शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

गोव्यातील 1 टन टाकाऊ साबण टिकावू बनणार, नवा उपक्रम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 20:17 IST

राज्यभरातील पंचतारांकित आणि अन्य मोठय़ा हॉटेलांमध्ये फक्त एक-दोनवेळा वापरून जे साबण टाकून दिले जातात, त्या साबणांचा वापर आता चांगल्या कामासाठी केला जाणार आहे.

पणजी - राज्यभरातील पंचतारांकित आणि अन्य मोठय़ा हॉटेलांमध्ये फक्त एक-दोनवेळा वापरून जे साबण टाकून दिले जातात, त्या साबणांचा वापर आता चांगल्या कामासाठी केला जाणार आहे. हे साबण कच:यातून फेकून न देता त्यांच्यावर प्रक्रिया करून हे साबण नव्या रुपात अत्यंत गरीब विद्यार्थी व महाराष्ट्र आणि अन्य भागांतील आदिवासींच्या मुलांसाठी दिले जाणार आहेत.

मुंबईत असा प्रयोग यशस्वी झाला आहे. तसाच प्रयोग आता गोव्यात केला जाणार असून त्याचा आरंभ झाला आहे. गोवा सरकारचे कचरा व्यवस्थापन महामंडळ, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा आणि चेंबर ऑफ कॉमर्स संघटना यांनी मिळून सुंदर इंडिया नावाच्या संस्थेला या कामी मदत करावी असे ठरवले आहे. शुक्रवारी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केनेथ डिसोझा यांनी सरकारच्या कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीत रॉड्रीग्ज, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल संघटनेचे अध्यक्ष सावियो मासायस व इतरांसोबत येथे पत्रकार परिषद घेतली. गोव्यातील हॉटेलना साबण गोळा करून एकत्र ठेवण्याची सूचना केल्यानंतर काम सुरूही झाले आहे, असे मासायस यांनी सांगितले.

एरव्ही जे साबण टाकून दिले जातात, ते मग साळगावच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये येत असतात. मोठय़ा प्रमाणात टाकाऊ साबण येतात. या साबणांवर प्रक्रिया करून नव्या रुपात जर साबण आले व ते कुणाच्या तरी उपयोगासाठी पुन्हा आले तर पर्यावरणाचेही रक्षण होईल, असे संजीत रॉड्रीग्ज म्हणाले. महामंडळाकडून सुंदर इंडिया चॅरिटेबल ट्रस्टला या कामी सहाय्य केले जाईल. साबण एकत्र गोळा करून कुठे ठेवावे ते निश्चित केले जाईल. तिथून मग टाकाऊ साबणांची एकत्रितपणो वाहतूक केली जाईल. गोव्यात महिन्याला 1 टन टाकाऊ साबण गोळा होतील, असा विश्वास रॉड्रीगीज यांनी व्यक्त केला.

केनेथ डिसोझा म्हणाले, की अगदी छोटय़ा हॉटेलांमध्ये साबण पूर्णपणो वापरले जातात पण मोठय़ा हॉटेलांमध्ये खूपच कमी वापरून टाकून दिले जातात. अम्ही मुंबईला अशा साबणांवर प्रक्रिया करतो. त्यांना पूर्णपणो नवे रुप दिले जाते. हे साबण वापरण्यास योग्य आहेत अशा प्रकारचे प्रमाणपत्र शासकीय यंत्रणोकडून प्राप्त केले जाते. त्यानंतरच त्यांचे वितरण मोफतपणो आदिवासींची मुले व अन्य गरीब घटकांची मुले यांच्यासाठी केला जातो. देशात अनेक भाग असे आहेत, जिथे अत्यंत गरीब मुले साबणाचा वापरच करत नाहीत. कारण त्यांना साबण आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. अशा मुलांसाठी आम्ही काम करतो.

टॅग्स :goaगोवाnewsबातम्या