शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
3
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
4
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
5
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
6
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
7
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
8
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
9
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
10
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
11
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
12
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
13
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
14
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
15
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
17
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
18
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
19
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
20
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?

गोविंद गावडेंची बाजू ऐकली, आता पक्षश्रेष्ठींना अहवाल पाठवू!: दामू नाईक; दिल्लीतच पुढील निर्णय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 08:57 IST

दिल्लीतच काय तो निर्णय होईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्याआधी त्यांची बाजू ऐकून घ्यावी असे पक्ष नेतृत्वाने ठरवले आहे. त्यानुसार आज, सोमवारी गोविंद गावडे यांची बाजू मी ऐकून घेतलेली आहे. आता याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवणार असून दिल्लीतच काय तो निर्णय होईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.

आज प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व मंत्री गोविंद गावडे यांची बैठक झाली. या बैठकीत नाईक यांनी गावडे यांची बाजू ऐकून घेतली. या बैठकीनंतर भाजपच्या मंत्री, आमदारांचीही बैठक पार पडली. गावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या आदिवासी कल्याण खात्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने खळबळ उडाली होती. गावडे यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचे जवळजवळ निश्चित झाले होते. गेले दोन दिवस दामू दिल्लीत होते. दिल्लीत त्यांनी या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.

दामू रविवारी रात्री गोव्यात पोचले. गावडे यांची बाजू ऐकून घ्यावी, असे ठरले. त्यामुळे सोमवारी सायंकाळी दामूंनी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय बंगल्यावर बोलावले. दरम्यान, मंत्री-आमदारांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रात मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपने 'संकल्प ते सिद्धी' कार्यक्रम आयोजित केला आहे. पक्षाचे केंद्रीय नेते दुष्यंत कुमार गोव्यात येणार आहेत. गेल्या अकरा वर्षातील मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल आम्ही तळागाळात लोकांपर्यंत माहिती पोचवणार आहोत. त्याबाबत मंत्री, आमदारांसोबत चर्चा केल्याचेही नाईक म्हणाले.

कारवाई एकतर्फी नको म्हणून चर्चा...

मंत्री गोविंद गावडे यांच्याशी मी चर्चा केली आहे. गावडे यांना मी पक्षाचे धोरण सांगितले आहे. तसेच त्यांचे जे काही म्हणणे आहे ते ऐकून घेतले. पक्षाकडून कारवाई एकतर्फी व्हायला नको, त्यामुळे गावडे यांचे म्हणणे ऐकून घेणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार मी त्यांच्याशी बोललो आहे. आता याबाबतचा सविस्तर अहवाल मी पाठवणार असून केंद्रीय नेतेच काय तो निर्णय घेतील.

दामूंच्या प्रश्नांची उत्तरे दिली : गोविंद गावडे

दामू नाईक यांनी घेतलेल्या बैठकीविषयी पत्रकारांनी काल मंत्री गोविंद गावडे यांना विचारले असता, त्यांनी एका वाक्यातच सांगितले की, 'दामू नाईक यांनी जे काही प्रश्न मला विचारले त्या प्रश्नांची उत्तरे मी त्यांना दिली आहेत.' याव्यतिरिक्त कोणतेही भाष्य करण्याचे गावडे यांनी टाळले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर मौन पाळणेच त्यांनी पसंत केले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण