शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Goa Election 2022: “भाजपने दुसऱ्या पक्षातून उमेदवार विकत घेतले, ५ वर्षांत गोव्याची दुर्दशा केली”: नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 19:27 IST

Goa Election 2022: योग्य पर्यटन धोरण, व नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करून विकास साधण्याचे आमचे ध्येय आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : भाजप सरकारने गोव्याची दुर्दशा केली आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात बेरोजगारी वाढली आहे, महत्त्वाचे असे पर्यटनक्षेत्र पूर्णपणे ढासळलेले आहे. या सर्व गोष्टीला भाजप सरकार जबाबदार असून, येणाऱ्या निवडणुकीत गोव्याची जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्राचे अल्पसंख्याक व्यवहार आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत नवाब मलिक बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अविनाश भोसले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा शुक्रवारी प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात पुढे भाजपविरोधातील जे सरकार येईल, त्या सरकारात आम्ही निश्चितरित्या असणार आहोत. चांगले लोकाभिमुख सरकार राज्यात देण्याचा आम्ही संकल्प केला आहे. बेरोजगारीची समस्या सोडविण्यावर आमचा भर आहे, योग्य पर्यटन धोरण, व नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करून विकास साधण्याचे आमचे ध्येय आहे, असे मलिक यांनी पुढे सांगितले.

भाजपमध्ये सध्याच्या स्थितीला डॉ. प्रमोद सावंत वगळता सर्व उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून विकत घेतलेले आहेत. यावरून स्पष्ट होते की, भाजपकडे त्यांचे स्वत:चे कार्यकर्ते देखील नाहीत. बाबूशसारखे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार भाजपने यंदा रिंगणात उभे केले आहेत, भाजप ते उमेदवार सुधारले  म्हणत असेल, तर त्यांनी लोकांना दाखवून द्यावे की, कुठल्या गंगेत त्यांनी अंघोळ केल्याने त्यांचे पाप धुतले गेले आहे ते. त्याचप्रमाणे वंशवादही सर्वात जास्त भाजपमध्येच दिसून येतो, असेही मलिक यांनी पुढे सांगितले.

नमस्ते ट्रम्प उपक्रमामुळे कोरोनाचा प्रसार झाला

कोरोना जेव्हा जगभर पसरत होता, तेव्हा आम्ही मोदी सरकारला आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्याचे सुचविले होते. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. कारण त्यावेळी नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम मोदी सरकार ट्रम्पला खूश करण्यासाठी करत होते आणि यातूनच कोरोनाचा प्रसार देशात झाला. तसेच लॉकडाऊन राज्य सरकारने करायला सुरुवात केली, असे मोदी म्हणत असले तरी, लॉकडाऊनबाबत केंद्राने स्वत:कडेच अधिकार ठेवले होते. त्यामुळे मोदींनी उगाच कसलीही विधाने करून लोकांची दिशाभूल करू नये. ज्याप्रकारे लसींसाठी मोदी जबाबदार आहेत, तसेच कोरोना काळातील मृत्यूसाठीही मोदीच जबाबदार आहेत.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस