शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: काँग्रेसला दिलेले मत हे भाजपला मिळालेले मत; तृणमूल सरचिटणीस अभिषेक बॅनर्जींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 17:58 IST

Goa Election 2022: काँग्रेसच्या ढोंगीपणाचा पर्दापाश करण्याची वेळ आली असल्याची टीका अभिषेक बॅनर्जींनी गोव्यात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी:तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी गोमंतकीयांची दिशाभूल केल्याबद्दल आणि गोव्याच्या लोकांच्या व्यापक हितासाठी युती करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल काँग्रेस आणि त्यांचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांच्यावर टीकास्त्र सोडले.गोवा'टीएमसी'चे युवा अध्यक्ष जयेश शेटगावकर आणि गोवा टीएमसी महिला उपाध्यक्षा प्रतिभा बोरकर यांच्या उपस्थितीत पणजी येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद झाली.

त्यांच्या सुरुवातीच्या विधानात, अभिषेक बॅनर्जी यांनी 'टीएमसी' विरोधी मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाकारला, ज्यामुळे भाजपला फायदा होत आहे. अभिषेक बॅनर्जी म्हणाले, ‘एआयटीसी'च्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी ऑक्टोबरमध्ये सर्व समविचारी पक्षांना (भाजपविरोधी शक्तींना) गोव्यातील भाजपला हुसकावून लावण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. 'टीएमसी' मार्गाबाहेर गेली आणि स्वतःहून सर्वांपर्यंत पोहोचली. मगोपने सकारात्मक प्रतिसाद दिला तर इतरांनी प्रतिसाद दिला नाही.आपल्या शब्दांनी सडेतोड उत्तर देताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले, ‘आम्हाला काँग्रेसची मते फोडायची असती, तर आम्ही पंजाब, राजस्थान किंवा इतर काँग्रेस शासित राज्यांमध्ये गेलो असतो. पण आम्ही कुठे गेलो? आम्ही त्रिपुरा, मेघालय येथे गेलो आणि भाजपचे सरकार असलेल्या गोव्यात आलो.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर निशाणा साधताना 'एआयटीसी'चे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणाले, ‘ चिदंबरम यांचा दावा आहे की, त्यांना कोणताही ठोस प्रस्ताव दिला गेला नाही. गोव्यातील जनतेची आणि देशाची दिशाभूल करत आहे. ढोंगीपणाला मर्यादा असावी. निर्विकार चेहऱ्याला मर्यादा असावी. आज त्याचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे. मला तुम्हाला तथ्ये सांगायची आहेत. 'AITC' चे उपाध्यक्ष पवन वर्मा यांनी २४ डिसेंबर रोजी त्यांच्या दिल्लीतील घरी जाऊन त्यांना गोमंतकीयांच्या फायद्यासाठी युती करण्याचे आवाहन केले. पण स्वत:च्या क्षुल्लक उद्दिष्टांच्या वरती जाण्यात ते अपयशी ठरले. 

ते पुढे म्हणाले, ‘काँग्रेसची भाजपसोबत अस्पष्ट युती आहे. काँग्रेसला मिळालेले प्रत्येक मत हे थेट भाजपला मिळालेले मत आहे. जर काँग्रेस भाजपला पराभूत करण्यात अपयशी ठरली तर चिदंबरम यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि राजीनामा देणारे पहिले व्यक्ती व्हावे. आलेक्स रेजिनाल्डो लॉरेन्स यांनी 'टीएमसी' का सोडली याबद्दल विचारले असता, अभिषेक म्हणाले, ‘ज्यांना गोव्यासाठी लढायचे आहे ते राहू शकतात. ज्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी लढायचे आहे, ते सोडून जाऊ शकतात.

पुढे, लुइझिन फालेरो फातोर्डा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने नाराज आहेत का, असा प्रश्न विचारला असता,अभिषेक बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, ‘कोणतीही नाराजी नाही. तिकीट मिळाल्यावर कोणी नाराज झाल्याचे मी कधी ऐकले नाही. आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुइझिन फालेरो हे एक सैनिक आहेत आणि ते विश्वासघातकी -इन-चीफ (विजय सरदेसाई) विरुद्ध लढणार आहेत. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Trinamool Congressतृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी