शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
2
संसदेसह सार्वजनिक ठिकाणांवरून सावरकरांचे फोटो हटवण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालय याचिकेवर भडकलं; माजी अधिकाऱ्याला सुनावलं
3
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
4
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
5
सोन्या-चांदीचा ऐतिहासिक भडका, एका दिवसात चांदी १४,१४३ रुपयांनी महागली; Gold मध्येही तेजी, पाहा नवे दर
6
"ट्रम्प यांच्या खाण्याच्या सवयी जणू विषच!" आरोग्य सचिवांचा धक्कादायक खुलासा, काय खातात?
7
IT कंपनीत ५ वर्षे काम, पण पगार वाढण्याऐवजी घटला! जावा डेव्हलपरची 'Reddit' पोस्ट व्हायरल
8
पैसे वाटप करताना भाजप उमेदवाराच्या मुलास काँग्रेसच्या उमेदवाराने पकडले
9
'बिनविरोध' निवड झालेल्या उमेदवारांना मोठा दिलासा; हायकोर्टाने मनसेची याचिका फेटाळली
10
जितेंद्र यांनी प्रॉपर्टी मार्केटमध्ये उडवली खळबळ; जपानी कंपनीसोबत ५५९.२५ कोटी रुपयांचा करार, नक्की प्रकरण काय?
11
राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? 
12
जीवघेणा शेवट! जिच्यावर प्रेम केलं, तिचे आधीच होते २ बॉयफ्रेंड; सत्य समजताच 'तो' हादरला अन्...
13
प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...
14
ट्रम्प यांचा नवा 'रिअल इस्टेट' प्लॅन फसला! ग्रीनलँड विकत घेण्याच्या ऑफरला पंतप्रधानांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
15
पगारदारांनो लक्ष द्या! तुमच्या पीएफ खात्यावर मिळतोय ७ लाखांचा मोफत विमा; असा करा क्लेम
16
नोकरी सोडून शेतीची धरली कास! १३ लाखांच्या कर्जात बुडलेला तरुण आता कमावतोय वार्षिक २ कोटी
17
राधिका आपटेने बंडच पुकारलं! कामाच्या तासांवरुन निर्मात्यांसमोर ठेवल्या अटी, म्हणाली...
18
अत्यंत हलाखीची परिस्थिती, पत्र्याचं घर अन् गंभीर आजाराचा सामना; जालन्याचा काळू डॉन म्हणाला- "दर महिन्याला रक्त बदलावं लागतं..."
19
मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास...
20
आता चांदी ₹3 लाखच्या जवळ...! MCX वर 10800 रुपयांनी वधारला भाव; गुंतवणूकदारांना करतेय मालामाल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “शिवसेना बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न करू”; गोवा काँग्रेस साधणार संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 14:20 IST

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेसह सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीहून गोव्यात जाणार असून, त्यानंतर मुंबईला येणार आहेत.

पणजी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आठवडाभरापासून राज्यातील राजकीय संघर्ष पराकोटीला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. आठवडभरापासून वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने अखेर या राजकीय नाट्यात उडी घेत थेट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना बहुमत चाचणीचे पत्र दिले. यानंतर आता सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीवरून गोव्याला येणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता गोवाकाँग्रेसने बंडखोर आमदारांशी संवाद साधणार असल्याचे म्हटले आहे. 

राज्यातील राजकीय संघर्षाची चर्चा अवघ्या देशात आहे. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळणार का, बहुमत चाचणीला काय होणार याची प्रचंड उत्सुकता देशभरातील राजकीय वर्तुळात आहे. यातच एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीहून गोव्याला येत असल्याच्या वृत्तानंतर आता गोवाकाँग्रेसने महाराष्ट्रातील राजकीय संघर्षात उडी घेतली आहे. 

बंडखोर आमदारांची भेट घेणार 

बंडखोर आमदार गोव्यात आले की त्यांची भेट घेणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तसेच या बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न आम्ही करू, असा विश्वास गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केला आहे. तत्पूर्वी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून धीर दिला. आम्ही सोबत आहोत, घाबरण्यासारखे काही नाही. वेळ आल्यास तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ असेही सांगितले आहे. शिवसेनेत स्थिरता राहावी असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. २०१९ मध्ये लोकांनी आम्हाला जनतेने विरोधी बाकांवर बसण्याचं कौल दिला. परंतु त्यानंतर घडलेल्या घडामोडीत काँग्रेस सत्तेत आले, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

दरम्यान, महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आणि समृद्धीचे दिवस येवो, यासाठी आम्ही कामाख्या देवीकडे मागणे मागितले आहे. कामाख्या देवीचे दर्शन हे श्रद्धेचा विषय आहे. आपलं मागणं घेऊन सर्वच जण कामाख्या देवीकडे येतात आणि देवी त्यांना आशीर्वाद देतात, असे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे दर्शनानंतर म्हणाले. तसेच आम्ही मुंबईत आल्यावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आणि आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळgoaगोवाcongressकाँग्रेस