शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

ग्रेटर पणजी पीडीतून गावे वगळली, फक्त ताळगाव व कदंब पठार राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 18:16 IST

सरकारने ग्रेटर पणजी पीडीएविरुद्ध चाललेल्या लोकआंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर जनभावना विचारात घेत ग्रेटर पणजी पीडीएतून बांबोळी पठारासह सर्व गावे वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

पणजी : सरकारने ग्रेटर पणजी पीडीएविरुद्ध चाललेल्या लोकआंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर जनभावना विचारात घेत ग्रेटर पणजी पीडीएतून बांबोळी पठारासह सर्व गावे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त कदंब पठार आणि ताळगावचा भाग हा पीडीएमध्ये राहील. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले मंत्री विजय सरदेसाई यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केली.मंत्री सरदेसाई म्हणाले, की ग्रेटर पणजी पीडीएमध्ये सांतआंद्रे, सांताक्रुझ व ताळगाव मतदारसंघातील गावांचा समावेश करण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींची मान्यता सरकारने घेतली होती. आमच्या भागांसाठी पीडीए हवी अशी मागणी करणारे पत्रही तिन्ही मतदारसंघाच्या आमदारांनी दिले होते. तथापि, काही घटकांनी पीडीएविरुद्ध आंदोलन सुरू करताच दोघा आमदारांची मने बदलली. आमचा पक्ष आणि आमचे सरकार हे गोंयकारांच्या मागणीचा आदर करणारे सरकार आहे. त्यामुळे आम्ही बांबोळी पठारासह सांताक्रुझ व सांतआंद्रे मतदारसंघातील जवळजवळ सगळीच गावे व भाग ग्रेटर पणजी पीडीएच्या अधिकार क्षेत्रतून वगळत आहोत. येत्या 9 रोजी नगर नियोजन मंडळाची बैठक होईल व त्यावेळी हा गावे वगळण्याचा प्रस्ताव मंडळासमोर ठेवला जाईल.

मंत्री सरदेसाई म्हणाले, की कदंब पठार हा ग्रेटर पणजी पीडीएमध्ये राहील. ताळगावही ग्रेटर पणजी पीडीएमध्ये असेल. कारण ताळगावसाठी अगोदरच बाह्यविकास आराखडा (ओडीपी) आहे. आपण गावे पीडीएतून वगळण्याची घोषणा करून ईस्टरची भेटच लोकांना देत आहे. गोंमतकीयांचे व गोव्याचे अस्तित्व राखणो हे आमचे ध्येय आहे. काहीजणांना पीडीएची अॅलर्जी आहे, असे आम्हाला दिसते. आम्ही पीडीएविरोधकांशी चर्चा सुरू केली होती, त्याचप्रमाणो 2021 च्या प्रादेशिक आराखडय़ाच्या विषयाबाबतही विरोधकांशी चर्चा करू. कोणत्या सुधारणा हव्या आहेत, काय करायला हवे ते आराखडय़ाला विरोध करणाऱ्यांनी सांगावे. यापूर्वी प्रादेशिक आराखडाच नसल्याने गोव्यात काहीजणांकडून मोठय़ा प्रमाणात ऑर्चड जमिनींचे भूखंड तयार करून ते बेकायदा पद्धतीने विकले गेले. बेकायदा पद्धतीने चालणारे बांधकामविषयक व्यवहार बंद करावेत अशी मागणी एनजीओ करतात आणि दुस:याबाजूने प्रादेशिक आराखडाही नको असे म्हणतात असे होऊ शकत नाही. सरदेसाई म्हणाले, की आम्ही पर्यावरणीयसंवेदनक्षम जागांना हात न लावता 2021 च्या आराखडय़ातील सेटलमेन्ट झोन अंमलात आणू पाहत आहोत. त्यामुळे त्यास कुणी विरोध करण्याचे कारणच असू नये.