शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मगोपच्या याचिकेमुळे सरकार गडबडले, आणखीही याचिकादार पुढे सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 19:30 IST

सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

पणजी : सरकारमध्ये राहुनही मगोपने काँग्रेसच्या दोन आमदारांच्या राजीनाम्यांविरुद्ध व भाजपाच्या दोघा संभाव्य उमेदवारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयास याचिका सादर केल्यामुळे सत्ताधारी भाजपप्रणित आघाडी गडबडली आहे. मगोपने हा विषय पुढे नेऊ नये म्हणून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. मात्र, मगोपचा बाण आता धनुष्यातून बाहेर गेला असून तो बाण परत घेतला जाऊ नये म्हणून राज्यात अन्य काही नवे याचिकादार तयार झाले आहेत. या विषयावरून आणखी याचिका सादर होण्याची दाट शक्यता आहे.

सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिरोडा व मांद्रे मतदारसंघात होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये ते भाजपचे उमेदवार असतील. त्यांचे राजीनामा देणे व सभापतींनी तो राजीनामा स्वीकारणे अशा विषयांवरून मगोपने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने मगोपचे नेमके चालले आहे तरी काय असा प्रश्न भाजपच्या नेत्यांना पडला आहे. मगोपशी याच आठवड्यात एक बैठक घ्यावी, असे भाजपच्या कोअर टीमच्या काही सदस्यांनी ठरवले आहे. 

दबावाखाली येऊन मगोपने आता याचिका मागे घेण्याचे राजकारण खेळू नये म्हणून गोव्यातील काही वकील तसेच सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. काही आरटीआय कार्यकर्तेही व काँग्रेसचेही एक आमदार  मगोपनेच मांडलेले मुद्दे हाती घेऊन न्यायालयात याचिका सादर करण्याची शक्यता आहे. त्याविषयी पडद्यामागून रंगीत तालिम सुरू झाली आहे. 

माकडउडय़ा थांबाव्यात : राणेदरम्यान, आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांचे उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच राहिले. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर व अन्य अनेक काँग्रेस आमदारांनी घाटे यांची भेट घेतली व त्यांना पाठींबा दिला. मगोपच्या याचिकेबाबत राणो यांनी पत्रकारांपाशी प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्ष बदलून सरड्याप्रमाणे कुणी रंग बदलू नयेत. योग्य ते कारण नसताना जे पक्ष सोडून जातात, त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यासाठी बंदी असण्यासाठी कायदा होण्याची गरज आहे, असे राणे म्हणाले. लोकशाहीत मतभेद व मतभिन्नता ही असतेच व असावीही पण एक पक्ष सोडून अचानक दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी निदान सबळ व पटण्याजोगे कारण तरी असायला हवे, असे राणे म्हणाले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाPoliticsराजकारण