शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

काठावरील बहुमतामुळे गोवा सरकारची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 12:34 IST

गोव्यातील चार विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा निकाल येत्या 23 मे रोजी लागेल. त्याचवेळी केंद्रात कुणाचे सरकार येणार तेही 23 रोजीच ठरणार आहे

पणजी : गोव्यातील चार विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा निकाल येत्या 23 मे रोजी लागेल. त्याचवेळी केंद्रात कुणाचे सरकार येणार तेही 23 रोजीच ठरणार आहे. गोवा सरकारकडे सध्या काठावरचे बहुमत आहे. चार मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल आणि लोकसभा निवडणुकांचा निकाल कसा लागेल यावर गोवा सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. जर केंद्रात सत्ताबदल झाला किंवा गोव्यातील पोटनिवडणुकीत चारपैकी दोन जागा गमवाव्या लागल्या तर गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार धोक्यात येऊ शकते याची कल्पना भाजपसह अन्य पक्षीय मंत्री, आमदारांनाही आली आहे. सध्या काठावरील बहुमत घेऊन सावंत सरकारने स्थिर राहण्याची कसरत चालवली आहे.

गोव्यातील भाजपप्रणीत आघाडी सरकारचे संख्याबळ सध्या वीस आहे. चाळीस सदस्यीय गोवा विधानसभेत एकवीस आमदारांचे संख्याबळ असणे गरजेचे आहे. वीसपैकी भाजपकडे स्वत:चे फक्त चौदा आमदार आहेत. तीन अपक्ष आहेत व त्या तिघांपैकी प्रसाद गावकर हे अपक्ष आमदार नावापुरतेच सरकारसोबत आहेत. केंद्रात सत्ताबदल झाला तर गोव्यात गावकर यांना बाजू बदलण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही. गोवा फॉरवर्डचे तीन आमदार भाजपप्रणीत आघाडी सरकारचा भाग आहेत. विरोधी काँग्रेसकडेही चौदा आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक आमदार आहे. मगो पक्षाकडे एक आमदार आहे. मगोपने भाजपविरुद्ध दंड थोपटले आहेत. मांद्रे, शिरोडा, म्हापसा या तीन मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत व येत्या 19 रोजी पणजीसाठी पोटनिवडणूक होत आहे. 

चारही मतदारसंघांतील निवडणुकीचा निकाल येत्या 23 रोजी लागेल, त्यावेळी चारही जागा भाजपने जिंकल्या तर आघाडीचे संख्याबळ चोवीस होईल. दोन जागा जिंकल्या तर बावीस होईल. मात्र बावीस हे देखील काठावरील संख्याबळ आहे. गोव्यात जर चारही जागा भाजप जिंकला पण केंद्रात एनडीएचे सरकार पुन्हा येऊ शकले नाही तर मात्र गोव्यात सरकारची स्थिरता धोक्यात आणण्याचा  प्रयत्न विरोधी पक्ष करील. काँग्रेसकडे चौदा आमदार असले तरी, मगोप व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक आमदार आणि अपक्ष प्रसाद गावकर असे जमेस धरल्यास विरोधकांचे संख्याबळ सतरा होईल. जर चारपैकी तीन जागा काँग्रेसने जिंकल्या किंवा त्या तीन जागांपैकी एक जागा मगोपने जिंकली तर विरोधकांचे संख्याबळ वीस होणार आहे. अशा स्थितीत गोव्यात सरकार स्थिर ठेवणे हे मुख्यमंत्री सावंत यांच्यासाठी मोठे अग्नीदिव्य ठरेल. अर्थात या सगळ्या जर-तरच्या गोष्टी आहेत पण राज्यातील बहुतेक मंत्री व आमदार 23 रोजी काय घडेल यावर लक्ष ठेवून आहेत. सर्वानाच सरकारची सध्याची स्थिती ठाऊक आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी मात्र गोवा सरकार उरलेला तीन वर्षाचा कार्यकाळ निश्चितच पूर्ण करील असा विश्वास व्यक्त केला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgoaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस