शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

प्रश्न कोण सोडवेल? पणजी शहरातील मतदारांसमोर विविध प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2024 10:30 IST

भाजपच्या तुलनेत काँग्रेस संघटना पडतेय कमी, आरजीनेही वेधले लक्ष.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राजधानी पणजीत सध्या अनेक समस्या आहेत. यात सध्याच्या स्मार्ट सिटीच्या कामांमुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा, धूळ प्रदूषण हा एक भाग झाला. काही भागांमध्ये आजही पाणीसमस्या आहे. अनियमित पाणीपुरवठा, तर पाणीपुरवठा झाला, तर कमी दाब असतो, सांतिनेझ खाडीचे संवर्धन, उद्यानांचा विकास, पणजी मार्केटमधील स्थानिक विक्रेत्यांच्या व्यवसायाला चालना देणे आदींचा यात समावेश आहे. त्यामुळे हे सर्व विषय हाताळून पुढे कसे जावे, असा प्रश्न राजकीय पक्षांसमोर आहे. ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी खऱ्या अर्थाने स्ट्रॅटर्जीची गरज आहे, असा दावा आरजीने केला आहे.

२०२२मध्ये आरजी होता पाचव्या स्थानी आरजी पक्षाने २०२२ ची विधानसभा निवडणूक लढवली. तिसवाडीतील पाचही मतदारसंघांमध्ये त्यांनी उमेदवार उभे केले. मात्र, सर्वांत कमी मते आरजीला पणजीत मिळाली. आरजीचा उमेदवार मते मिळवण्यात पाचव्या स्थानावर होता. त्यामुळे सध्या आरजीवर पक्ष पणजीत बळकट करण्याचे आव्हान आहे. कारण त्यांच्या समोर काँग्रेस, भाजप, यासारखे मोठे पक्ष आहेत, ज्यांना जनतेने स्वीकारले आहे

उजो उजो असे म्हणत विविध ज्वलंत प्रश्न घेऊन जनतेसमोर येणाऱ्या रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाने कमी वेळात गोव्याच्या राजकीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, पणजीत आरजीला अधिक बळकटीची गरज आहे. पणजीत तसे आरजीचे अस्तित्व फार नाही. त्यांचे कार्यकर्ते काम करीत असले तरी काँग्रेस व भाजपच्या तुलनेत आरजी कमी पडत आहेत. २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणूक आरजीने पणजीतून लढवली होती. मात्र, त्यांना ५०० मतांचा आकडाही गाठता आला नव्हता. अशातच पणजीतून लोकसभा निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे

 

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४