शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मराठी शाळा वाचविण्यास सरकार ठरलेय असमर्थ; पालकांना दोष देणे अयोग्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 09:22 IST

प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांचा हल्लाबोल 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'पालकांमुळेच सरकारी शाळा बंद पडत आहेत', असे विधान करून शिक्षण खाते सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बंद पडत चाललेल्या सरकारी मराठी शाळा टिकवण्याबाबत आपले सरकार असमर्थ असल्याची जाहीर कबुली दिली आहे, असा हल्लाबोल मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक व प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकतेच शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आयोजित 'व्हर्चुअल' संवादावेळी असे विधान केले होते.

याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात वेलिंगकर यांनी म्हटले आहे की, सरकारी शाळांमध्ये असलेला शिक्षकांचा शेकडोंच्या संख्येने असलेला तुटवडा; मुलाखतीत निवड झालेल्या शिक्षकांची प्रत्यक्ष नियुक्ती करण्यात घडलेला दीड, दोन वर्षांचा अक्षम्य विलंब; वर्षानुवर्षे चार वर्ग शिकवण्यासाठी एकच शिक्षक असलेल्या शेकडो एकशिक्षकी सरकारी मराठी शाळा, नव्या-जुन्या शिक्षकांना देण्यात येणाऱ्या तुटपुंजा प्रशिक्षणातही, प्रेरणा (मोटिव्हेशन) देऊ शकणाऱ्या मोटिव्हेटर प्रशिक्षकांचा अभाव आणि प्रत्यक्ष पालकांशी संपर्क साधून त्यांच्यामध्ये सरकारी शाळांबद्दलचा विविध कारणांमुळे उडालेला विश्वास पुनर्स्थापित करण्यातले दारुण अपयश ही याची कारणे आहेत. ही स्थिती दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सरकारपासून ते आजपर्यंत कायम आहे.

विद्याभारतीला जमले, सरकारला का नाही?

वेलिंगकर यांनी विद्याभारती संस्थेचे उदाहरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, विद्याभारती संस्थेने बंद पडणाऱ्या ४५ मराठी शाळा टिकवल्या आणि त्यात विद्यार्थीसंख्या फुलवली. हा प्रयोग यशस्वी केला. ही किमया सरकारला का जमू नये, याचा अभ्यास संबंधितांनी करावा. पालक कशाच्या आधारावर मराठी शाळांकडे वळले याचा अभ्यास करावा. मराठी शाळा बंद पडण्याचे खापर पालकांवर फोडण्याच्या नादात सरकारने आपल्याच जबाबदारीपासून पलायन करण्याचा निष्फळ प्रयत्न केलेला आहे, असे आमचे मत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने शाळा टिकवण्याची जबाबदारी गांभीर्याने घ्यावी आणि मराठी शाळांची विद्यार्थीसंख्या वाढवण्याचे आव्हान खात्यातर्फे स्वीकारावे.

याला पालक कसे जबाबदार?

वेलिंगकर यांनी म्हटले आहे की, प्राचार्य माधव कामत कमिटीच्या शिफारसी, नियमित कायम तत्त्वावर शिक्षकांची भरती न करता कंत्राटी आणि तासिका-तत्त्वावर शिक्षकांची खोगीरभरती करून शाळा रखडत चालविल्या जात आहेत. या सगळ्या, शाळा बंद पडण्यास प्रत्यक्षपणे कारणीभूत असलेल्या गोष्टींसाठी सरकार नव्हे, पालकच जबाबदार आहेत काय?, असा सवाल त्यांनी केला आहे.

...म्हणून पालकांकडून झालेय दुर्लक्ष

वेलिंगकर यांनी म्हटले आहे की, सरकारने प्राथमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेताना, तत्कालीन शिक्षणमंत्री स्व. शशिकलाताई काकोडकर यांनी, अनुदान फक्त मातृभाषा मराठी व कोकणी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना मिळेल असा दंडक १९९० साली घातला होता. २०१२ मध्ये यात बदल करून चर्च संस्थांतर्फे चालणाऱ्या इंग्रजी प्राथमिक शाळांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान मुक्तहस्ते सुरू केले गेले. यातून मराठी/कोकणी शाळांकडे पालकांनी दुर्लक्ष केले. 

टॅग्स :goaगोवाSchoolशाळाEducationशिक्षण