शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

गंभीर कोविड रुग्णांवर गोमेकॉतच उपचार - विश्वजित राणो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 3:08 PM

आरोग्य मंत्री विश्वजित राणो, आरोग्य सचिव निला मोहनन व डॉ. उदय काकोडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत शुक्रवारी ही माहिती येथे दिली.

पणजी : ज्या कोविड पॉझिटीव्ह रुग्णांची अन्य आजारांमुळे गंभीर अशी स्थिती होते, अशा प्रकारच्या रुग्णांवर आता बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळातच उपचार केले जाणार आहेत. गोमेकॉतील तीन वॉर्ड्स त्यासाठी आरक्षित केले गेले आहेत. आरोग्य यंत्रणोने ज्या दोघा कोविड रुग्णांना सर्वात प्रथम प्लाज्मा थेरपी दिली होती, ते कोरोनामुक्त झाले, त्यांची चाचणी निगेटीव्ह आली.

आरोग्य मंत्री विश्वजित राणो, आरोग्य सचिव निला मोहनन व डॉ. उदय काकोडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत शुक्रवारी ही माहिती येथे दिली. आरोग्य खाते, गोमेकॉ, कोविड इस्पितळ यांची संयुक्त बैठक शुक्रवारी झाली. ज्यांना विविध प्रकारचे गंभीर आजार असतात, त्यांना कोविडची लागण झाल्यानंतर त्यांचाही जीव वाचायला हवा म्हणून काय करता येईल यावर विचार करून एक योजना तयार केली गेली. त्या योजनेनुसार गोमेकॉ इस्पितळातील तीन वॉर्ड्स गंभीर रुग्णांसाठी वापरले जातील. या वॉर्डाची रचनाच अशी आहे, की तिथे कोविड रुग्ण असले म्हणून गोमेकॉत येणा:या इतर व्यक्तींना किंवा रुग्णांना त्याचा संसर्ग होणार नाही. मडगाव येथील ईएसआय इस्पितळातील ज्या रुग्णांना गोमेकॉत उपचारांसाठी नेताच येणार नाही अशा रुग्णांवर ईएसआय इस्पितळातच उपचार केले जातील. श क्रिया झाल्यानंतर कोविडच्या रुग्णांना गोमेकॉत 30 खाटांच्या वॉर्डमध्ये ठेवले जाईल, असे राणो यांनी सांगितले.

एकूण चौदा कोविडग्रस्तांवर आतापर्यत प्लाज्मा थेरपी केली गेली. त्यापैकी ज्या दोघा रुग्णांवर सर्वात अगोदर थेरपी केली गेली होती, त्यांची कोविड चाचणी निगेटीव आली. इतरांची चाचणी यापुढे केली जाईल, असे श्रीमती मोहनन यांनी स्पष्ट केले. डॉ. काकोडकर हे मडगाव येथील ईएसआय इस्पितळाचे प्रमुख आहेत. त्यांनी ईएसआय इस्पितळाविषयीची आकडेवारी दिली व गोव्यात जे कोविडग्रस्तांचे मृत्यू होतात, त्यांचे प्रमाण 1 टक्क्याहून कमी आहे व पूर्ण देशात ते प्रमाण एकदम कमी आहे असे नमूद केले.

ईएसआय इस्पितळात अडिच महिन्यांत रुग्णांवर एकूण 32 प्रसुतीच्या श क्रिया करण्यात आल्या. सातजणांची प्रसुती नॉर्मल पद्धतीने झाली. आतार्पयत कोविड इस्पितळातून 65.8 टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले. एप्रिलमध्ये कोविड इस्पितळ सुरू झाले होते व 1 हजार 126 रुग्ण आतार्पयत या इस्पितळात दाखल झाले. त्यापैकी 65 म्हणजे 5.77 टक्के रुग्णांना मरण आले. ज्यांना अगोदरच अत्यंत गंभीर असे आजार होते व ज्यांना उच्च रक्तदाब, अनेक वर्षे डायबेटीस किंवा किडणीचा आजार होता अशा रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला. समजा या रुग्णांना कोविड झाला नसता तरी त्यांचा मृत्यू त्यांना असलेल्या गंभीर आजारांमुळे झाला असता असा दावा डॉ. काकोडकर यांनी केला. आयसीयूमध्ये एकूण 166 रुग्णांना दाखल करावे लागले, त्यापैकी 41 रुग्णांचा मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा