शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

गोव्यात भाजपमधील असंतुष्ट आमदारच सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 20:51 IST

गोव्यात सरकार अस्थिर करण्यासाठी कॉँग्रेस नव्हे तर सत्ताधारी भाजपमध्ये असंतुष्ट असलेले काही आमदारच प्रयत्न करीत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी केला आहे. विकासाच्या मुद्यावर तसेच अन्य प्रश्नांवर हे सत्ताधारी आमदार नाराज आहेत.

पणजी - गोव्यात सरकार अस्थिर करण्यासाठी कॉँग्रेस नव्हे तर सत्ताधारी भाजपमध्ये असंतुष्ट असलेले काही आमदारच प्रयत्न करीत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी केला आहे. विकासाच्या मुद्यावर तसेच अन्य प्रश्नांवर हे सत्ताधारी आमदार नाराज आहेत. काँग्रेसने प्रयत्न केले असते तर एव्हाना नवे सरकार स्थापनही झाले असते, असा दावा त्यांनी केला. विकासकामांसाठी २५ कोटी सोडाच २५ रुपयेसुध्दा मिळालेले नाहीत. खाणबंदीचा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीतही सरकार गंभीर नाही, असा आरोप कवळेकर यांनी केला. 

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीत मतदारसंघ विकास निधीचा विषय प्रामुख्याने चर्चेला आला. कवळेकर म्हणाले की, पर्रीकर यांनी सत्ताधाºयांसह विरोधी काँग्रेसच्या सर्व १६ ही आमदारांची बैठक घेऊन आधी १५ कोटी आणि नंतर उर्वरित १0 कोटी मिळूर २५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. विरोधी आमदारांच्या एकाही मतदारसंघात हा निधी मिळालेला नसून विकासकामे शून्य आहेत. केवळ हायवेवर कामे चालली आहेत तेवढीच, बाकी ग्रामीण भागांमध्ये ठणठणपाळ आहे. पक्षाच्या उत्तर आणि दक्षिण गोव्यातील आमदारांच्या दोन स्वतंत्र बैठका घेणार असून मुख्य सचिव, तसेच विविध खात्यांचे सचिव यांनाही याचा जाब द्यावा लागेल. 

खाणींच्या बाबतीत सरकारने वेळकाढू धोरण अवलंबिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दीड महिना काहीच केले नाही. त्यामुळे कामगारांवर बेकारीची पाळी आली आहे. खाण कंपन्या कामगार कपात करु लागले आहेत. चौगुले कं पनीने तीन खाणींवरील ५00 कामगारांना सेवेतून काढले आहे, असे कवळेकर म्हणाले. खाणींच्या प्रश्नी अभ्यासार्थ ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या काँग्रेसच्या समितीची एक बैठक झालेली आहे. पुढील विधिमंडळ बैठकीपर्यंत अहवाल मिळणार आहे. खाण प्रश्नावर विनाविलंब तोडगा काढणे आवश्यक आहे. 

वीज दरवाढ पूर्णपणे मागे घ्यावी, या मागणीचा कवळेकर यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, महागाई एवढी वाढली आहे की वीज बिलांचा आणखी भार जनता सहन करु शकत नाही. ४00 युनिटला जो दर व्यावसायिक आस्थापनांसाठी लागू आहे तोच दर घरगुती वापराच्या विजेसाठीही लागू करण्यात आला आहे आणि हे अन्यायकारक आहे. 

टॅग्स :BJPभाजपाgoaगोवाnewsबातम्या