शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

गोवा : सिंधुदुर्ग,कारवारमधील मासळी व्यापाऱ्यांसाठी आयात निर्बंध शिथिल करा - शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 13:38 IST

सिंधुदुर्ग आणि कारवार येथील मासळी आयातीसाठी राज्य सरकारने मुभा द्यावी तसेच गेल्या १२ जुलै रोजी मडगावच्या घाऊक मासळी बाजारात मासळीमध्ये सापडलेल्या फॉर्मेलीन प्रकरणात जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कारवाई करावी, प्रसंगी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी राज्य शिवसेनेने केली आहे.

पणजी :  सिंधुदुर्ग आणि कारवार येथील मासळी आयातीसाठी राज्य सरकारने मुभा द्यावी तसेच गेल्या १२ जुलै रोजी मडगावच्या घाऊक मासळी बाजारात मासळीमध्ये सापडलेल्या फॉर्मेलीन प्रकरणात जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कारवाई करावी, प्रसंगी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी राज्य शिवसेनेने केली आहे.

पत्रकार परिषदेत शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत म्हणाले की, सिंधुदुर्गातील छोट्या मत्स्य व्यवसायिकांना गोव्यात त्यांची मासळी आणण्यासाठी आयात निर्बंध शिथिल करावेत, अशी विनंती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याशी संपर्क साधून केली होती. गोवा शिवसेना नेत्यांनाही त्यांनी या प्रकरणी मध्यस्थीचे आवाहन केले होते. त्यानंतर पक्षाचे सरचिटणीस मिलिंद गावस आरोग्यमंत्र्यांना भेटले आणि सिंधुदुर्गातील छोट्या मत्स्य व्यावसायिकां समोर निर्माण झालेली समस्या त्यांना सांगितली. मालवण आदी भागातून येणारी मासळी अवघ्या काही तासात गोव्यात पोचते. त्यामुळे आयातीसाठी इन्सुलेटेड वाहन किंवा एफडीए नोंदणीची सक्ती या छोट्या व्यावसायिकांना असू नये, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

कारवार, उडुपी भागातूनही काही तासात गोव्यात मासळी येते त्यामुळे त्या भागातील मासळी व्यापाऱ्यांनाही निर्बंध असू नयेत, असे कामत म्हणाले. फॉरमॅलीनच्या प्रश्नावर ते म्हणाले की, १२ जुलै रोजी झालेल्या घटनेनंतर सर्वप्रथम राज्य शिवसेनेनेच फातोर्डा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली परंतु अजून गुन्हेगारांना शासन झालेले नाही.

मानवी पार्थिव देह टिकवून ठेवण्यासाठी वापरले जाणारे फॉरमॅलिन हे रसायन मासळी टिकून राहावी यासाठी वापरले जाते. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा या भागातून गोव्यात येणाऱ्या मासळीमध्ये फॉर्मेलीन असल्याचा संशय आहे. १२ जुलैच्या घटनेनंतर लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शिवसेनेचे म्हणणे असे आहे की, कोणीही जनतेच्या आरोग्याशी खेळू नये. शेजारी राज्यात सीमा भागात असलेले मत्स्यव्यवसायिक त्यांची मासळी घेऊन काही तासात गोव्यात पोहोचत असल्याने त्यांना ही सक्ती नको.

गोव्यात येणाऱ्या मासळीबाबतचा कोणताही तपशील राज्य सरकारकडे उपलब्ध नाही. आपल्या आरटीआय अर्जाला खुद्द सरकारकडूनच असे उत्तर मिळाले आहे, असे कामत यांनी नमूद केले. ते म्हणाले की, गोव्यातील मासे उत्पादन गोवेकरांसाठी पुरेसे आहे का याबाबत अभ्यास होणे आवश्यक आहे.

येत्या सोमवारी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग आणि कारवार मासळी व्यवसायिकांचा सहानुभूतीने विचार करावा आणि त्यांना मुभा द्यावी अशी मागणी करताना आयात किंवा निर्यात बंद करून फॉरमॅलिन प्रश्न सुटणार नाही. गुन्हेगारांना आधी पकडा, असे आवाहन त्यांनी केले पत्रकार परिषदेत शिवसेनेचे राज्य प्रसिद्धी समन्वयक मनोज सावंत हेही उपस्थित होते.

टॅग्स :fishermanमच्छीमारgoaगोवाsindhudurgसिंधुदुर्ग