शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
4
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
7
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
8
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
9
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
10
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
13
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
14
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
15
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
16
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
17
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
18
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
19
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
20
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

मगोपच्या याचिकेमुळे सरकार गडबडले, आणखीही याचिकादार पुढे सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 19:30 IST

सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

पणजी : सरकारमध्ये राहुनही मगोपने काँग्रेसच्या दोन आमदारांच्या राजीनाम्यांविरुद्ध व भाजपाच्या दोघा संभाव्य उमेदवारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयास याचिका सादर केल्यामुळे सत्ताधारी भाजपप्रणित आघाडी गडबडली आहे. मगोपने हा विषय पुढे नेऊ नये म्हणून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. मात्र, मगोपचा बाण आता धनुष्यातून बाहेर गेला असून तो बाण परत घेतला जाऊ नये म्हणून राज्यात अन्य काही नवे याचिकादार तयार झाले आहेत. या विषयावरून आणखी याचिका सादर होण्याची दाट शक्यता आहे.

सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिरोडा व मांद्रे मतदारसंघात होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये ते भाजपचे उमेदवार असतील. त्यांचे राजीनामा देणे व सभापतींनी तो राजीनामा स्वीकारणे अशा विषयांवरून मगोपने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने मगोपचे नेमके चालले आहे तरी काय असा प्रश्न भाजपच्या नेत्यांना पडला आहे. मगोपशी याच आठवड्यात एक बैठक घ्यावी, असे भाजपच्या कोअर टीमच्या काही सदस्यांनी ठरवले आहे. 

दबावाखाली येऊन मगोपने आता याचिका मागे घेण्याचे राजकारण खेळू नये म्हणून गोव्यातील काही वकील तसेच सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. काही आरटीआय कार्यकर्तेही व काँग्रेसचेही एक आमदार  मगोपनेच मांडलेले मुद्दे हाती घेऊन न्यायालयात याचिका सादर करण्याची शक्यता आहे. त्याविषयी पडद्यामागून रंगीत तालिम सुरू झाली आहे. 

माकडउडय़ा थांबाव्यात : राणेदरम्यान, आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांचे उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच राहिले. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर व अन्य अनेक काँग्रेस आमदारांनी घाटे यांची भेट घेतली व त्यांना पाठींबा दिला. मगोपच्या याचिकेबाबत राणो यांनी पत्रकारांपाशी प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्ष बदलून सरड्याप्रमाणे कुणी रंग बदलू नयेत. योग्य ते कारण नसताना जे पक्ष सोडून जातात, त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यासाठी बंदी असण्यासाठी कायदा होण्याची गरज आहे, असे राणे म्हणाले. लोकशाहीत मतभेद व मतभिन्नता ही असतेच व असावीही पण एक पक्ष सोडून अचानक दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी निदान सबळ व पटण्याजोगे कारण तरी असायला हवे, असे राणे म्हणाले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाPoliticsराजकारण