शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

वाळपई केंद्रात पावसाचे अर्धशतक, ८ जुलै पर्यंत राज्यात यलो अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 15:18 IST

वाळपईत आतापर्यंत ५० इंच पावसाची नोंद झाली आहे. तर त्याच्या खालोखाल साखळी केंद्रावर ४९.९ इंच पावसाची नोंद झाली आहे.

पणजी (नारायण गावस): राज्यात गेले ८ आठ दिवस मुसळधार सुरुच असून सर्वच भागात पावसाची जोरात  हजेरी लावली आहे. राज्यात १ जून तेे आतापर्यंत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त पावसाची नाेंद झाली आहे. पुढील पाच दिवस ८ जून पर्यंत राज्य हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.

वाळपई केंद्राचे अर्धशतक 

राज्यात १ जून ते आतापर्यंत एका महिन्यात सर्वाधिक जास्त पाऊस वाळपई केंद्रावर नोंद झाला आहे. वाळपईत आतापर्यंत ५० इंच पावसाची नोंद झाली आहे. तर त्याच्या खालोखाल साखळी केंद्रावर ४९.९ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर सांगे केंद्रावर ४८.६ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात शहरीभागापेक्षा ग्रामीण भागात पावसाचा जोर आहे. 

८ जुलै पर्यंत येलो अलर्ट 

राज्यात आठ जुलै पर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील ५ दिवस राज्यात सर्वच भागात जाेरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गेले १५ दिवस सतत जाेरदार पावस पडत असल्याने राज्यातील नद्या ओहळ वेगाने वाहत आहेत. बहुतांश नद्या तुडूंब भरुन वाहत आहे. तसेच राज्यातील धरणाची पातळीही वाढत आहे. अनेक भागात पावसाचा जाेर कायम आहे.

दाबाेळी पणजी केंद्रावर कमी पाऊस

राज्यातील गेल्या महिन्याभरात दाबोळी केंद्रावर ३५.१ इंच पावसाची नोंद झाली आहे तर राजधानी पणजी केंद्रावर ३६.१ इंच पावसाची नोंद झाली आहे. पण सर्वाधिक जास्त पाऊस पडणाऱ्या ओल्ड गाेवा केंद्रात आता फक्त ३६.१ इंच पावसाची नाेंद झाली आहे.

टॅग्स :goaगोवाRainपाऊस