शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Goa Election 2022: भाजपला आणखी एक धक्का! बड्या नेत्याचा पक्षाला रामराम; उत्पल पर्रिकरांना पाठिंबा जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 09:26 IST

Goa Election 2022: दिवंगत मनोहर पर्रीकरांना अपशब्द वापरत होते, त्याच नेत्यांना आज भाजपने जवळ केले हे पाहून वाईट वाटते.

पणजी : ‘एके काळी भाजपकडून तत्कालीन सत्तारूढ काँग्रेस सरकारमध्ये असलेल्या १२ नेत्यांंना सर्वात भ्रष्ट नेते म्हणून संबोधले जायचे. आता त्यातील ९ नेत्यांना भाजपने उमेदवारी दिली. ते भ्रष्ट नेते व त्यांच्यामार्फत स्थापन होणारे सरकार  राज्याचे भविष्य बिगडवू शकतात,’ अशी टीका भाजपचे नेते व प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी केली. 

पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा मंगळवारी देत असल्याचे जाहीर केले. ‘स्वच्छ राजकारण व्हावे व गोव्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार असलेल्या उत्पल पर्रीकर यांना माझा पाठिंबा आहे. उत्पलसाठी पूर्णपणे काम करता यावे, यासाठी मी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व सोडले आहे, असे ते म्हणाले. 

नाईक गेले काही वर्षांपासून भाजप विरोधी आणि खासकरून मोन्सेरात दाम्पत्याच्या विरोधात काम करत होते. शेवटी संधी साधून त्यांनी राजीनामा दिला. ‘मोन्सेरात दाम्पत्यासारखे भ्रष्ट नेते कुठेही नाहीत. उत्पलने भ्रष्टाचाराविरोधात नवी लढाई सुरू केली आहे. या लढाईत माझा सहभाग असेल. पणजीसोबत ताळगावातही जेनीफर मोन्सेरात यांच्याविरोधात जो चांगल्या व स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार असेल, त्यालाही माझा पाठिंबा असेल. 

मोन्सेरात कुटुंबीयांना त्यांची खरी जागा दाखविण्याची आम्हाला संधी मिळत आहे. या संधीचा उपयोग गोवेकरांनी करून, पुन्हा चांगले उमेदवार निवडावे,’ असे नाईक यांनी सांगितले. ‘भाजप सोडणे हे माझ्यासाठी सोपे नव्हते. शेवटच्या क्षणापर्यंत मी भाजपसोबत राहीलो, परंतु आता पक्ष आधीसारखा राहिलेला नाही. जे नेते मनोहर पर्रीकरांना अपशब्द वापरत  होते, त्याच नेत्यांना आज भाजपने जवळ केले हे पाहून वाईट वाटते. मला अनेक पक्षातून उमेदवारीसाठी ऑफर्स येत आहे, परंतु माझ्या मनात अजूनही भाजप आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२PoliticsराजकारणBJPभाजपा