शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

ग्रेटर पणजी पीडीतून गावे वगळली, फक्त ताळगाव व कदंब पठार राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 18:16 IST

सरकारने ग्रेटर पणजी पीडीएविरुद्ध चाललेल्या लोकआंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर जनभावना विचारात घेत ग्रेटर पणजी पीडीएतून बांबोळी पठारासह सर्व गावे वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

पणजी : सरकारने ग्रेटर पणजी पीडीएविरुद्ध चाललेल्या लोकआंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर जनभावना विचारात घेत ग्रेटर पणजी पीडीएतून बांबोळी पठारासह सर्व गावे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त कदंब पठार आणि ताळगावचा भाग हा पीडीएमध्ये राहील. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले मंत्री विजय सरदेसाई यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केली.मंत्री सरदेसाई म्हणाले, की ग्रेटर पणजी पीडीएमध्ये सांतआंद्रे, सांताक्रुझ व ताळगाव मतदारसंघातील गावांचा समावेश करण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींची मान्यता सरकारने घेतली होती. आमच्या भागांसाठी पीडीए हवी अशी मागणी करणारे पत्रही तिन्ही मतदारसंघाच्या आमदारांनी दिले होते. तथापि, काही घटकांनी पीडीएविरुद्ध आंदोलन सुरू करताच दोघा आमदारांची मने बदलली. आमचा पक्ष आणि आमचे सरकार हे गोंयकारांच्या मागणीचा आदर करणारे सरकार आहे. त्यामुळे आम्ही बांबोळी पठारासह सांताक्रुझ व सांतआंद्रे मतदारसंघातील जवळजवळ सगळीच गावे व भाग ग्रेटर पणजी पीडीएच्या अधिकार क्षेत्रतून वगळत आहोत. येत्या 9 रोजी नगर नियोजन मंडळाची बैठक होईल व त्यावेळी हा गावे वगळण्याचा प्रस्ताव मंडळासमोर ठेवला जाईल.

मंत्री सरदेसाई म्हणाले, की कदंब पठार हा ग्रेटर पणजी पीडीएमध्ये राहील. ताळगावही ग्रेटर पणजी पीडीएमध्ये असेल. कारण ताळगावसाठी अगोदरच बाह्यविकास आराखडा (ओडीपी) आहे. आपण गावे पीडीएतून वगळण्याची घोषणा करून ईस्टरची भेटच लोकांना देत आहे. गोंमतकीयांचे व गोव्याचे अस्तित्व राखणो हे आमचे ध्येय आहे. काहीजणांना पीडीएची अॅलर्जी आहे, असे आम्हाला दिसते. आम्ही पीडीएविरोधकांशी चर्चा सुरू केली होती, त्याचप्रमाणो 2021 च्या प्रादेशिक आराखडय़ाच्या विषयाबाबतही विरोधकांशी चर्चा करू. कोणत्या सुधारणा हव्या आहेत, काय करायला हवे ते आराखडय़ाला विरोध करणाऱ्यांनी सांगावे. यापूर्वी प्रादेशिक आराखडाच नसल्याने गोव्यात काहीजणांकडून मोठय़ा प्रमाणात ऑर्चड जमिनींचे भूखंड तयार करून ते बेकायदा पद्धतीने विकले गेले. बेकायदा पद्धतीने चालणारे बांधकामविषयक व्यवहार बंद करावेत अशी मागणी एनजीओ करतात आणि दुस:याबाजूने प्रादेशिक आराखडाही नको असे म्हणतात असे होऊ शकत नाही. सरदेसाई म्हणाले, की आम्ही पर्यावरणीयसंवेदनक्षम जागांना हात न लावता 2021 च्या आराखडय़ातील सेटलमेन्ट झोन अंमलात आणू पाहत आहोत. त्यामुळे त्यास कुणी विरोध करण्याचे कारणच असू नये.