शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

अतिवृष्टीमुळे गोव्यात १६५ कोटींचे नुकसान; मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे नुकसान भरपाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 20:50 IST

पुरांमुळे गोव्यातील रस्ते, जलवाहिनी तसेच इतर पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने या नुकसानीचा आकडा १६५ कोटी रुपयांच्या घरात जातो.

म्हापसा: पुरांमुळे गोव्यातील रस्ते, जलवाहिनी तसेच इतर पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने या नुकसानीचा आकडा १६५ कोटी रुपयांच्या घरात जातो. त्यामुळे केंद्राकडून नुकसान भरपाई मागून घेतली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोणीही शेती करणं सोडून देवू नका, सध्या भाज्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने घरामागील जागेत आपल्यापुरता भाजीची लागवड करावी. सद्यस्थितील गोव्याला भाजीसाठी कर्नाटकवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे यापुढे स्वावलंबी न होता, स्वयंभू व्हावे लागेल, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

विविध राज्यांतील पूरग्रस्त भागांची पाहणी करून अहवाल देण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचे पथक पुराचा फटक बसलेल्या राज्यांना भेट देणार आहे. या यादीत गोव्याचे नाव नाही, अशी बातमी आली होती. त्यानुसार केंद्रीय गृह खात्याला गोवा सरकारने पत्र पाठवून ही बाब नजरेस आणून दिली आहे. कारण गोव्यातील नुकसानीचा आकडा हा सामान्य नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

तसेच महापूरात काही घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. या कुटुंबांना राज्य आपत्ती निवारण निधीतून प्रत्येकी ९५ हजार १०० रुपये व गोवा आपत्ती व्यवस्थापन निधीतून अतिरिक्त १५ हजार भरपाई दिली. यामध्ये आज मिंगल फर्नांडिस, तुकाराम वायंगणकर, उदय वायंगणकर, यशवंत तोरस्कर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १ लाख १० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

कोलवाळ पंचायतीच्या सभागृहात मंगळवारी बार्देस तालुक्यातील कोलवाळ, रेवोडा, नादोडा, कामुर्ली या भागातील पूरगस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकसान भरपाईच्या धनदेशांचे वितरण करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात, थिवी मतदारसंघाचे आमदार नीळकंठ हळर्णकर, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका, बार्देस तालुक्याचे उपजिल्हाधिकारी सुधीर केरकर, उपजिल्हाधिकारी कबीर शिरगांवकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. 

 

 

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवाRainपाऊस