शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

महामार्गावर कोसळली संरक्षक भिंत, कारमधील चौघे बचावले; मालपे-पेडणे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 16:06 IST

महाराष्ट्र नोंदणीकृत कार तिथून जात असताना चालकाला भिंत कोसळत असल्याचे दिसताच त्याने वाहन थांबवल्याने सुदैवाने चौघे बचावले.

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) : पेडणे तालुक्यातील मालपे-पेडणे येथील राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या बाजूला उभारण्यात आलेली संरक्षक भिंत आज सकाळी अचानक कोसळली. त्याचवेळी महाराष्ट्र नोंदणीकृत कार तिथून जात असताना चालकाला भिंत कोसळत असल्याचे दिसताच त्याने वाहन थांबवल्याने सुदैवाने चौघे बचावले. या घटनेमुळे भिंतीच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

एम. व्ही. आर कंपनीकडे या कामाचे कंत्राट आहे.  पेडणे तालुक्यातील पत्रादेवी ते म्हाखाजण धारगळपर्यंतच्या महामार्ग ६६ चे बांधकामाचे एमव्हीआर कंपनीला दिलेले आहे. मालपे महामार्गाचे काम करत असताना बायपास रस्ताही करण्यात आला आहे. पूर्वीचा जो राष्ट्रीय महामार्ग १७ होता त्याच रस्त्यावरून सर्व प्रकारची वाहने जात होती. परंतु महामार्ग ६६ चे काम सुरू झाल्यानंतर बायपास रस्ता करण्यात आला. या बायपास रस्त्याच्या बाजूला डोंगर आहे. रस्त्याच्या कामासाठी हा डोंगर उभा कापण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी येथे संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. संरक्षक भिंतीच्या कामावेळी हे डोंगर सरळ रेषेत कापल्यामुळे दरड कोसळण्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र, कंत्राटदारासह प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने भिंत कोसळण्याची घटना घडली.

गेल्या काही दिवसांपासून पेडणे तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. पावसामुळे कापलेल्या डोंगराच्या भागामध्ये पाणी जाऊन ती कमकुवत झाली. आज सकाळी १० च्या सुमारास अचानक दरड संरक्षक भिंतीवर कोसळली व भिंत थेट रस्त्यावर पडली. त्याचवेळी एक चारचाकी तिथून जात होती. चालकाला भिंत कोसळत असल्याचे लक्षात येताच त्याने वाहन थांबवल्याने मोठी जिवीत हानी टळली.

काही सेकंदावर मृत्यू थांबला होता

गोव्यातून महाराष्ट्राच्या दिशेने एक कार जात होती. त्या कारमध्ये चौघेजण होते. कार मालपे येथे आली असताना चालकाचे डोंगराकडे लक्ष गेले व त्याला दरड कोसळत असल्याचे दिसले. त्याने सावध होऊन वाहन थांबवल्यामुळे चौघांचा जीव वाचला. मृत्यू अवघ्या काही सेकंदावर येऊन थांबला होता पण दैव बलवत्तर म्हणून आपला जीव वाचला, असे त्या कार चालकाने सांगितले.

वाहने जपून चालवा

मालपे-पेडणे येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेले डोंगर कापण्यात आले आहेत. तसेच भविष्यातील धोका ओळखून डोंगर कापलेल्या बाजूने संरक्षक भिंतही उभारली आहे. मात्र, आजच्या घटनेने या संरक्षक भिंती कुचकामी ठरू शकतात हे दिसून आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर ये-जा करताना सतर्कता ठेऊन वाहने चालवण्याचे आवाहन केले जात आहे.

टॅग्स :goaगोवा