शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
3
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
4
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
5
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
6
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
7
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
8
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
9
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

गोविंद गावडे यांनी दंड थोपटले; भाजपमध्ये राहून सरकारशी तीव्र संघर्ष करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:59 IST

तांत्रिकदृष्ट्या पक्ष व आमदारकी सोडायची नाही; पण पुढील दीड वर्ष पक्षात राहून सरकारला जेरीस आणायचे अशी खेळी गोविंद गावडे खेळू शकतात.

भाजपमध्येच राहायचे; पण भाजप सरकारला कधी चिमटे काढत, तर कधी ठोसे लगावत सरकारमधील काही नेत्यांची अडचण करायची, अशी रणनीती पूर्वी एकदा (स्व.) विष्णू वाघ यांनी अवलंबिली होती. काही वर्षांपूर्वी थिवी मतदारसंघात वाघ यांच्यावर तेव्हा हल्लाही झाला होता. त्या हल्ल्यामागचा मेंदू कुणाचा होता, याचीही सर्वांना कल्पना आहे. एकंदरीत वाघ यांनी भाजपमध्ये राहून काही भाजप नेत्यांशी संघर्ष केला होता. आता गोविंद गावडेही भाजपमध्ये राहून सरकारशी तीव्र संघर्ष करतील, असेच दिसते. 

तांत्रिकदृष्ट्या पक्ष व आमदारकी सोडायची नाही; पण पुढील दीड वर्ष पक्षात राहून सरकारला जेरीस आणायचे अशी खेळी गोविंद गावडे खेळू शकतात. खांडोळा येथे रविवारी गावडे यांनी सभा घेतली. मंत्रिपद काढून घेऊन आपल्यावर अन्याय केला गेला, केंद्रीय नेतृत्वानेही आपली बाजू ऐकून घेतली नाही, असा सूर गावडे यांनी सभेत आळवला. सभेला बऱ्यापैकी गर्दी झाली होती. प्रियोळ मतदारसंघातील युवावर्ग अजून गोविंद गावडे यांच्यासोबत आहे, असा संदेश खांडोळ्यातील या सभेतून मिळाला आहे. मात्र, गावडे यांना भाजपशी किंवा भाजप सरकारशी संघर्ष करणे परवडणार आहे का? २०२७ची विधानसभा निवडणूक गावडे भाजपच्या तिकिटावर लढूच शकणार नाहीत. कारण ते मनातून दुखावले गेले आहेत. मनाने आता ते भाजपसोबत नाहीत, हे रविवारचे त्यांचे पूर्ण भाषण ऐकून कुणीही केंद्रीय नेता सांगू शकेल, मख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही याची कल्पना आली असेलच.

मायकल लोबो यांनीही २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपशी संघर्ष केला होता. भाजपमध्ये राहून भाजपच्या सरकारला शिंगावर घेण्याचा प्रयत्न करून मग शेवटी लोबोंनी भाजपचा राजीनामा दिला होता. ते काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसच्या तिकिटावर कळंगुटमधून लढले आणि निवडून आले. आता पुन्हा ते भाजपमध्ये आले आहेत हा भाग वेगळा. गोविंद गावडे लोबो यांच्याच मार्गाने जात आहेत; पण एकदा भाजप सोडल्यावर पुन्हा त्यांना भाजपमध्ये येण्याची गरज भासणार नाही. कारण प्रियोळ मतदारसंघात त्यांनी स्वतःचे म्हणून स्थान निर्माण केले आहे, हे मान्य करावे लागेल. गावडे पुढील दीड वर्ष भाजपमध्ये राहतील. नंतर ते स्वतःचा मार्ग धरतील, असे आता राजकीय विश्लेषक सांगू शकतात. गावडे मुळातच स्वखुशीने भाजपमध्ये आले नव्हते. त्यांना भाजपच्या काही नेत्यांनी आग्रहाने पक्षात आणले होते. भाजपच्या तिकिटावर ते गेली निवडणूक लढले; पण जिंकून येताना मात्र बराच घाम फुटला होता. अवघ्या २१३ मतांनी ते त्यावेळी निवडून आले. 

गोविंद गावडे यांच्याकडे संघर्ष करण्याची क्षमता आहे. सध्याच्या सरकारमधील अनेक गुपिते व घोटाळेही त्यांना ठाऊक आहेत. मुख्यमंत्री सावंत जाहीरपणे गोविंद गावडे यांना आणखी दुखवायला जाणार नाहीत, असे वाटते. कारण गावडे एकदा बोलू लागले तर सरकारमधील अनेकांना ते जखमी करू शकतात. यापुढे कला अकादमीचा विषय विद्यमान सरकार कसा हाताळते, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल. अकादमीच्याच विषयावरून गावडे जास्त वादाचा विषय अगोदर ठरले होते. कलाकारांनी गावडे यांच्या विधानांबाबत कायम नाराजी व्यक्त केली. कला अकादमीवर साठ कोटी रुपयांचा खर्च झाला; पण नूतनीकरण योग्यप्रकारे झालेच नाही, असा आक्षेप सगळीकडून घेतला गेला. वास्तविक हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने केले होते; पण गावडे हेच त्याबाबत जास्त बोलत राहिल्याने लोकांनी गावडे यांच्याकडेच सदोष कामाबाबत बोट दाखविले.

एसटी बांधवांमध्ये सध्या चलबिचल आहे. कारण गावडे यांनी आपण एसटी बांधवांचे प्रश्न मांडले म्हणून आपल्याला डच्चू दिला गेला असा युक्तिवाद केला आहे. आदिवासी खात्याच्या कारभारावर केलेले आरोप त्यांनी मागे घेतलेले नाहीत. आरोपांची चौकशी व्हावी, असेही अप्रत्यक्षरीत्या गावडे यांनी रविवारी सुचविले. फोंडा तालुक्यातील एसटी बांधवांशी गावडे यांचा जास्त संवाद व संपर्क आहे. शिरोड्यात आपणच सुभाष शिरोडकर यांना निवडून आणले असाही दावा ते करतात. अर्थात हा दावा पटणारा नाही. मात्र, गावडे यांनी तूर्त दंड थोपटले असल्याने मुख्यमंत्र्यांनाही थोडे सावध व्हावे लागेल.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण