शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

गोव्यात खासगी बसगाडय़ा भाडय़ाने सरकारला देण्याचा प्रस्ताव फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 7:53 PM

वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी गेल्या आठवडय़ात दोन बैठका घेतल्या होत्या.

पणजी : राज्यातील खासगी बसगाडय़ा भाडेपट्टीवर घेण्याची सरकारची सूचना बहुतेक बस व्यवसायिकांना मान्य नाही. सरकार फक्त हवा तयार करत आहे अशी बस मालकांची भावना बनली आहे. कर्ज घेताना बँकांसोबत खासगी बसगाडय़ा व्यवसायिकांचा करार झालेला असल्याने सरकारकडे आणखी वेगळा करार आम्ही करू शकत नाही असे बस मालकांचे म्हणणे आहे.

वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी गेल्या आठवडय़ात दोन बैठका घेतल्या होत्या. वास्को व पर्वरीत झालेल्या बैठकीवेळी खासगी बसेस सरकार कदंब महामंडळामार्फत चालविण्यास तयार आहे, असे मंत्री गुदिन्हो यांनी त्या बैठकांमध्ये बस व्यवसायिकांना सांगितले होते. बस मालक संघटनेचे काही पदाधिकारी त्या बैठकीत सहभागी झाले होते. कदंब वाहतूक महामंडळ व वाहतूक खात्याचेही अधिकारी उपस्थित होते. कदंब महामंडळ खासगी बस मालकांच्या बसेस घेईल व भाडय़ाने चालवेल व दर महिन्याला बस मालकांना काय ते भाडे देईल, असे मंत्री गुदिन्हो यांचे म्हणणो होते. गोव्यातील बस मालकांनी सरकारच्या या प्रस्तावाविषयी चर्चा केली. मात्र हे शक्य नाही असे बस मालकांचे म्हणणो आहे.

बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदिप ताम्हणकर सोमवारी लोकमतशी बोलताना म्हणाले, की बस मालकांनी बँकांशी करार केले, अनेककडे सह्या केल्या व मग कर्ज मिळाले. कर्जावरच अनेक बसगाडय़ा चालतात. अशास्थितीत सरकारशी भाडेपट्टीचा करार करणो हे कायद्यात बसणारे नाहीत. अनेक कायदेशीर गुंतागुंत त्यात आहे. सरकार उगाच हवा तयार करतेय. जे सरकार 2017 सालापासून बस मालकांना सरकारी अनुदान योजनेंतर्गत एकही पैसा देऊ शकलेले नाही ते सरकार बस मालकांना दर महिन्याला भाडय़ाचे पुरेसे पैसे देणार हा आजच्या काळात मोठा विनोदच वाटतो. लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्रीपदी असताना बसमालकांना दोन- अडिच लाख रुपये मिळाले होते. मनोहर र्पीकर व आता प्रमोद सावंत यांच्या काळात काहीच मिळाले नाही. त्यामुळे खासगी बसगाडय़ा भाडय़ाने घेणो ह्या सरकारच्या नुसत्या हवेतल्या बाताच वाटतात.

150 बसेस रस्त्यावरदरम्यान, प्रवाशांची संख्या आता वाढत आहे. सरकारने सध्याच्या स्थितीत बस मालक अडचणीत आहेत व आपण त्यावर उपाय काढायला हवा असा विचारच केला नाही. आम्ही पुढाकार घेतला व त्यामुळे खासगी बसगाडय़ा रस्त्यावर आल्या. आता लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला व लोक बसमधून प्रवास करू लागले आहेत. यापुढे ही संख्या वाढेल. सध्या प्रत्येक मार्गावर तीन ते चार बसेस धावतात. यापुढे आणखी धावतील. दीडशे ते एकशे सत्तर बसगाडय़ा सोमवारपासून रस्त्यावर धावण्यास आरंभ झाला, असे ताम्हणकर यांनी सांगितले. स्थलांतरित मजुरांनी गोवा सोडल्यामुळे प्रवाशांची संख्या घटली आहेच. तो मोठा परिणाम आहेच पण एकदा शैक्षणिक वर्ष सुरू झाले की विद्यार्थी व सरकारी कर्मचारीही प्रवासी म्हणून बसेसना लाभतील असे ताम्हणकर म्हणाले.