शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

महामार्गावर कोसळली संरक्षक भिंत, कारमधील चौघे बचावले; मालपे-पेडणे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 16:06 IST

महाराष्ट्र नोंदणीकृत कार तिथून जात असताना चालकाला भिंत कोसळत असल्याचे दिसताच त्याने वाहन थांबवल्याने सुदैवाने चौघे बचावले.

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) : पेडणे तालुक्यातील मालपे-पेडणे येथील राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या बाजूला उभारण्यात आलेली संरक्षक भिंत आज सकाळी अचानक कोसळली. त्याचवेळी महाराष्ट्र नोंदणीकृत कार तिथून जात असताना चालकाला भिंत कोसळत असल्याचे दिसताच त्याने वाहन थांबवल्याने सुदैवाने चौघे बचावले. या घटनेमुळे भिंतीच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

एम. व्ही. आर कंपनीकडे या कामाचे कंत्राट आहे.  पेडणे तालुक्यातील पत्रादेवी ते म्हाखाजण धारगळपर्यंतच्या महामार्ग ६६ चे बांधकामाचे एमव्हीआर कंपनीला दिलेले आहे. मालपे महामार्गाचे काम करत असताना बायपास रस्ताही करण्यात आला आहे. पूर्वीचा जो राष्ट्रीय महामार्ग १७ होता त्याच रस्त्यावरून सर्व प्रकारची वाहने जात होती. परंतु महामार्ग ६६ चे काम सुरू झाल्यानंतर बायपास रस्ता करण्यात आला. या बायपास रस्त्याच्या बाजूला डोंगर आहे. रस्त्याच्या कामासाठी हा डोंगर उभा कापण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी येथे संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. संरक्षक भिंतीच्या कामावेळी हे डोंगर सरळ रेषेत कापल्यामुळे दरड कोसळण्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र, कंत्राटदारासह प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने भिंत कोसळण्याची घटना घडली.

गेल्या काही दिवसांपासून पेडणे तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. पावसामुळे कापलेल्या डोंगराच्या भागामध्ये पाणी जाऊन ती कमकुवत झाली. आज सकाळी १० च्या सुमारास अचानक दरड संरक्षक भिंतीवर कोसळली व भिंत थेट रस्त्यावर पडली. त्याचवेळी एक चारचाकी तिथून जात होती. चालकाला भिंत कोसळत असल्याचे लक्षात येताच त्याने वाहन थांबवल्याने मोठी जिवीत हानी टळली.

काही सेकंदावर मृत्यू थांबला होता

गोव्यातून महाराष्ट्राच्या दिशेने एक कार जात होती. त्या कारमध्ये चौघेजण होते. कार मालपे येथे आली असताना चालकाचे डोंगराकडे लक्ष गेले व त्याला दरड कोसळत असल्याचे दिसले. त्याने सावध होऊन वाहन थांबवल्यामुळे चौघांचा जीव वाचला. मृत्यू अवघ्या काही सेकंदावर येऊन थांबला होता पण दैव बलवत्तर म्हणून आपला जीव वाचला, असे त्या कार चालकाने सांगितले.

वाहने जपून चालवा

मालपे-पेडणे येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेले डोंगर कापण्यात आले आहेत. तसेच भविष्यातील धोका ओळखून डोंगर कापलेल्या बाजूने संरक्षक भिंतही उभारली आहे. मात्र, आजच्या घटनेने या संरक्षक भिंती कुचकामी ठरू शकतात हे दिसून आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर ये-जा करताना सतर्कता ठेऊन वाहने चालवण्याचे आवाहन केले जात आहे.

टॅग्स :goaगोवा