शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील 1 टन टाकाऊ साबण टिकावू बनणार, नवा उपक्रम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 20:17 IST

राज्यभरातील पंचतारांकित आणि अन्य मोठय़ा हॉटेलांमध्ये फक्त एक-दोनवेळा वापरून जे साबण टाकून दिले जातात, त्या साबणांचा वापर आता चांगल्या कामासाठी केला जाणार आहे.

पणजी - राज्यभरातील पंचतारांकित आणि अन्य मोठय़ा हॉटेलांमध्ये फक्त एक-दोनवेळा वापरून जे साबण टाकून दिले जातात, त्या साबणांचा वापर आता चांगल्या कामासाठी केला जाणार आहे. हे साबण कच:यातून फेकून न देता त्यांच्यावर प्रक्रिया करून हे साबण नव्या रुपात अत्यंत गरीब विद्यार्थी व महाराष्ट्र आणि अन्य भागांतील आदिवासींच्या मुलांसाठी दिले जाणार आहेत.

मुंबईत असा प्रयोग यशस्वी झाला आहे. तसाच प्रयोग आता गोव्यात केला जाणार असून त्याचा आरंभ झाला आहे. गोवा सरकारचे कचरा व्यवस्थापन महामंडळ, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा आणि चेंबर ऑफ कॉमर्स संघटना यांनी मिळून सुंदर इंडिया नावाच्या संस्थेला या कामी मदत करावी असे ठरवले आहे. शुक्रवारी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केनेथ डिसोझा यांनी सरकारच्या कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीत रॉड्रीग्ज, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल संघटनेचे अध्यक्ष सावियो मासायस व इतरांसोबत येथे पत्रकार परिषद घेतली. गोव्यातील हॉटेलना साबण गोळा करून एकत्र ठेवण्याची सूचना केल्यानंतर काम सुरूही झाले आहे, असे मासायस यांनी सांगितले.

एरव्ही जे साबण टाकून दिले जातात, ते मग साळगावच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये येत असतात. मोठय़ा प्रमाणात टाकाऊ साबण येतात. या साबणांवर प्रक्रिया करून नव्या रुपात जर साबण आले व ते कुणाच्या तरी उपयोगासाठी पुन्हा आले तर पर्यावरणाचेही रक्षण होईल, असे संजीत रॉड्रीग्ज म्हणाले. महामंडळाकडून सुंदर इंडिया चॅरिटेबल ट्रस्टला या कामी सहाय्य केले जाईल. साबण एकत्र गोळा करून कुठे ठेवावे ते निश्चित केले जाईल. तिथून मग टाकाऊ साबणांची एकत्रितपणो वाहतूक केली जाईल. गोव्यात महिन्याला 1 टन टाकाऊ साबण गोळा होतील, असा विश्वास रॉड्रीगीज यांनी व्यक्त केला.

केनेथ डिसोझा म्हणाले, की अगदी छोटय़ा हॉटेलांमध्ये साबण पूर्णपणो वापरले जातात पण मोठय़ा हॉटेलांमध्ये खूपच कमी वापरून टाकून दिले जातात. अम्ही मुंबईला अशा साबणांवर प्रक्रिया करतो. त्यांना पूर्णपणो नवे रुप दिले जाते. हे साबण वापरण्यास योग्य आहेत अशा प्रकारचे प्रमाणपत्र शासकीय यंत्रणोकडून प्राप्त केले जाते. त्यानंतरच त्यांचे वितरण मोफतपणो आदिवासींची मुले व अन्य गरीब घटकांची मुले यांच्यासाठी केला जातो. देशात अनेक भाग असे आहेत, जिथे अत्यंत गरीब मुले साबणाचा वापरच करत नाहीत. कारण त्यांना साबण आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. अशा मुलांसाठी आम्ही काम करतो.

टॅग्स :goaगोवाnewsबातम्या