्यातील तसेच भोम- करमळी बगलमार्गाचा विषयही मी मांडला. करमल घाटात झाडे वाचवण्यासाठी व्हायाडक्ट बांधणे आवश्यक आहे, याकडेही मी लक्ष वेधले. बाणावली राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील वेस्टर्न बगल मार्ग स्टिल्ट्सवर बांधण्यात यावा ज्यामुळे पर्यावरणाचे नुकसान टाळता येईल आणि वाहतूक सुरळीत होईल, हे मी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पटवून दिलेले आहे. स्टिल्टवर बांधकाम झाले नाही तर बाणावलीहून फातोर्ल्यापर्यंत पाणी येण्याचा धोका आहे. ५०० कोटी रुपये खर्चून दक्षिण जिल्हा इस्पितळ बांधले. आता ही इमारत खासगी मेडिकल कॉलेजसाठी खासगी कंपन्यांना लाटण्याचा घाट घातला जात आहे. लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टी केंद्रासमोर मांडाव्यात, असे मला वाटले.

जनताच त्यांना धडा शिकवणार

मी माझी वैयक्तिक कामे घेऊन गेलो नव्हतो. मी राज्याच्या समस्या मांडल्या आहेत. गडकरींनी मला यासंबंधी आश्वासन दिलेले आहे. गोव्यातील पायाभूत सुविधांबाबतच्या गंभीर समस्या मी त्यांच्या नजरेस आणून दिल्या. कोणी जर ही कामे अडवत असतील तर त्यांना जनताच धडा शिकवील. राज्य सरकार लोकांना त्रास देण्यासाठी आहे का, असा उलट सवाल सरदेसाई यांनी केला.

गडकरी, मांडविया यांची भेट

सरदेसाई यांचे केंद्रातील भाजप नेते, मंत्री यांच्याशी चांगले संबंध आहेत. काल ते नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना भेटले. गडकरींसारख्या केंद्रातील वजनदार भाजप नेत्याने सरदेसाई यांना अपॉइंटमेंट दिली. दोन दिवस सरदेसाई भाजप नेत्यांना भेटले. त्यामुळे ते पुन्हा एनडीएकडे सोयरीक करू पाहत आहेत का? अशी शक्यता राजकीय विश्लेषकही व्यक्त करीत आहेत. 'लोकमत' प्रतिनिधीशी बोलताना सरदेसाई यांनी तसे काही नसल्याचे सांगून विषयाला बगल दिली.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण