शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

Goa Election 2022 : महागाई, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा ऱ्हास ही भाजपची देणगी; गोवा काँग्रेसचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 13:49 IST

भाजपकडून देशातील जनतेची लूट जात केली असल्याचा चव्हाण यांचा आरोप  

पणजी : भाजप सरकारला कडाडून लक्ष्य करताना महागाई, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा ऱ्हास ही भाजपची मुख्य देणगी आहे. भाजपकडून देशातील जनतेची लूट जात केली असल्याचा आरोप  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. महागाईवर मात करायची असेल तर भाजपचा पराभव करण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी काँग्रेसने महागाईवरील पुस्तिकेचे प्रकाशन केले.

चव्हाण म्हणाले की, नोटाबंदी तसेच वस्तू आणि सेवाकर लागू करणे ही मोदी सरकारची मोठी चूक होती. सध्या देशाची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे. मात्र, मोदी सरकार हे लपवत आहे. सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे आणि स्थिती खूपच गंभीर आहे. प्रत्येक वस्तूचे भाव वाढत आहेत, पण सरकार केवळ जाहिरातबाजीत व्यस्त आहे. लोकांनी भाजप सरकारला घरी पाठविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळणार असून, आम्ही स्थिर सरकार देणार आहोत. यंदा भाजपला आमदार पळवून सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार नाही. गोव्यात पेट्रोलचे दर प्रतिलीटर १०० रुपयांवर पोहोचले आहेत. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर हे दर कमी करू, असे आश्वासन आम्ही देतो, असे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव, काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा, महिलाध्यक्ष बीना नाईक, सुनील कवठणकर आणि नौशाद चौधरी उपस्थित होते.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसBJPभाजपा