शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

Goa Election 2022: काँग्रेसला दिलेले मत हे भाजपला मिळालेले मत; तृणमूल सरचिटणीस अभिषेक बॅनर्जींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 17:58 IST

Goa Election 2022: काँग्रेसच्या ढोंगीपणाचा पर्दापाश करण्याची वेळ आली असल्याची टीका अभिषेक बॅनर्जींनी गोव्यात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी:तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी गोमंतकीयांची दिशाभूल केल्याबद्दल आणि गोव्याच्या लोकांच्या व्यापक हितासाठी युती करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल काँग्रेस आणि त्यांचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांच्यावर टीकास्त्र सोडले.गोवा'टीएमसी'चे युवा अध्यक्ष जयेश शेटगावकर आणि गोवा टीएमसी महिला उपाध्यक्षा प्रतिभा बोरकर यांच्या उपस्थितीत पणजी येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद झाली.

त्यांच्या सुरुवातीच्या विधानात, अभिषेक बॅनर्जी यांनी 'टीएमसी' विरोधी मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाकारला, ज्यामुळे भाजपला फायदा होत आहे. अभिषेक बॅनर्जी म्हणाले, ‘एआयटीसी'च्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी ऑक्टोबरमध्ये सर्व समविचारी पक्षांना (भाजपविरोधी शक्तींना) गोव्यातील भाजपला हुसकावून लावण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. 'टीएमसी' मार्गाबाहेर गेली आणि स्वतःहून सर्वांपर्यंत पोहोचली. मगोपने सकारात्मक प्रतिसाद दिला तर इतरांनी प्रतिसाद दिला नाही.आपल्या शब्दांनी सडेतोड उत्तर देताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले, ‘आम्हाला काँग्रेसची मते फोडायची असती, तर आम्ही पंजाब, राजस्थान किंवा इतर काँग्रेस शासित राज्यांमध्ये गेलो असतो. पण आम्ही कुठे गेलो? आम्ही त्रिपुरा, मेघालय येथे गेलो आणि भाजपचे सरकार असलेल्या गोव्यात आलो.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर निशाणा साधताना 'एआयटीसी'चे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणाले, ‘ चिदंबरम यांचा दावा आहे की, त्यांना कोणताही ठोस प्रस्ताव दिला गेला नाही. गोव्यातील जनतेची आणि देशाची दिशाभूल करत आहे. ढोंगीपणाला मर्यादा असावी. निर्विकार चेहऱ्याला मर्यादा असावी. आज त्याचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे. मला तुम्हाला तथ्ये सांगायची आहेत. 'AITC' चे उपाध्यक्ष पवन वर्मा यांनी २४ डिसेंबर रोजी त्यांच्या दिल्लीतील घरी जाऊन त्यांना गोमंतकीयांच्या फायद्यासाठी युती करण्याचे आवाहन केले. पण स्वत:च्या क्षुल्लक उद्दिष्टांच्या वरती जाण्यात ते अपयशी ठरले. 

ते पुढे म्हणाले, ‘काँग्रेसची भाजपसोबत अस्पष्ट युती आहे. काँग्रेसला मिळालेले प्रत्येक मत हे थेट भाजपला मिळालेले मत आहे. जर काँग्रेस भाजपला पराभूत करण्यात अपयशी ठरली तर चिदंबरम यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि राजीनामा देणारे पहिले व्यक्ती व्हावे. आलेक्स रेजिनाल्डो लॉरेन्स यांनी 'टीएमसी' का सोडली याबद्दल विचारले असता, अभिषेक म्हणाले, ‘ज्यांना गोव्यासाठी लढायचे आहे ते राहू शकतात. ज्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी लढायचे आहे, ते सोडून जाऊ शकतात.

पुढे, लुइझिन फालेरो फातोर्डा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने नाराज आहेत का, असा प्रश्न विचारला असता,अभिषेक बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, ‘कोणतीही नाराजी नाही. तिकीट मिळाल्यावर कोणी नाराज झाल्याचे मी कधी ऐकले नाही. आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुइझिन फालेरो हे एक सैनिक आहेत आणि ते विश्वासघातकी -इन-चीफ (विजय सरदेसाई) विरुद्ध लढणार आहेत. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Trinamool Congressतृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी