शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

सरकारचे पर्यावरणाकडे कायमच दुर्लक्ष; माधव गाडगीळ यांच्या सूचनांकडेही काणाडोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 19:57 IST

गोवा सरकारने राज्यातील पर्यावरणाकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी ज्या काही महत्त्वाच्या सूचना केल्या,

पणजी : गोवा सरकारने राज्यातील पर्यावरणाकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी ज्या काही महत्त्वाच्या सूचना केल्या, त्या कानावर घेण्याचीदेखील सरकारची इच्छा नाही, अशा शब्दांत आम आदमी पक्षाचे नेते सिद्धार्थ कारापूरकर यांनी सरकारवर टीका केली आहे. 

कारापूरकर म्हणतात की, ‘पैसा फेकणा-यांचे हितसंबंध जपण्यासाठी सरकारने पर्यावरणाच्या बाबतीत अनेक तडजोडी केल्याने आज राज्याला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला, मात्र त्यामुळे उद्भवलेली पूरस्थिती याला सरकारचा पर्यावरणाकडे असलेला दृष्टिकोनच जबाबदार आहे. खरेतर पर्यावरण संतुलन राखणे हे सरकारचे काम आहे, मोठ्या प्रमाणात चाललेली डोंगरकापणी, सखल भाग, शेती मातीचा भराव टाकून बुजविण्याचे प्रकार, वृक्षांची बेसुमार कत्तल यामुळे पर्यावरणीय असंतुलन निर्माण झालेले आहे.ते पुढे म्हणतात की, ‘पर्यावरणतज्ज्ञ माधवराव गाडगीळ यांनी सरकारला काही वर्षांपूर्वी सरकारला महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या, परंतु त्यांचे कोणीही कानावर घेतले नाही.  केरळमध्ये मागच्यावर्षी जी आपत्ती आली त्याचेही भाकित त्यांनी आधीच केले होते.’

‘साळावलीबाबत खरी माहिती द्या’

सरकारने साळावली धरणातील पाण्याच्या ख-या पातळीबाबत लोकांना सांगावे, असे आवाहन करताना कारापूरकर म्हणतात की, ‘धरण भरले व जादा पाणी सोडावे लागले, यामुळे प्रसारमाध्यमांना जुलैमध्येच चांगले चित्र मिळाले. इतिहासात डोकावताना धरणाच्या मागील नोंदींवरून असे दिसते की ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात साळावली धरण भरते व जादा पाणी सोडावे लागते. कारण खाणीतील माती वाहून आल्याने पाण्याची साठवणूक करण्यास अडथळा येतो. राज्यातील अनेक नद्यांची हीच परिस्थिती आहे. साळावली धरण ही दक्षिण गोव्याची जीवनरेखा आहे व या धरणाच्या बाबतीतही केवळ काही जणांच्या हितसंबंधांसाठी तडजोड केली जात आहे. सरकारे बदलत राहतात; परंतु भविष्यात गोमंतकीयांनाच त्याची गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे कारापूरकर यांनी शेवटी म्हटले आहे. 

टॅग्स :goaगोवा