शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

महागठबंधनाचा परिणाम शून्य, 2004 साली आम्ही कमी पडलो : भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 18:24 IST

भाजपाच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर विविध पक्ष एकत्र आले तरी, कथित महागठबंधनाचा परिणाम हा शून्य आहे. भाजपाच यावेळीही जिंकेल. 2004 साली अटलबिहारी वाजपेयी हे लोकप्रिय नेते आमच्याकडे असले तरी, त्यावेळी वाजपेयी सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो व त्यामुळे पराभव वाट्याला आला, असे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी शनिवारी सांगितले.

पणजी : भाजपाच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर विविध पक्ष एकत्र आले तरी, कथित महागठबंधनाचा परिणाम हा शून्य आहे. भाजपाच यावेळीही जिंकेल. 2004 साली अटलबिहारी वाजपेयी हे लोकप्रिय नेते आमच्याकडे असले तरी, त्यावेळी वाजपेयी सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो व त्यामुळे पराभव वाट्याला आला, असे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी शनिवारी सांगितले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि इतरांच्या उपस्थितीत हुसैन यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. मोदी सरकारने बजावलेली कामगिरी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. लोकसभेच्या तीनशे जागा जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे. तीन राज्यांमध्ये आमचा थोडक्यात पराभव झाला तरी, लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही जिंकणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही लोकसभेच्या 74 जागा जिंकू. 2004 साली भाजपाने राजस्तान, मध्य प्रदेश व छत्तीसगढ या तीन राज्यांत विधानसभा निवडणुकीवेळी विजय प्राप्त केला होता पण लगेच लोकसभा निवडणुकीत आम्ही हरलो होतो. त्यावेळी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मी देखील होतो. वाजपेयींची लोकप्रियता कमी झाली नव्हती, आम्ही त्यांची कामे लोकांर्पयत पोहचविण्यात कमी पडलो होतो, असे हुसैन म्हणाले.

ममता बॅनर्जी यांनी शनिवारी सभा घेतली. त्या सभेला जे उपस्थित राहिले, तेवढेच राजकीय पक्ष विरोधकांच्या महाआघाडीमध्ये आहेत, बाकीचे सर्व मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा आघाडीसोबत आहेत. आमच्याकडे मोदींसारखा लिडर आहे तर विरोधी आघाडीकडे डिलर आहे, अशी टीका हुसैन यांनी केली. ज्यांची पंतप्रधान बनण्याची इच्छा अपुरी राहिली असेच नेते विरोधी आघाडीकडे आहेत. ते भ्रष्टाचारी आहेत. मोदी सरकारच्या काळात हिंदू,ख्रिस्ती, मुस्लिम अशा सर्वांना समान वागणूक मिळाली आहे, असे हुसैन म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसgoaगोवा