शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्राकडे गेलो! विजय सरदेसाई, 'एनडीए'त जाण्याचा प्रश्नच नाही

By किशोर कुबल | Updated: June 9, 2023 11:06 IST

राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्रीय मंत्र्यांकडे कैफियत मांडावी लागल्याचे ते 'लोकमत'शी बोलताना म्हणाले. 

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क पणजी :गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावल्याने ते एनडीएमध्ये जाण्याच्या तर तयारीत नसावेत ना, असा होरा व्यक्त होत असतानाच सरदेसाई यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे.

राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्रीय मंत्र्यांकडे कैफियत मांडावी लागल्याचे ते 'लोकमत'शी बोलताना म्हणाले. यापूर्वीच्या सरकारमध्ये विजय सरदेसाई हे मंत्री होते. गोवा फॉरवर्डच्या तत्कालीन तिन्ही आमदारांना २०१७ च्या निवडणुकीनंतर पर्रीकर सरकारने मंत्रिमंडळात घेतले होते. परंतु जुलै २०१९ मध्ये बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधून फुटून आलेल्या दहा आमदारांना भाजप प्रवेश देऊन सरदेसाई व अन्य दोन मंत्र्यांना सावंत यांनी मंत्रिमंडळातून डच्चू दिला. त्यानंतरही काही काळ सरदेसाई यांनी एनडीएशी संबंध ठेवले होते. परंतु नंतर ते तोडले.

सरदेसाई म्हणाले की, माझी ही दिल्ली भेट राजकीय स्वरूपाची मुळीच नव्हती. लोकप्रतिनिधी या नात्याने मी लोकांचे प्रश्न घेऊन गेलो होतो. बरे, या समस्या केवळ माझ्या फातोर्डा मतदारसंघापुरत्या मर्यादितही नव्हत्या. सासष्टी तालुक्यातील तसेच भोम- करमळी बगलमार्गाचा विषयही मी मांडला. करमल घाटात झाडे वाचवण्यासाठी व्हायाडक्ट बांधणे आवश्यक आहे, याकडेही मी लक्ष वेधले. बाणावली राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील वेस्टर्न बगल मार्ग स्टिल्ट्सवर बांधण्यात यावा ज्यामुळे पर्यावरणाचे नुकसान टाळता येईल आणि वाहतूक सुरळीत होईल, हे मी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पटवून दिलेले आहे. स्टिल्टवर बांधकाम झाले नाही तर बाणावलीहून फातोर्ल्यापर्यंत पाणी येण्याचा धोका आहे. ५०० कोटी रुपये खर्चून दक्षिण जिल्हा इस्पितळ बांधले. आता ही इमारत खासगी मेडिकल कॉलेजसाठी खासगी कंपन्यांना लाटण्याचा घाट घातला जात आहे. लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टी केंद्रासमोर मांडाव्यात, असे मला वाटले.

जनताच त्यांना धडा शिकवणार

मी माझी वैयक्तिक कामे घेऊन गेलो नव्हतो. मी राज्याच्या समस्या मांडल्या आहेत. गडकरींनी मला यासंबंधी आश्वासन दिलेले आहे. गोव्यातील पायाभूत सुविधांबाबतच्या गंभीर समस्या मी त्यांच्या नजरेस आणून दिल्या. कोणी जर ही कामे अडवत असतील तर त्यांना जनताच धडा शिकवील. राज्य सरकार लोकांना त्रास देण्यासाठी आहे का, असा उलट सवाल सरदेसाई यांनी केला.

गडकरी, मांडविया यांची भेट

सरदेसाई यांचे केंद्रातील भाजप नेते, मंत्री यांच्याशी चांगले संबंध आहेत. काल ते नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना भेटले. गडकरींसारख्या केंद्रातील वजनदार भाजप नेत्याने सरदेसाई यांना अपॉइंटमेंट दिली. दोन दिवस सरदेसाई भाजप नेत्यांना भेटले. त्यामुळे ते पुन्हा एनडीएकडे सोयरीक करू पाहत आहेत का? अशी शक्यता राजकीय विश्लेषकही व्यक्त करीत आहेत. 'लोकमत' प्रतिनिधीशी बोलताना सरदेसाई यांनी तसे काही नसल्याचे सांगून विषयाला बगल दिली.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण