शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

जनतेचा विकासाला कौल, भाजपचे निर्विवाद वर्चस्व; बॅलेटवर मतदान असूनही विरोधकांना चपराक : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 09:21 IST

खऱ्या अर्थाने हा ग्रामीण भागातील जनतेचा विजय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात राबविण्यात आलेल्या विकासकामांवर विश्वास व्यक्त करत गोव्याच्या जनतेने जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला मोठा कौल दिला आहे. २९ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवत राज्यातील सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. खऱ्या अर्थाने हा ग्रामीण भागातील जनतेचा विजय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने मिळवलेले यश सर्वसामान्य जनतेचा विजय असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंत्री माविन गुदिन्हो, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे व माजी खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते.

विरोधकांना चपराक : सावंत

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, "ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाली असतानाही भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे ईव्हीएमवर आरोप करणाऱ्या विरोधकांना जनतेनेच चपराक दिली आहे." भाजपने यंदा केवळ ४० जागा लढवल्या असून, त्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक जागांवर विजय मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. आम्ही ३० उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला होता, कारण आम्हाला जनतेवर विश्वास होता. आज दोन्ही जिल्ह्यांत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आहे. काँग्रेससह अन्य विरोधकांना जनतेने पूर्णतः नाकारले आहे," असेही मुख्यमंत्री म्हणाले.

'त्या' भागात नव्याने संघटनात्मक बांधणी

डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून केंद्र व राज्य समन्वयाने विकासकामे सुरू असून, आता जिल्हा पातळीवर ट्रिपल इंजिन सरकार जनतेसाठी कार्यरत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. युवा व महिला सशक्तीकरणासह संपूर्ण राज्याचा सर्वांगीण विकास हेच भाजपचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले. काही ठिकाणी अत्यंत कमी मतांनी उमेदवार पराभूत झाले असून, त्या भागांत पुन्हा नव्याने संघटनात्मक काम केले जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

शब्द खरा ठरला : दामू नाईक

जिल्हा पंचायत निवडणुकीत ३० पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील, असा विश्वास मी व्यक्त केला होता. जनतेने तो विश्वास सार्थ ठरवत भाजपच्या २९ उमेदवारांना निवडून दिले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांमुळे भाजपला हा मोठा विजय मिळाला. विरोधकांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Dominates Goa Zilla Panchayat Polls, Voters Back Development.

Web Summary : Riding on development, BJP swept Goa's Zilla Panchayat elections, securing 29 seats. Chief Minister Sawant hailed it as a victory for the people and a rejection of the opposition's EVM claims. He pledged further development through a triple-engine government.
टॅग्स :goaगोवाLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५Pramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाPoliticsराजकारण