शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

गोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 20:51 IST

गोव्यात सरकार अस्थिर करण्यासाठी कॉँग्रेस नव्हे तर सत्ताधारी भाजपमध्ये असंतुष्ट असलेले काही आमदारच प्रयत्न करीत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी केला आहे. विकासाच्या मुद्यावर तसेच अन्य प्रश्नांवर हे सत्ताधारी आमदार नाराज आहेत.

पणजी - गोव्यात सरकार अस्थिर करण्यासाठी कॉँग्रेस नव्हे तर सत्ताधारी भाजपमध्ये असंतुष्ट असलेले काही आमदारच प्रयत्न करीत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी केला आहे. विकासाच्या मुद्यावर तसेच अन्य प्रश्नांवर हे सत्ताधारी आमदार नाराज आहेत. काँग्रेसने प्रयत्न केले असते तर एव्हाना नवे सरकार स्थापनही झाले असते, असा दावा त्यांनी केला. विकासकामांसाठी २५ कोटी सोडाच २५ रुपयेसुध्दा मिळालेले नाहीत. खाणबंदीचा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीतही सरकार गंभीर नाही, असा आरोप कवळेकर यांनी केला. 

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीत मतदारसंघ विकास निधीचा विषय प्रामुख्याने चर्चेला आला. कवळेकर म्हणाले की, पर्रीकर यांनी सत्ताधाºयांसह विरोधी काँग्रेसच्या सर्व १६ ही आमदारांची बैठक घेऊन आधी १५ कोटी आणि नंतर उर्वरित १0 कोटी मिळूर २५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. विरोधी आमदारांच्या एकाही मतदारसंघात हा निधी मिळालेला नसून विकासकामे शून्य आहेत. केवळ हायवेवर कामे चालली आहेत तेवढीच, बाकी ग्रामीण भागांमध्ये ठणठणपाळ आहे. पक्षाच्या उत्तर आणि दक्षिण गोव्यातील आमदारांच्या दोन स्वतंत्र बैठका घेणार असून मुख्य सचिव, तसेच विविध खात्यांचे सचिव यांनाही याचा जाब द्यावा लागेल. 

खाणींच्या बाबतीत सरकारने वेळकाढू धोरण अवलंबिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दीड महिना काहीच केले नाही. त्यामुळे कामगारांवर बेकारीची पाळी आली आहे. खाण कंपन्या कामगार कपात करु लागले आहेत. चौगुले कं पनीने तीन खाणींवरील ५00 कामगारांना सेवेतून काढले आहे, असे कवळेकर म्हणाले. खाणींच्या प्रश्नी अभ्यासार्थ ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या काँग्रेसच्या समितीची एक बैठक झालेली आहे. पुढील विधिमंडळ बैठकीपर्यंत अहवाल मिळणार आहे. खाण प्रश्नावर विनाविलंब तोडगा काढणे आवश्यक आहे. 

वीज दरवाढ पूर्णपणे मागे घ्यावी, या मागणीचा कवळेकर यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, महागाई एवढी वाढली आहे की वीज बिलांचा आणखी भार जनता सहन करु शकत नाही. ४00 युनिटला जो दर व्यावसायिक आस्थापनांसाठी लागू आहे तोच दर घरगुती वापराच्या विजेसाठीही लागू करण्यात आला आहे आणि हे अन्यायकारक आहे. 

टॅग्स :BJPभाजपाgoaगोवाnewsबातम्या