शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी शाळा वाचविण्यास सरकार ठरलेय असमर्थ; पालकांना दोष देणे अयोग्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 09:22 IST

प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांचा हल्लाबोल 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'पालकांमुळेच सरकारी शाळा बंद पडत आहेत', असे विधान करून शिक्षण खाते सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बंद पडत चाललेल्या सरकारी मराठी शाळा टिकवण्याबाबत आपले सरकार असमर्थ असल्याची जाहीर कबुली दिली आहे, असा हल्लाबोल मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक व प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकतेच शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आयोजित 'व्हर्चुअल' संवादावेळी असे विधान केले होते.

याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात वेलिंगकर यांनी म्हटले आहे की, सरकारी शाळांमध्ये असलेला शिक्षकांचा शेकडोंच्या संख्येने असलेला तुटवडा; मुलाखतीत निवड झालेल्या शिक्षकांची प्रत्यक्ष नियुक्ती करण्यात घडलेला दीड, दोन वर्षांचा अक्षम्य विलंब; वर्षानुवर्षे चार वर्ग शिकवण्यासाठी एकच शिक्षक असलेल्या शेकडो एकशिक्षकी सरकारी मराठी शाळा, नव्या-जुन्या शिक्षकांना देण्यात येणाऱ्या तुटपुंजा प्रशिक्षणातही, प्रेरणा (मोटिव्हेशन) देऊ शकणाऱ्या मोटिव्हेटर प्रशिक्षकांचा अभाव आणि प्रत्यक्ष पालकांशी संपर्क साधून त्यांच्यामध्ये सरकारी शाळांबद्दलचा विविध कारणांमुळे उडालेला विश्वास पुनर्स्थापित करण्यातले दारुण अपयश ही याची कारणे आहेत. ही स्थिती दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सरकारपासून ते आजपर्यंत कायम आहे.

विद्याभारतीला जमले, सरकारला का नाही?

वेलिंगकर यांनी विद्याभारती संस्थेचे उदाहरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, विद्याभारती संस्थेने बंद पडणाऱ्या ४५ मराठी शाळा टिकवल्या आणि त्यात विद्यार्थीसंख्या फुलवली. हा प्रयोग यशस्वी केला. ही किमया सरकारला का जमू नये, याचा अभ्यास संबंधितांनी करावा. पालक कशाच्या आधारावर मराठी शाळांकडे वळले याचा अभ्यास करावा. मराठी शाळा बंद पडण्याचे खापर पालकांवर फोडण्याच्या नादात सरकारने आपल्याच जबाबदारीपासून पलायन करण्याचा निष्फळ प्रयत्न केलेला आहे, असे आमचे मत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने शाळा टिकवण्याची जबाबदारी गांभीर्याने घ्यावी आणि मराठी शाळांची विद्यार्थीसंख्या वाढवण्याचे आव्हान खात्यातर्फे स्वीकारावे.

याला पालक कसे जबाबदार?

वेलिंगकर यांनी म्हटले आहे की, प्राचार्य माधव कामत कमिटीच्या शिफारसी, नियमित कायम तत्त्वावर शिक्षकांची भरती न करता कंत्राटी आणि तासिका-तत्त्वावर शिक्षकांची खोगीरभरती करून शाळा रखडत चालविल्या जात आहेत. या सगळ्या, शाळा बंद पडण्यास प्रत्यक्षपणे कारणीभूत असलेल्या गोष्टींसाठी सरकार नव्हे, पालकच जबाबदार आहेत काय?, असा सवाल त्यांनी केला आहे.

...म्हणून पालकांकडून झालेय दुर्लक्ष

वेलिंगकर यांनी म्हटले आहे की, सरकारने प्राथमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेताना, तत्कालीन शिक्षणमंत्री स्व. शशिकलाताई काकोडकर यांनी, अनुदान फक्त मातृभाषा मराठी व कोकणी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना मिळेल असा दंडक १९९० साली घातला होता. २०१२ मध्ये यात बदल करून चर्च संस्थांतर्फे चालणाऱ्या इंग्रजी प्राथमिक शाळांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान मुक्तहस्ते सुरू केले गेले. यातून मराठी/कोकणी शाळांकडे पालकांनी दुर्लक्ष केले. 

टॅग्स :goaगोवाSchoolशाळाEducationशिक्षण