शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

गोवा : इलेक्ट्रिक बसगाडीमुळे कदंबा प्रभावित, खर्च केवळ 30 टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 09:53 IST

गोव्यात एकमेव असलेली व प्रायोगिक तत्त्वावर आणलेली इलेक्ट्रिक बसगाडी गेले तीन महिने सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळाने राज्यातील सर्व प्रमुख मार्गावर चालवून पाहिली आहे.

पणजी : गोव्यात एकमेव असलेली व प्रायोगिक तत्त्वावर आणलेली इलेक्ट्रिक बसगाडी गेले तीन महिने सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळाने राज्यातील सर्व प्रमुख मार्गावर चालवून पाहिली आहे. या बसगाडीमुळे महामंडळ प्रभावित झाले आहे. या बसवरील खर्चाचे प्रमाण हे फक्त 30 टक्के आहे.  

कदंब महामंडळाच्या अन्य विविध प्रकारच्या बसगाड्या दिवसाला 535 फेऱ्या मारतात आणि 24 तासांत सरासरी 18 हजार लिटर इंधन त्या बसगाड्यांकडून खर्च केले जाते. या उलट इलेक्ट्रिक बसगाडी ही फक्त बॅटरी चार्ज केली की चालते. रोज रात्री चार तास बॅटरी चार्ज करावी लागते. या बसगाडीमुळे प्रदूषण होत नाही. गाडीला इंजिन नाही. डिझेलची गरज नाही. गाडीतून धूर येत नाही. पणजीहून मडगाव, काणकोण, साखळी, डिचोली, पेडणे अशा सर्व मार्गावरून या इलेक्ट्रिक बसगाडीनं प्रवाशांना घेऊन प्रवास केला आहे. अजूनही विविध मार्गावर या गाडीचा वापर सुरू आहे. गेल्या 30 जानेवारी रोजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या उपस्थितीत इलेक्ट्रिक बसगाडीचे उद्घाटन केले होते. मुख्यमंत्री,वाहतूक मंत्री व इतरांनी पणजी ते बांबोळीपर्यंत या बसगाडीने त्यावेळी प्रवासही करून पाहिला आहे.

महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी घाटे यांनी सोमवारी (23एप्रिल)'लोकमत'ला सांगितले, की इलेक्ट्रिक बसगाडी ही कदंबला खूपच उपयुक्त ठरली आहे. भविष्यात या बसगाडीवरील खर्चाचे प्रमाण 25 टक्क्यांवरही येईल. चढावावर देखील ही बसगाडी ब-यापैकी धावते. काही तक्रार नाही. महामंडळाने ही बसगाडी विकत घेतलेली नाही. हैद्राबाद येथील एका कंपनीने ती प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यासाठी कदंबला दिली. तिचा वापर सुरू आहे. गाडीच्या देखभालीवर काहीच खर्च येत नाही. भविष्यात कदंबकडे अशा प्रकारच्या जास्त बसगाड्या असतील. 

दरम्यान, कदंब महामंडळ यापुढील काळात वेगवेगळ्य़ा प्रकारच्या एकूण शंभर बसगाडय़ा खरेदी करणार आहे. एकूण पंचेचाळीस कोटींचा निधी त्यासाठी सरकार देणार आहे. महामंडळ यापुढे सरकारला प्रस्ताव पाठवणार आहे.

टॅग्स :goaगोवाelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनtechnologyतंत्रज्ञान