शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

म्हादई पाणीप्रश्नी गोवाच जिंकेल : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 20:16 IST

अकारण श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये.

ठळक मुद्देगोवा फॉरवर्ड पक्षाने हरित लवादाकडे धाव घेतल्यानंतर लवादाने दिलेला निवाडा सर्वानीच एकदा वाचून पहावा. राष्ट्रीय हरित लवादाकडे जाऊन फॉरवर्डने गोव्याचे नुकसान केले, त्यांचा मुद्दा लवादाने मान्य केला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पणजी : म्हादई पाणीप्रश्नीगोवाच जिंकणार आहे. विजय हा गोव्याचाच होईल, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला. तसेच त्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाला दोष दिला. राष्ट्रीय हरित लवादाकडे जाऊन फॉरवर्डने गोव्याचे नुकसान केले, त्यांचा मुद्दा लवादाने मान्य केला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

म्हादई पाणीप्रश्नी माझा केंद्र सरकारवर पूर्ण विश्वास आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, की म्हादई पाणीप्रश्नी सर्वानीच थोडे थांबावे. किंचित कळ सोसावी. माझा केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावरही विश्वास आहे. गोवाच जिंकणार याची मला पूर्ण खात्री आहे. सध्या मी काही बोलत नाही पण गोव्याचा विजय झाल्यानंतर बोलेन. मग मात्र भलत्यांनीच कुणी यशाचे श्रेय घेऊ नये. जे काळे फलक हाती घेऊन रस्त्यावर येतात त्यांनी स्वत: साठी गोवा जिंकला असे समजू नये. अकारण श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये.

मुख्यमंत्री म्हणाले, की गोवा फॉरवर्ड पक्षाने हरित लवादाकडे धाव घेतल्यानंतर लवादाने दिलेला निवाडा सर्वानीच एकदा वाचून पहावा. फॉरवर्डने लवादाकडे जाऊन गोव्याची हानी केली. हानी कशी झाली ते आपण नंतर सांगेन. तूर्त निवाडा वाचल्यावरही कुणालाही मी काय सांगतोय ते कळेल.

राजकारण करू नका - विजय दरम्यान, फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीही मुख्यमंत्र्यांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी म्हादईप्रश्नी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी गोवा फॉरवर्डची हरित लवादाकडे जाण्याची कृती ही राजकारण करण्याच्या चष्म्यातून पाहू नये. आम्ही लवादाकडे गेल्यानंतरच आम्हाला केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयास पत्र पाठविण्यासाठी आधार मिळाला. लवादाने आमची याचिका फेटाळली नाही, असे सरदेसाई म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने विधाने करावीत, कारण हा म्हादई नदीविषयीचा प्रश्न आहे. आम्ही सर्व गोमंतकीयांनी याबाबत एकत्र यायला हवे. जेव्हा आमची याचिका लवादासमोर आली तेव्हा मुख्यमंत्र्यांचा वकील किंवा सरकारचा वकील लवादासमोर का उपस्थित राहिला नाही ते सावंत यांनी सांगावे. वकीलाने अनुपस्थित राहून गोव्याचे कोणते कल्याण केले ते सांगावे. आम्ही म्हादईप्रश्नी आमची लढाई सुरूच ठेवू. मुख्यमंत्र्यांना म्हादईचे काही पडलेले नाही, अशा प्रकारचा नेता मुख्यमंत्रीपदी यापुढेही राहणे हे गोव्यासाठी घातक आहे, असे सरदेसाई म्हणाले.

टॅग्स :goaगोवाWaterपाणीPramod Sawantप्रमोद सावंतChief Ministerमुख्यमंत्री