शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022 : ... तेव्हा पैशाला नव्हे, व्यक्तीला होती किंमत; माजी आमदारांनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 07:26 IST

"राजकारण व्यवसाय नसून व्रत आहे, मनोहर पर्रीकर यांनी यासंदर्भात आशेचा किरण निर्माण केला होता"

अजय बुवा 

फोंडा : ‘पैशाने राजकारणाची वाट लावली हे जरी सत्य असले तरी याला मतदार जबाबदार नसून, राजकारणीच जबाबदार आहेत. राजकारणात पैशाचा उगम झाला नव्हता, त्यावेळी लोकांना व कार्यकर्त्यांना पैशाची चटक लावण्याचे काम काही राजकारण्यांनी केले. अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मग इतर उमेदवार व हळूहळू सरसकट सगळ्याच पक्षांनी पैशालाच महत्त्व द्यायला सुरुवात केली. मला पहिल्या निवडणुकीत फक्त नऊ हजार रुपये खर्च आला. कारण त्यावेळी पैसा नगण्य होता, माणूस महत्त्वाचा होता,’ अशी आठवण फोंड्याचे माजी आमदार रोहिदास नाईक यांनी जागवली. 

आज ९७ वय गाठलेले माजी आमदार नाईक ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘आता एका पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी रस्सीखेच चालू आहे. लोक म्हणतात की, पैसे देऊन तिकीट विकत घेण्याची परंपरा सुरू झाली आहे. तिकिटासाठी पैसे द्या. नंतर निवडून येण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करा ही पद्धत चुकीची, लोकशाहीकरिता घातक आहे. माझ्या मते राजकारण आज व्यवसाय झाला आहे. आज गुंतवणूक करायची, उद्या त्याची भरपाई करण्यासाठी मग सगळे मार्ग अवलंबायचे. आमच्याकाळी उमेदवारी घ्या म्हणून पक्षाचे नेते चांगल्या उमेदवाराच्या घरी हेलपाटे मारायचे. उमेदवाराला एक रुपया खर्च करावा लागत नव्हता. जो काही तुटपुंजा खर्च यायचा, तो पक्ष स्वतः खर्च करायचा. पहिल्या निवडणुकीत नऊ हजार खर्च झाल्यानंतर दुसऱ्या निवडणुकीत फक्त ३२ हजार खर्च मला आला होता. तोसुद्धा पक्षानेच केला होता.’

मुळात त्यावेळी प्रचारासाठी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा फार मोठ्या नसायच्या. त्यामुळे कमी खर्चात निवडणुका व्हायच्या. आजची परिस्थिती वेगळी आहे. याला कारण राजकारणीच आहेत. त्यांनी चुकीच्या सवयी लावल्या. तेव्हा शब्दाला किंमत होती. लोक व्यक्ती बघायचे. म्हणून पैसे नसताना अनेकजण आमदार झाले. लाच हा प्रकार त्यावेळी नव्हता. लाच न घेता कामे आम्ही केली. मतांसाठी एक छदाम त्यावेळी आम्ही कुणाला देत नव्हतो. समोरचा माणूसही तशी अपेक्षा ठेवत नव्हता. पोलिंग एजंटना वगैरे पैसे द्यायची पद्धत काँग्रेसने सुरू केली. परंतु आमचे पोलिंग एजंटसुद्धा पक्षाचा आदेश मानून काम करायचे’, असे नाईक म्हणाले. 

‘राजकारण व्यवसाय नसून व्रत आहे, हे काळजात बिंबवणारा नेता निर्माण व्हायला हवा. मनोहर पर्रीकर यांनी यासंदर्भात आशेचा किरण निर्माण केला होता. त्याचा प्रभावही वाढू लागला होता’ असेही नाईक म्हणाले. ‘मगोकडून असंख्य चुका झाल्या. पक्षाला गतवैभव मिळणे तसे कठीण आहे. परंतु अशक्य नाही. निवडणुकीच्या दरम्यान आमचे नेते जागे होतात. गतवैभव आणण्यासाठी सतत पाच वर्षे काम करण्याची तयारी पक्षाने ठेवायला हवी’ असेही मत त्यांनी मांडले. 

भाऊसाहेबांनी त्याग लक्षात ठेवला ‘त्याकाळी पक्षाचा जो सर्वोच्च नेता असायचा, त्याचा शब्द अंतिम मानला जायचा. भाऊसाहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून कार्यकर्ते कामाला लागायचे, म्हणून त्यावेळी बजबजपुरी नव्हती. नेता पक्षाची दिशा ठरवायचा. आज अनेक नेते तयार झाल्याने हेवेदावे व स्पर्धा वाढीस लागली. कार्यकर्ता शेवटपर्यंत पक्षाकडे बांधील असायचा. मी या वयातसुद्धा मगो पक्षाशी एकनिष्ठ आहे. कारण आमच्यावर संस्कारच तसे झाले आहेत. १९७२ पूर्वीची निवडणूक लढविण्याची मी तयारी केली होती. परंतु पक्षाने शशिकला काकोडकर यांना उमेदवारी दिली. पक्षाचा आदेश मान्य करून मी माघार घेतली. आज तसे होताना दिसत नाही. तिकीट न मिळाल्यास बंडखोरी केली जाते. मी त्यावेळी माघार घेतल्याचे भाऊसाहेबांनी ध्यानात ठेवले.  १९७२ मध्ये मला घरी येऊन उमेदवारी दिली. आजचा राजकारणी त्याग करायला तयार नसतो.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२goaगोवाPoliticsराजकारणManohar Parrikarमनोहर पर्रीकर