शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

गोव्यातील 1 टन टाकाऊ साबण टिकावू बनणार, नवा उपक्रम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 20:17 IST

राज्यभरातील पंचतारांकित आणि अन्य मोठय़ा हॉटेलांमध्ये फक्त एक-दोनवेळा वापरून जे साबण टाकून दिले जातात, त्या साबणांचा वापर आता चांगल्या कामासाठी केला जाणार आहे.

पणजी - राज्यभरातील पंचतारांकित आणि अन्य मोठय़ा हॉटेलांमध्ये फक्त एक-दोनवेळा वापरून जे साबण टाकून दिले जातात, त्या साबणांचा वापर आता चांगल्या कामासाठी केला जाणार आहे. हे साबण कच:यातून फेकून न देता त्यांच्यावर प्रक्रिया करून हे साबण नव्या रुपात अत्यंत गरीब विद्यार्थी व महाराष्ट्र आणि अन्य भागांतील आदिवासींच्या मुलांसाठी दिले जाणार आहेत.

मुंबईत असा प्रयोग यशस्वी झाला आहे. तसाच प्रयोग आता गोव्यात केला जाणार असून त्याचा आरंभ झाला आहे. गोवा सरकारचे कचरा व्यवस्थापन महामंडळ, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा आणि चेंबर ऑफ कॉमर्स संघटना यांनी मिळून सुंदर इंडिया नावाच्या संस्थेला या कामी मदत करावी असे ठरवले आहे. शुक्रवारी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केनेथ डिसोझा यांनी सरकारच्या कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीत रॉड्रीग्ज, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल संघटनेचे अध्यक्ष सावियो मासायस व इतरांसोबत येथे पत्रकार परिषद घेतली. गोव्यातील हॉटेलना साबण गोळा करून एकत्र ठेवण्याची सूचना केल्यानंतर काम सुरूही झाले आहे, असे मासायस यांनी सांगितले.

एरव्ही जे साबण टाकून दिले जातात, ते मग साळगावच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये येत असतात. मोठय़ा प्रमाणात टाकाऊ साबण येतात. या साबणांवर प्रक्रिया करून नव्या रुपात जर साबण आले व ते कुणाच्या तरी उपयोगासाठी पुन्हा आले तर पर्यावरणाचेही रक्षण होईल, असे संजीत रॉड्रीग्ज म्हणाले. महामंडळाकडून सुंदर इंडिया चॅरिटेबल ट्रस्टला या कामी सहाय्य केले जाईल. साबण एकत्र गोळा करून कुठे ठेवावे ते निश्चित केले जाईल. तिथून मग टाकाऊ साबणांची एकत्रितपणो वाहतूक केली जाईल. गोव्यात महिन्याला 1 टन टाकाऊ साबण गोळा होतील, असा विश्वास रॉड्रीगीज यांनी व्यक्त केला.

केनेथ डिसोझा म्हणाले, की अगदी छोटय़ा हॉटेलांमध्ये साबण पूर्णपणो वापरले जातात पण मोठय़ा हॉटेलांमध्ये खूपच कमी वापरून टाकून दिले जातात. अम्ही मुंबईला अशा साबणांवर प्रक्रिया करतो. त्यांना पूर्णपणो नवे रुप दिले जाते. हे साबण वापरण्यास योग्य आहेत अशा प्रकारचे प्रमाणपत्र शासकीय यंत्रणोकडून प्राप्त केले जाते. त्यानंतरच त्यांचे वितरण मोफतपणो आदिवासींची मुले व अन्य गरीब घटकांची मुले यांच्यासाठी केला जातो. देशात अनेक भाग असे आहेत, जिथे अत्यंत गरीब मुले साबणाचा वापरच करत नाहीत. कारण त्यांना साबण आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. अशा मुलांसाठी आम्ही काम करतो.

टॅग्स :goaगोवाnewsबातम्या