शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

विद्यार्थ्यांना आता पाणी पिण्यास दोन मिनिटांची सुट्टी, शिक्षण खात्याचं परिपत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 22:40 IST

- शिक्षण खात्याचे परिपत्रक जारी : विद्यार्थ्यांमध्ये डिहायड्रेशन दिसून आल्याने उपाय 

पणजी : गोव्यात विद्यार्थ्यांमध्ये डिहायड्रेशन दिसून आल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आता दर दुसºया आणि सहाव्या पिरीयडनंतर पाणी पिण्यासाठी दोन मिनिटांची सुट्टी दिली जाणार आहे. केरळमध्ये ही पध्दत सुरु झाल्यानंतर दक्षिण भारतात तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा राज्यांनीही ही पध्दत अवलंबिली आहे. 

शिक्षण खात्याने यासंबंधीचे परिपत्रक काढले असून राज्यातील सर्व शाळा, विद्यालयांना पाठवले आहे. विद्यार्थी वर्गात असताना पुरेसे पाणी पित नाहीत त्यामुळे डिहायड्रेशन होऊन त्यांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात त्यामुळे सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना दर दुसºया आणि सहाव्या पिरीयडनंतर बेल वाजवून पाणी पिण्याकरिता दोन मिनिटांसाठी ब्रेक द्यावा, असे निर्देश या परिपत्रकात देण्यात आले आहेत. राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित तसेच बिगर अनुदानित प्राथमिक, मिडल स्कूल, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शाळांनाही हा आदेश लागू असल्याचे शिक्षण खात्याचे उपसंचालक शैलेश शेणवी झिंगडे यांनी म्हटले आहे. 

विद्यार्थ्यांना शाळेत पिण्यायोग्य शुध्द पाण्याची सोय करावी लागणार आहे. वर्ग सुरु झाल्यानंतर 

डिहायड्रेशनमुळे काय होते? 

शरिराला पाण्याची गरज असते. पुरेसे पाणी न पिल्यास लहान मुलांमध्ये आरोग्यावर विपरित परिणाम होतो. ओठ सुकणे, ओठांना भेगा पडणे, लघवीचा रंग बदलणे, लघवी न होणे, त्त्वचा थंड अथवा कोरडी पडणे, अतिनिद्रा, रडू आले तरी अश्रू न येणे आदी गोष्टी दिसून येतात. उन्हाळ्यात किंवा उकाड्यामुळे जास्त घाम आल्यास, उलट्या किंवा अतिसारामुळे तसेच सतत लघवी झाल्यास शरिरातील पाण्याची प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशन होते. 

टॅग्स :goaगोवाWaterपाणीSchoolशाळा