शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
3
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
4
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
7
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
8
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
9
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
10
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
11
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
12
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
13
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
14
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
15
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
16
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
17
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
18
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
19
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
20
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालय आणि सत्याचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 10:44 IST

दहा कोटी रुपयांचा खर्च करून मुख्यमंत्री सावंत यांनी जी नवी व्यवस्था तयार केली, ती कायमस्वरूपी राहील. 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नव्या मंत्रालयाचे मंगळवारी धूमधडाक्यात उद्घाटन केले, मिनिस्टर ब्लॉकचे नामकरण आता मंत्रालय' झाले आहे. नामकरण चांगलेच आहे. दहा कोटी रुपयांचा खर्च करून मुख्यमंत्री सावंत यांनी जी नवी व्यवस्था तयार केली, ती कायमस्वरूपी राहील. 

मुख्यमंत्रिपदाला साजेसे कार्यालय अस्तित्वात येणे यात काही गैर नाही. अर्थात सरकारने काटकसर करावी, पैशांची बचत करावी ही जनतेची अपेक्षादेखील अयोग्य नाही. गोवा फॉरवर्डने तर सरकारवर टीकाच केली. गरिबांना तीन सिलिंडर मोफत देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत; पण मंत्रालयावर दहा कोटी रुपये खर्च केले जातात, असा फॉरवर्डचा आक्षेप आहे. अर्थात सरकारी खर्च किंवा उधळपट्टी यावर आता जास्त चर्चा करण्यासारखी स्थिती नाही. कारण सरकार काँग्रेसचे असो किंवा भाजपचे प्रचंड खर्च करणे हा आपला हक्कच आहे, असे प्रत्येक राज्यकर्त्याला वाटू लागले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना भाजपने कथित उधळपट्टीविषयी टार्गेट केले आहे. 

गोव्यात तुलनेने खर्च कमी झाला. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी देश-विदेशातील शिष्टमंडळे येत असतात. अत्यंत महनीय व्यक्तींची भेट सचिवालय किंवा मंत्रालयात होते. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत यांच्यासाठी सुसज्ज केबिन व एकूणच मंत्रालय असणे यात तसे आक्षेपार्ह काही नाही. नव्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना अधिक सुरक्षित वाटेल. कारण पूर्वीच्या केबिनच्या परिसरात कुणीही येत होते. तसे नव्या मंत्रालयाच्या ठिकाणी व निदान सीएमच्या केबिनपर्यंत तरी उगी कुणीही पोहोचू शकणार नाही. भेटीची व्यवस्थित वेळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येणारी व्यक्ती थेट मंत्रालयापर्यंत पोहोचेल. त्या व्यक्तीला पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर फिरावे लागणार नाही. त्यासाठी स्वतंत्र लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या भव्यदिव्य संसद इमारतीचे उद्घाटन केले. त्यापासून प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री सावंत यांनीदेखील मंत्रालय उद्घाटनावेळी धार्मिक विधींवर बराच भर दिला. पुरोहितांकडून गा-हाणे घातले गेले. नव्या मंत्रालयाचा अधिकाधिक वापर सर्व मंत्र्यांनी जनतेच्या कल्याणासाठी करावा, असे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री स्वतः जास्त वेळ नव्या मंत्रालयात बसू लागले म्हणजे अन्य मंत्र्यांवरही थोडा भावनिक दबाव राहील. आपणही सीएमप्रमाणेच जास्त वेळ मंत्रालयातील केबिनमध्ये बसायला हवे याची जाणीव अन्य मंत्र्यांना होईल. सध्या फक्त बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीसाठी म्हणून काहीजण येतात. अनेकजण बंगल्यावरूनच कारभार चालवतात. मंत्री नीलेश काब्राल व सुदिन ढवळीकर नियमितपणे मंत्रालयात येतात. आमच्या केबिनमध्ये काही बदल झालेला नाही, फक्त मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तेवढे सुसज्ज झाले, असे काही मंत्री ऑफ द रेकॉर्ड बोलून दाखवतात. असो.

वास्तविक पर्वरीत विधानसभा प्रकल्प बांधला तेव्हाच 'मंत्रालय' नामकरण व्हायला हवे होते. मिनिस्टर ब्लॉक असा उल्लेख पर्रीकर सरकारने का केला होता, ते कळण्यास मार्ग नाही. मुख्यमंत्र्यांनी आपले केबिन अत्याधुनिक व आजूबाजूचा परिसर मोठा व दिमाखदार केला आहे. मंत्रिमंडळ बैठकांसाठी गोल आसनव्यवस्थेची खोलीही तयार केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येणाऱ्यांना स्वतंत्र कक्षात बसता येईल. सावंत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे. सरकारही मजबूत आहे. आता प्रशासकीय कारभारालाही वेग येण्याची गरज आहे. शेवटी जनतेचे प्रश्न लवकर सुटू लागले व त्रास कमी झाले तर नव्या मंत्रालयावरील खर्च सत्कारणी लागला, असे म्हणता येईल.

'सत्यमेव जयते' लिहिलेला मोठ्या अक्षरातील फलक मुख्यमंत्र्यांच्या आसनामागे आहे. सावंत यांचा कारभार खरोखर सत्याच्या मार्गानेच पुढे जावो. आयोगाच्या वेबसाइटचेही काल उद्घाटन झाले. यापुढे सर्व प्रकारची सरकारी नोकरभरती कर्मचारी निवड आयोगामार्फत होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. ही नोकरभरतीदेखील सत्याच्या व पारदर्शकतेच्या मार्गाने गेली तर नव्या बेरोजगार युवकांचे आशीर्वाद सरकारला मिळतील. सत्याच्या वाटेने कारभार चालला तर आसनामागील सत्यमेव जयते, हा फलकदेखील सत्कारणी लागेल.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत