शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

गोव्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, काँग्रेसवर नामुष्की

By बाळकृष्ण परब | Updated: December 15, 2020 10:18 IST

goa zp election results : सोमवारी जाहीर झालेल्या गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपाने जबरदस्त कामगिरी करत निर्विवाद विजय मिळवला आहे.

ठळक मुद्देगोव्यातील दोन जिल्हा परिषदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ४९ पैकी ३२ जागांवर मिळवला विजयमुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ ४ जागांवर मानावे लागले समाधान आम आदमी पक्षाने गोव्यात आपले खाते उघडताना एका जागेवर मिळवला विजय

पणजी - एकीकडे कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे देशभरात भाजपाविरोधात असंतोष वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे विविध राज्यांत होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बऱ्यापैकी यश मिळत असल्याने भाजपाच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. काल जाहीर झालेल्या गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपाने जबरदस्त कामगिरी करत निर्विवाद विजय मिळवला आहे. गोव्यातील दोन जिल्हा परिषदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ४९ पैकी ३२ जागांवर विजय मिळवला आहे. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. विशेष बाब म्हणजे आम आदमी पक्षाने गोव्यात आपले खाते उघडताना एका जागेवर विजय मिळवला.गोव्यातील ४८ जिल्हा परिषद क्षेत्रात ५० जागा आहेत. मात्र एका ठिकाणी उमेदवाराचे निधन झाल्याने तिथे मतदान झाले नव्हते. जिल्हा परिषदेसाठी १२ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. दरम्यान, या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यामध्ये भाजपाने ३२ जागांवर विजय मिळवला. तर सात ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले. काँग्रेसला चार, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला ३ आणि एनसीपी आणि आम आदमी पक्षाला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला.या निकालांचे वैशिष्ट्य म्हणजे आम आदमी पक्षाने गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रथमच खाते उघडले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष गोव्यामध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक जागांवर उमेदवार उभे करण्याचे लक्ष्य समोर ठेवून वाटचाल करत आहे. गोव्यामध्ये विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत.दरम्यान, गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळवलेल्या विजयामुळे भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही या निकालांबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ग्रामीण मतदारांनी भाजपाचे नेतृत्व आणि राज्य सरकारवर विश्वास दर्शवला आहे, असे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसAAPआप