शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

मगोपच्या याचिकेमुळे सरकार गडबडले, आणखीही याचिकादार पुढे सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 19:30 IST

सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

पणजी : सरकारमध्ये राहुनही मगोपने काँग्रेसच्या दोन आमदारांच्या राजीनाम्यांविरुद्ध व भाजपाच्या दोघा संभाव्य उमेदवारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयास याचिका सादर केल्यामुळे सत्ताधारी भाजपप्रणित आघाडी गडबडली आहे. मगोपने हा विषय पुढे नेऊ नये म्हणून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. मात्र, मगोपचा बाण आता धनुष्यातून बाहेर गेला असून तो बाण परत घेतला जाऊ नये म्हणून राज्यात अन्य काही नवे याचिकादार तयार झाले आहेत. या विषयावरून आणखी याचिका सादर होण्याची दाट शक्यता आहे.

सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिरोडा व मांद्रे मतदारसंघात होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये ते भाजपचे उमेदवार असतील. त्यांचे राजीनामा देणे व सभापतींनी तो राजीनामा स्वीकारणे अशा विषयांवरून मगोपने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने मगोपचे नेमके चालले आहे तरी काय असा प्रश्न भाजपच्या नेत्यांना पडला आहे. मगोपशी याच आठवड्यात एक बैठक घ्यावी, असे भाजपच्या कोअर टीमच्या काही सदस्यांनी ठरवले आहे. 

दबावाखाली येऊन मगोपने आता याचिका मागे घेण्याचे राजकारण खेळू नये म्हणून गोव्यातील काही वकील तसेच सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. काही आरटीआय कार्यकर्तेही व काँग्रेसचेही एक आमदार  मगोपनेच मांडलेले मुद्दे हाती घेऊन न्यायालयात याचिका सादर करण्याची शक्यता आहे. त्याविषयी पडद्यामागून रंगीत तालिम सुरू झाली आहे. 

माकडउडय़ा थांबाव्यात : राणेदरम्यान, आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांचे उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच राहिले. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर व अन्य अनेक काँग्रेस आमदारांनी घाटे यांची भेट घेतली व त्यांना पाठींबा दिला. मगोपच्या याचिकेबाबत राणो यांनी पत्रकारांपाशी प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्ष बदलून सरड्याप्रमाणे कुणी रंग बदलू नयेत. योग्य ते कारण नसताना जे पक्ष सोडून जातात, त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यासाठी बंदी असण्यासाठी कायदा होण्याची गरज आहे, असे राणे म्हणाले. लोकशाहीत मतभेद व मतभिन्नता ही असतेच व असावीही पण एक पक्ष सोडून अचानक दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी निदान सबळ व पटण्याजोगे कारण तरी असायला हवे, असे राणे म्हणाले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाPoliticsराजकारण