शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

Goa Election 2022: “भाजपने दुसऱ्या पक्षातून उमेदवार विकत घेतले, ५ वर्षांत गोव्याची दुर्दशा केली”: नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 19:27 IST

Goa Election 2022: योग्य पर्यटन धोरण, व नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करून विकास साधण्याचे आमचे ध्येय आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : भाजप सरकारने गोव्याची दुर्दशा केली आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात बेरोजगारी वाढली आहे, महत्त्वाचे असे पर्यटनक्षेत्र पूर्णपणे ढासळलेले आहे. या सर्व गोष्टीला भाजप सरकार जबाबदार असून, येणाऱ्या निवडणुकीत गोव्याची जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्राचे अल्पसंख्याक व्यवहार आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत नवाब मलिक बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अविनाश भोसले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा शुक्रवारी प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात पुढे भाजपविरोधातील जे सरकार येईल, त्या सरकारात आम्ही निश्चितरित्या असणार आहोत. चांगले लोकाभिमुख सरकार राज्यात देण्याचा आम्ही संकल्प केला आहे. बेरोजगारीची समस्या सोडविण्यावर आमचा भर आहे, योग्य पर्यटन धोरण, व नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करून विकास साधण्याचे आमचे ध्येय आहे, असे मलिक यांनी पुढे सांगितले.

भाजपमध्ये सध्याच्या स्थितीला डॉ. प्रमोद सावंत वगळता सर्व उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून विकत घेतलेले आहेत. यावरून स्पष्ट होते की, भाजपकडे त्यांचे स्वत:चे कार्यकर्ते देखील नाहीत. बाबूशसारखे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार भाजपने यंदा रिंगणात उभे केले आहेत, भाजप ते उमेदवार सुधारले  म्हणत असेल, तर त्यांनी लोकांना दाखवून द्यावे की, कुठल्या गंगेत त्यांनी अंघोळ केल्याने त्यांचे पाप धुतले गेले आहे ते. त्याचप्रमाणे वंशवादही सर्वात जास्त भाजपमध्येच दिसून येतो, असेही मलिक यांनी पुढे सांगितले.

नमस्ते ट्रम्प उपक्रमामुळे कोरोनाचा प्रसार झाला

कोरोना जेव्हा जगभर पसरत होता, तेव्हा आम्ही मोदी सरकारला आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्याचे सुचविले होते. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. कारण त्यावेळी नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम मोदी सरकार ट्रम्पला खूश करण्यासाठी करत होते आणि यातूनच कोरोनाचा प्रसार देशात झाला. तसेच लॉकडाऊन राज्य सरकारने करायला सुरुवात केली, असे मोदी म्हणत असले तरी, लॉकडाऊनबाबत केंद्राने स्वत:कडेच अधिकार ठेवले होते. त्यामुळे मोदींनी उगाच कसलीही विधाने करून लोकांची दिशाभूल करू नये. ज्याप्रकारे लसींसाठी मोदी जबाबदार आहेत, तसेच कोरोना काळातील मृत्यूसाठीही मोदीच जबाबदार आहेत.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस