शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

गोविंद गावडे यांनी दंड थोपटले; भाजपमध्ये राहून सरकारशी तीव्र संघर्ष करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:59 IST

तांत्रिकदृष्ट्या पक्ष व आमदारकी सोडायची नाही; पण पुढील दीड वर्ष पक्षात राहून सरकारला जेरीस आणायचे अशी खेळी गोविंद गावडे खेळू शकतात.

भाजपमध्येच राहायचे; पण भाजप सरकारला कधी चिमटे काढत, तर कधी ठोसे लगावत सरकारमधील काही नेत्यांची अडचण करायची, अशी रणनीती पूर्वी एकदा (स्व.) विष्णू वाघ यांनी अवलंबिली होती. काही वर्षांपूर्वी थिवी मतदारसंघात वाघ यांच्यावर तेव्हा हल्लाही झाला होता. त्या हल्ल्यामागचा मेंदू कुणाचा होता, याचीही सर्वांना कल्पना आहे. एकंदरीत वाघ यांनी भाजपमध्ये राहून काही भाजप नेत्यांशी संघर्ष केला होता. आता गोविंद गावडेही भाजपमध्ये राहून सरकारशी तीव्र संघर्ष करतील, असेच दिसते. 

तांत्रिकदृष्ट्या पक्ष व आमदारकी सोडायची नाही; पण पुढील दीड वर्ष पक्षात राहून सरकारला जेरीस आणायचे अशी खेळी गोविंद गावडे खेळू शकतात. खांडोळा येथे रविवारी गावडे यांनी सभा घेतली. मंत्रिपद काढून घेऊन आपल्यावर अन्याय केला गेला, केंद्रीय नेतृत्वानेही आपली बाजू ऐकून घेतली नाही, असा सूर गावडे यांनी सभेत आळवला. सभेला बऱ्यापैकी गर्दी झाली होती. प्रियोळ मतदारसंघातील युवावर्ग अजून गोविंद गावडे यांच्यासोबत आहे, असा संदेश खांडोळ्यातील या सभेतून मिळाला आहे. मात्र, गावडे यांना भाजपशी किंवा भाजप सरकारशी संघर्ष करणे परवडणार आहे का? २०२७ची विधानसभा निवडणूक गावडे भाजपच्या तिकिटावर लढूच शकणार नाहीत. कारण ते मनातून दुखावले गेले आहेत. मनाने आता ते भाजपसोबत नाहीत, हे रविवारचे त्यांचे पूर्ण भाषण ऐकून कुणीही केंद्रीय नेता सांगू शकेल, मख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही याची कल्पना आली असेलच.

मायकल लोबो यांनीही २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपशी संघर्ष केला होता. भाजपमध्ये राहून भाजपच्या सरकारला शिंगावर घेण्याचा प्रयत्न करून मग शेवटी लोबोंनी भाजपचा राजीनामा दिला होता. ते काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसच्या तिकिटावर कळंगुटमधून लढले आणि निवडून आले. आता पुन्हा ते भाजपमध्ये आले आहेत हा भाग वेगळा. गोविंद गावडे लोबो यांच्याच मार्गाने जात आहेत; पण एकदा भाजप सोडल्यावर पुन्हा त्यांना भाजपमध्ये येण्याची गरज भासणार नाही. कारण प्रियोळ मतदारसंघात त्यांनी स्वतःचे म्हणून स्थान निर्माण केले आहे, हे मान्य करावे लागेल. गावडे पुढील दीड वर्ष भाजपमध्ये राहतील. नंतर ते स्वतःचा मार्ग धरतील, असे आता राजकीय विश्लेषक सांगू शकतात. गावडे मुळातच स्वखुशीने भाजपमध्ये आले नव्हते. त्यांना भाजपच्या काही नेत्यांनी आग्रहाने पक्षात आणले होते. भाजपच्या तिकिटावर ते गेली निवडणूक लढले; पण जिंकून येताना मात्र बराच घाम फुटला होता. अवघ्या २१३ मतांनी ते त्यावेळी निवडून आले. 

गोविंद गावडे यांच्याकडे संघर्ष करण्याची क्षमता आहे. सध्याच्या सरकारमधील अनेक गुपिते व घोटाळेही त्यांना ठाऊक आहेत. मुख्यमंत्री सावंत जाहीरपणे गोविंद गावडे यांना आणखी दुखवायला जाणार नाहीत, असे वाटते. कारण गावडे एकदा बोलू लागले तर सरकारमधील अनेकांना ते जखमी करू शकतात. यापुढे कला अकादमीचा विषय विद्यमान सरकार कसा हाताळते, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल. अकादमीच्याच विषयावरून गावडे जास्त वादाचा विषय अगोदर ठरले होते. कलाकारांनी गावडे यांच्या विधानांबाबत कायम नाराजी व्यक्त केली. कला अकादमीवर साठ कोटी रुपयांचा खर्च झाला; पण नूतनीकरण योग्यप्रकारे झालेच नाही, असा आक्षेप सगळीकडून घेतला गेला. वास्तविक हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने केले होते; पण गावडे हेच त्याबाबत जास्त बोलत राहिल्याने लोकांनी गावडे यांच्याकडेच सदोष कामाबाबत बोट दाखविले.

एसटी बांधवांमध्ये सध्या चलबिचल आहे. कारण गावडे यांनी आपण एसटी बांधवांचे प्रश्न मांडले म्हणून आपल्याला डच्चू दिला गेला असा युक्तिवाद केला आहे. आदिवासी खात्याच्या कारभारावर केलेले आरोप त्यांनी मागे घेतलेले नाहीत. आरोपांची चौकशी व्हावी, असेही अप्रत्यक्षरीत्या गावडे यांनी रविवारी सुचविले. फोंडा तालुक्यातील एसटी बांधवांशी गावडे यांचा जास्त संवाद व संपर्क आहे. शिरोड्यात आपणच सुभाष शिरोडकर यांना निवडून आणले असाही दावा ते करतात. अर्थात हा दावा पटणारा नाही. मात्र, गावडे यांनी तूर्त दंड थोपटले असल्याने मुख्यमंत्र्यांनाही थोडे सावध व्हावे लागेल.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण