शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

गोवा : कळंगुट भागात अंमली पदार्थाचे गुन्हे सर्वाधिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 15:27 IST

वर्षाचे बाराही महिने पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या जगप्रसिद्ध अशा कळंगुट किनारी भागात अंमली पदार्थ बाळगण्याप्रकरणी नोंद करण्यात आलेल्या गुन्हेगारी प्रकरणात घट झाली आहे.

म्हापसा - वर्षाचे बाराही महिने पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या जगप्रसिद्ध अशा कळंगुट किनारी भागात अंमली पदार्थ बाळगण्याप्रकरणी नोंद करण्यात आलेल्या गुन्हेगारी प्रकरणात घट झाली आहे. राज्यातील इतर किनारी भागाच्या तुलनेत कळंगुट भागात अंमली पदार्थांची प्रकरणे जास्त असली तरी वाढलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारित घट होण्याचे कारण मानले जाते. 

२०१८ साली कळंगुट पोलिसांनी केलेल्या कारवाई एकूण २४.४४ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत ७ नायजेरियन नागरिकांसोबत १६ भारतीय मिळून २३ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या अमली पदार्थांत चरसचे प्रमाण सर्वाधिक जास्त  १३.२४ लाख रुपयांचे होते. त्यानंतर गांजा ४.३० लाख, एलएसडी २.३० लाख रुपये, एमडीएमके १.५८ लाख रुपयांचा समावेश होतो.  

मागील चार वर्षांची तुलना केल्यास २०१४ ते २०१६ या तीन वर्षांच्या कालावधीत अमली पदार्थ विरोधात फक्त १६ गुन्हे नोंद केले होते. मात्र त्यानंतर २०१७ च्या वर्षात एकूण ३१ जणांवर गुन्हे नोंद करुन त्यांच्याकडून ३० लाख रुपये किंमतीचा अमली पदार्थ जप्त केला होता. त्यात तीन वर्षाचा आकडा मोडीत काढण्यात आलेला. २०१७ च्या तुलनेत मात्र २०१८ साली हे प्रमाण बरेच घटले आहे. मागील वर्षी नोंद करण्यात आलेल्या प्रकरणात एका नायजेरियन नागरिकाविरोधात व्यावसायिक अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणाच्या गुन्ह्याची नोंदसुद्धा करण्यात आली आहे. 

वेश्या व्यवसायात प्रवृत्त करणा-या एकूण ११ जणांना अटक करण्यात आली असून १६ मुलींची सुटका सुद्धा करुन त्यांची रवानगी अपनाघरात करण्यात आली आहे. वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणा-या १५,२५४  हजार वाहन चालकांवर गुन्हे नोंद करुन दंडाच्या रुपात त्यांच्याकडून १६.५२ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. तंबाखू सेवन प्रकरणी ३५६८ तक्रारी नोंद करुन ७.१३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धुम्रपान तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्या प्रकरणी ४६० तक्रारी नोंद करुन ४१ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. 

कळंगुट या किनारी भागातून अमली पदार्थाचे उच्चाटन करण्यास पोलीस कटिबद्ध असल्याचे मत निरीक्षक जिवबा दळवी यांनी व्यक्त केले. या किनारी भागाची व्याप्ती पाहता भागाला भेट देणारे बाहेरील नागरिक या भागात आणून त्याची विक्री करतात. त्यामुळे त्याचा नाहक त्रास स्थानिकांना सहन करवा लागत असल्याची माहिती त्यांनी दिली. अशा लोकांवर कळंगुट पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले असून यावर सर्वत्र जागृती करण्यात येणार असून लोकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन दळवी यांनी केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी