शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: काँग्रेसला दिलेले मत हे भाजपला मिळालेले मत; तृणमूल सरचिटणीस अभिषेक बॅनर्जींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 17:58 IST

Goa Election 2022: काँग्रेसच्या ढोंगीपणाचा पर्दापाश करण्याची वेळ आली असल्याची टीका अभिषेक बॅनर्जींनी गोव्यात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी:तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी गोमंतकीयांची दिशाभूल केल्याबद्दल आणि गोव्याच्या लोकांच्या व्यापक हितासाठी युती करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल काँग्रेस आणि त्यांचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांच्यावर टीकास्त्र सोडले.गोवा'टीएमसी'चे युवा अध्यक्ष जयेश शेटगावकर आणि गोवा टीएमसी महिला उपाध्यक्षा प्रतिभा बोरकर यांच्या उपस्थितीत पणजी येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद झाली.

त्यांच्या सुरुवातीच्या विधानात, अभिषेक बॅनर्जी यांनी 'टीएमसी' विरोधी मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाकारला, ज्यामुळे भाजपला फायदा होत आहे. अभिषेक बॅनर्जी म्हणाले, ‘एआयटीसी'च्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी ऑक्टोबरमध्ये सर्व समविचारी पक्षांना (भाजपविरोधी शक्तींना) गोव्यातील भाजपला हुसकावून लावण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. 'टीएमसी' मार्गाबाहेर गेली आणि स्वतःहून सर्वांपर्यंत पोहोचली. मगोपने सकारात्मक प्रतिसाद दिला तर इतरांनी प्रतिसाद दिला नाही.आपल्या शब्दांनी सडेतोड उत्तर देताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले, ‘आम्हाला काँग्रेसची मते फोडायची असती, तर आम्ही पंजाब, राजस्थान किंवा इतर काँग्रेस शासित राज्यांमध्ये गेलो असतो. पण आम्ही कुठे गेलो? आम्ही त्रिपुरा, मेघालय येथे गेलो आणि भाजपचे सरकार असलेल्या गोव्यात आलो.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर निशाणा साधताना 'एआयटीसी'चे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणाले, ‘ चिदंबरम यांचा दावा आहे की, त्यांना कोणताही ठोस प्रस्ताव दिला गेला नाही. गोव्यातील जनतेची आणि देशाची दिशाभूल करत आहे. ढोंगीपणाला मर्यादा असावी. निर्विकार चेहऱ्याला मर्यादा असावी. आज त्याचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे. मला तुम्हाला तथ्ये सांगायची आहेत. 'AITC' चे उपाध्यक्ष पवन वर्मा यांनी २४ डिसेंबर रोजी त्यांच्या दिल्लीतील घरी जाऊन त्यांना गोमंतकीयांच्या फायद्यासाठी युती करण्याचे आवाहन केले. पण स्वत:च्या क्षुल्लक उद्दिष्टांच्या वरती जाण्यात ते अपयशी ठरले. 

ते पुढे म्हणाले, ‘काँग्रेसची भाजपसोबत अस्पष्ट युती आहे. काँग्रेसला मिळालेले प्रत्येक मत हे थेट भाजपला मिळालेले मत आहे. जर काँग्रेस भाजपला पराभूत करण्यात अपयशी ठरली तर चिदंबरम यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि राजीनामा देणारे पहिले व्यक्ती व्हावे. आलेक्स रेजिनाल्डो लॉरेन्स यांनी 'टीएमसी' का सोडली याबद्दल विचारले असता, अभिषेक म्हणाले, ‘ज्यांना गोव्यासाठी लढायचे आहे ते राहू शकतात. ज्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी लढायचे आहे, ते सोडून जाऊ शकतात.

पुढे, लुइझिन फालेरो फातोर्डा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने नाराज आहेत का, असा प्रश्न विचारला असता,अभिषेक बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, ‘कोणतीही नाराजी नाही. तिकीट मिळाल्यावर कोणी नाराज झाल्याचे मी कधी ऐकले नाही. आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुइझिन फालेरो हे एक सैनिक आहेत आणि ते विश्वासघातकी -इन-चीफ (विजय सरदेसाई) विरुद्ध लढणार आहेत. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Trinamool Congressतृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी