शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

Goa Election 2022: “गोवेकरांच्या भविष्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, फक्त सत्तेत राहणे हेच भाजपचे ध्येय”: प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 18:32 IST

Goa Election 2022: गोवेकरांच्या परवानगीशिवाय एकही प्रकल्प काँग्रेस करणार नाही, असे आश्वासन प्रियंका गांधी यांनी दिले.

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर आता प्रचाराला वेग आला आहे. अनेकविध पक्षांचे स्टार प्रचारक गोव्यात जाऊन प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. यातच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) गोव्यात पोहोचल्या असून, घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले जात आहे. गोवेकरांच्या भविष्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक महत्त्वाची असल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. 

काहीही करून सत्तेत राहणे हेच भाजपचे ध्येय आहे. उद्योगपती मित्रांना मदत करण्यासाठीच तिन्ही प्रकल्प लोकांवर लादले. राज्य‍ाबाहेरील पक्ष स्वार्थासाठी गोव्यात आले आहेत. लोकांच्या परवानगीशिवाय एकही प्रकल्प काँग्रेस करणार नाही, असे आश्वासन प्रियंका गांधी यांनी गोवेकरांना दिले. यावेळी प्रियंका गांधी यांनी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली. 

गोव्यात सर्वाधिक बेरोजगारी

दक्षिण गोव्यातील नुवे येथे एका कार्यक्रमात प्रियंका गांधी सहभागी झाल्या होत्या. गोवा पर्यटनाच्या दृष्टीने सुंदर राज्य आहे. परंतु, गेल्या दोन दशकांपासून भाजप सरकारने या प्रदेशाला अधोगतीकडे नेत लोकांना बेरोजगार बनवले आहे. आता राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास सर्व प्रथम बेरोजगारीचा प्रश्न सोडविणार आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगारासाठी ५ हजार कोटींची तरतूद करू, असे आश्वासन प्रियंका गांधी यांनी केले. याशिवाय प्रियंका गांधी नावेली, सांताक्रूझ, कुंभारजुवे आणि पणजी येथे भेटी देणार असल्याचे सांगितले जात आहे. 

...तर गोव्याचा विकास आणखी पाच वर्षे मागे जाणार

गोव्यासह देशभरात महामारीचे संकट सुरू आहे. राज्यात या संकट काळात भाजप सरकारने सामान्य जनतेला मदत न करता लुटण्याचे काम केले. सर्वसामान्यांचे हीत जपण्यास भाजपचे सरकार सपशेल अपयशी ठरलेले आहे. मात्र बड्या उद्योजकांना परिपूर्ण सरकार्य व मदत केली आहे. कोळसा हब, लिनियर प्रकल्प, रेल्वेचे दुपदरीकरण हे सर्व प्रकल्प सुरू करून बड्या उद्योजकांना मोठी मदत केलेली आहे. पुरातन वास्तू वारसा हक्काची विल्हेवाट, भूमिपुत्र विधेयक अंमलात आणून लोकांवर अन्याय केलेला आहे. तसेच नोकऱ्या देण्यात अवाढव्य घोटाळा केलेला आहे. भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास गोव्याचा विकास आणखी पाच वर्षे मागे जाणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.

पेट्रोल ८० रुपये करणार

भाजपचे सरकार घोटाळेबाज असून नोकऱ्यांमध्ये मोठा घोटाळा केलेला आहे. तसेच वाढत्या महागाईने लोकांना पंताला पोहचविले आहे. गोव्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास सर्वप्रथम महागाई नियंत्रणात आणली जाणार असून पेट्रोल ८० रुपये लिटर केले जाणार असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले.

दरम्यान, अलीकडेच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही गोव्याला भेट दिली होती. आम्ही सत्तेत आल्यास गोव्याच्या लोकांसाठी न्याय योजना आणू. याअंतर्गत दर महिन्याला गोव्यातील सर्वात गरीब व्यक्तीच्या बँक खात्यात ६ हजार रुपये टाकले जातील. यानुसार वर्षाला ७२ हजार रुपये तुमच्या खात्यात येतील, असे आश्वासन राहुल गांधींनी गोवेकरांना दिले.  

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधी