शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काठावरील बहुमतामुळे गोवा सरकारची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 12:34 IST

गोव्यातील चार विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा निकाल येत्या 23 मे रोजी लागेल. त्याचवेळी केंद्रात कुणाचे सरकार येणार तेही 23 रोजीच ठरणार आहे

पणजी : गोव्यातील चार विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा निकाल येत्या 23 मे रोजी लागेल. त्याचवेळी केंद्रात कुणाचे सरकार येणार तेही 23 रोजीच ठरणार आहे. गोवा सरकारकडे सध्या काठावरचे बहुमत आहे. चार मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल आणि लोकसभा निवडणुकांचा निकाल कसा लागेल यावर गोवा सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. जर केंद्रात सत्ताबदल झाला किंवा गोव्यातील पोटनिवडणुकीत चारपैकी दोन जागा गमवाव्या लागल्या तर गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार धोक्यात येऊ शकते याची कल्पना भाजपसह अन्य पक्षीय मंत्री, आमदारांनाही आली आहे. सध्या काठावरील बहुमत घेऊन सावंत सरकारने स्थिर राहण्याची कसरत चालवली आहे.

गोव्यातील भाजपप्रणीत आघाडी सरकारचे संख्याबळ सध्या वीस आहे. चाळीस सदस्यीय गोवा विधानसभेत एकवीस आमदारांचे संख्याबळ असणे गरजेचे आहे. वीसपैकी भाजपकडे स्वत:चे फक्त चौदा आमदार आहेत. तीन अपक्ष आहेत व त्या तिघांपैकी प्रसाद गावकर हे अपक्ष आमदार नावापुरतेच सरकारसोबत आहेत. केंद्रात सत्ताबदल झाला तर गोव्यात गावकर यांना बाजू बदलण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही. गोवा फॉरवर्डचे तीन आमदार भाजपप्रणीत आघाडी सरकारचा भाग आहेत. विरोधी काँग्रेसकडेही चौदा आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक आमदार आहे. मगो पक्षाकडे एक आमदार आहे. मगोपने भाजपविरुद्ध दंड थोपटले आहेत. मांद्रे, शिरोडा, म्हापसा या तीन मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत व येत्या 19 रोजी पणजीसाठी पोटनिवडणूक होत आहे. 

चारही मतदारसंघांतील निवडणुकीचा निकाल येत्या 23 रोजी लागेल, त्यावेळी चारही जागा भाजपने जिंकल्या तर आघाडीचे संख्याबळ चोवीस होईल. दोन जागा जिंकल्या तर बावीस होईल. मात्र बावीस हे देखील काठावरील संख्याबळ आहे. गोव्यात जर चारही जागा भाजप जिंकला पण केंद्रात एनडीएचे सरकार पुन्हा येऊ शकले नाही तर मात्र गोव्यात सरकारची स्थिरता धोक्यात आणण्याचा  प्रयत्न विरोधी पक्ष करील. काँग्रेसकडे चौदा आमदार असले तरी, मगोप व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक आमदार आणि अपक्ष प्रसाद गावकर असे जमेस धरल्यास विरोधकांचे संख्याबळ सतरा होईल. जर चारपैकी तीन जागा काँग्रेसने जिंकल्या किंवा त्या तीन जागांपैकी एक जागा मगोपने जिंकली तर विरोधकांचे संख्याबळ वीस होणार आहे. अशा स्थितीत गोव्यात सरकार स्थिर ठेवणे हे मुख्यमंत्री सावंत यांच्यासाठी मोठे अग्नीदिव्य ठरेल. अर्थात या सगळ्या जर-तरच्या गोष्टी आहेत पण राज्यातील बहुतेक मंत्री व आमदार 23 रोजी काय घडेल यावर लक्ष ठेवून आहेत. सर्वानाच सरकारची सध्याची स्थिती ठाऊक आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी मात्र गोवा सरकार उरलेला तीन वर्षाचा कार्यकाळ निश्चितच पूर्ण करील असा विश्वास व्यक्त केला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgoaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस