शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया आघाडीचा प्रस्ताव अन् आरजीची तिरकी चाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2024 10:02 IST

अखेर आरजीने एक वेगळी खेळी खेळली आहे. 

रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाला अधूनमधून काँग्रेस पार्टी गुगली टाकण्याचा प्रयत्न करतेय. आम्ही आरजीला इंडिया आघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता; पण आरजीने स्वीकारला नाही, असे गोव्यातील काँग्रेसचे नेते सांगत फिरत आहेत. आरजी पार्टी भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडण्यासाठी स्वतंत्रपणे लढतेय, असा दावा काँग्रेसचे नेते करत आहेत. यामुळे अखेर काल आरजीने एक वेगळी खेळी खेळली आहे. 

आरजीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीला काल जाहीरपणे प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव जेवढा मनोरंजक आहे, तेवढाच तो काँग्रेसला घाम फोडणारादेखील आहे. काँग्रेसने जर आमच्या तीन अटी मान्य केल्या, तरच आम्ही इंडिया आघाडीसोबत जागा वाटप करण्यास तयार आहोत, असे आरजीने सोमवारी जाहीर केले. त्यासाठी २० एप्रिलपर्यंत आरजीने काँग्रेसला मुदत दिली आहे. आरजीचे प्रमुख मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत काल अटी स्पष्ट केल्या. आरजी हतबल होऊन काँग्रेसकडे जागा वाटपासाठी मदत मागतोय, असा याचा अर्थ होत नाही. आपण पुढे ठेवलेल्या अटी काँग्रेस पक्षाला मान्य होण्यासारख्या नाहीत, हे आरजीला ठाऊक आहेच. त्यामुळेच मुद्दाम आरजीने जागा वाटप प्रस्ताव अटींसह सादर करण्याची ही तिरकी चाल खेळली आहे काय? कदाचित तसेच आहे, असा दावा काँग्रेसचे नेते करतील. 

आरजीच्या अटी काय आहेत, ते अगोदर पाहू. म्हादई नदीच्या रक्षणासाठी कळसा भंडुरा प्रकल्प रद्द व्हायला हवा, असे आरजीला वाटते. काँग्रेसने त्या पक्षाच्या राष्ट्रीय जाहीरनाम्यात प्रकल्प रद्दचे आश्वासन द्यावे, असे आरजी सुचवतो. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. कर्नाटकात त्या पक्षाचे सरकार आहे. कर्नाटकच्या हिताचे जे काही आहे, त्याचा विचार काँग्रेसचे राष्ट्रीय नेते करतील. राष्ट्रीय जाहीरनाम्यात काय समाविष्ट करावे, ते सांगण्याचा अधिकार अमित पाटकर किंवा युरी आलेमाव यांना नाही. आरजीने जी अट घातलीय, ती अट भाजपदेखील आपल्या स्वतःच्या राष्ट्रीय जाहीरनाम्यात समाविष्ट करणार नाही. कारण राष्ट्रीय पक्षांना ते शक्यच होत नाही. आपापल्या प्रदेशाचे हित राष्ट्रीय पक्षांचे विविध नेते पाहत असतात. केंद्रातील भाजप सरकारनेही म्हादईप्रश्नी गोव्यापेक्षा कर्नाटकचेच हित पाहिले आहे. कारण गोवा छोटे राज्य व कर्नाटकात जास्त संख्येने खासदार आहेत. राजकीयदृष्ट्वा गोव्यातील लोकसभेच्या दोन जागांना राष्ट्रीय पक्ष फार महत्त्व देत नाहीत.

आरजीने पोगो बिलाविषयीही अट मान्य करा, असे काँग्रेसला सुचवले आहे. 'पर्सन ऑफ गोवन ओरिजीन' हा आरजीचा आत्मा आहे. याच मुद्यावर आरजीची स्थापना झाली आहे. गोंयकार कोण याची व्याख्या आरजी पोगो बिलात करतोय. पोगो बिल आहे तसे स्वीकारण्याची भूमिका काँग्रेस घेणार नाही. भाजपलाही ते कधीच शक्य होणार नाही. कारण राष्ट्रीय पक्ष हे केवळ गाँयकार मतांवरच अवलंबून नसतात. पाच वर्षांपूर्वी परराज्यातून गोव्यात आलेल्या किंवा अलीकडेच गोव्यात येऊन कायमचे स्थायिक झालेल्या लोकांच्या मतांवरही राष्ट्रीय पक्षांचा दावा असतो. सर्वसाधारणपणे हा देश व हे राज्य सर्वांचे अशी भूमिका घेत राष्ट्रीय पक्ष पुढे जातात. त्यामुळे आरजीला जे जाहीर करणे सहज शक्य असते ते राष्ट्रीय पक्षांना शक्य नसते, तरीदेखील गोंयकारांचे हित सांभाळण्यासाठी काही तरतुदी करता आल्या असत्या तर त्यावर आरजी व काँग्रेसने खूप सुरुवातीला एकत्र बसून चर्चा करता आली असती. 

परप्रांतीयांच्या झोपडपट्टया मोडून टाकण्याची किंवा त्यांचे नाव मतदार यादीतून काढण्याची आरजीची भूमिका काँग्रेसला परवडणारच नाही. आरजी हा केवळ काँग्रेसवादी मतांचे किंवा खिस्ती धर्मीय मतांचे विभाजन करण्यासाठी लढत नाही, तर आम्हाला खरोखर गोव्याचे हित सांभाळायचे आहे, असे आरजीचे नेते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा प्रयत्न योग्यच आहे; पण शेवटी भाजपविरोधी मतदार यावेळी आरजीला स्वीकारतील काय, हे निकालच दाखवून देईल. इंडिया आघाडीचा भाग न होता स्वतंत्रपणे लढून आपली शक्ती नव्याने सिद्ध करणे हा आरजीचा हेतू आहे. या हेतूमध्ये गैर काही नाही. आरजीने केवळ एक तात्पुरती तिरकी चाल खेळून काँग्रेसलाच गुगली टाकली आहे, एवढेच. 

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabhaलोकसभाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस