शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शेजारचे करतायेत महाराष्ट्रातील राजकीय नाट्ट्याची चर्चा, गोव्यातील सर्वपक्षीय नेत्यांना मोठा रस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 13:16 IST

एरव्ही महाराष्ट्रात सरकार कुणाचे आले किंवा आले नाही यात गोव्याला फार रस असत नसे

पणजी : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये प्रथमच गोव्यातील सर्वपक्षीयांमध्ये मोठा रस निर्माण झालेला आहे. सर्वच पक्षांचे नेते व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चवीने चर्चा करू लागले आहेत. गोव्यातही भाजपची सत्ता आहे व भाजपच्या वळचणीला जाण्यासाठी गोव्यातही अलिकडे काही आमदार फुटल्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे गोव्यातील प्रत्येकजण उत्सुकतेने पाहतो व गोव्याच्या राजकारणाच्या दृष्टीकोनातून त्या घडामोडींचा बहुतेकजण अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

एरव्ही महाराष्ट्रात सरकार कुणाचे आले किंवा आले नाही यात गोव्याला फार रस असत नसे. फक्त अमुक एका पक्षाचे किंवा आघाडीचे सरकार अधिकारावर आले एवढे कळले की, पुरे अशी भावना गोमंतकीयांमध्ये असायची. मात्र गोव्यात भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मार्च 2क्17 पासून आतार्पयत तेरा काँग्रेस आमदार फुटले. त्या शिवाय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोघे फुटले. एकूण पंधरा आमदार भाजपच्या प्रभावाखाली येऊन फुटल्याने गोव्यातील मगो पक्ष महाराष्ट्रातील शिवसेनेला सध्या आपल्या जागी पाहतो. आपण गोव्यात भाजपला धडा शिकवू शकलो नाही, शिवसेनेने तरी तो शिकवावा या अपेक्षेने गोव्यातील मगो पक्षाचे अनेक पदाधिकारी महाराष्ट्रातील घडामोडींकडे पाहत असल्याचे दिसून येते.गोवा फॉरवर्ड आणि मगो व एक-दोन अपक्ष भाजपप्रणीत आघाडी सरकारसोबत होते. मनोहर र्पीकर यांचे निधन झाल्यानंतर गोव्यातील राजकीय स्थिती बदलण्यास आरंभ झाला व भाजपने मगोप आणि गोवा फॉरवर्डसह अपक्ष रोहन खंवटे यांनाही दूर केले. त्यामुळे दुखावलेले हे तिन्ही घटक महाराष्ट्रात भाजप सत्तेपासून दूर राहतोय यात आनंद मानून घेत असल्याचे जाणवते. राष्ट्रीय पक्ष विरुद्ध प्रादेशिक पक्ष असा संघर्ष महाराष्ट्रात सुरू आहे, गोव्यातील प्रादेशिक पक्ष या संघर्षातील प्रत्येक टप्प्याकडे बारीक लक्ष देऊन पाहत आहेत. मात्र गोव्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीवर समाधानी आहे. भाजपने आपण सत्ता स्थापन करणार नाही अशी भूमिका घेऊन चांगले केले, सेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली तर पुढील काळात भाजपलाच लाभ होईल अशी भावना गोव्यातील भाजपमध्ये आहे.मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांना लोकमतने विचारले असता, ते म्हणाले की भाजपने कायम प्रादेशिक पक्षांचा वापर केला. शिवसेनेला सरकारमध्ये राहून यापूर्वी भाजपकडून जी वागणूक मिळाली, तिच वागणूक मगो पक्षाला गोव्यात मिळाली. काँग्रेसचे प्रथम दोन आमदार भाजपने फोडले व त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. भाजपची ती नीती अत्यंत चुकीची होती. भाजप सरकार स्थापन करताना ज्या पक्षांचा आधार घेतो, त्या पक्षांना तो मित्रपक्ष म्हणतो पण मित्रपक्षांना दिलेला शब्द भाजप कधीच पाळत नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात त्यांच्या वाटय़ाला नामुष्की आली आहे. भाजपचे स्वार्थाचे राजकारण हे छोट्य़ा पक्षांसाठी घातक आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे विविध अर्थानी पहावे लागेल. 

टॅग्स :goaगोवाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणBJPभाजपा