शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: किनारी भागात धुमाकूळच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 10:07 IST

उत्तर गोव्याच्या किनारी भागात धुमाकूळ सुरूच आहे.

उत्तर गोव्याच्या किनारी भागात धुमाकूळ सुरूच आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेऊन पोलिस यंत्रणा अधिक सक्रिय करण्याची गरज आहे. पर्यटकांवर वारंवार हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. पर्यटकांना लुटलेही जात आहे. पोलिस यंत्रणा याविरुद्ध लढण्यात कमी पडतेय. आमदार मायकल लोबो यांच्या मते तर बार्देश तालुक्याच्या किनारी भागात खंडणीराजही सुरू झाले आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी या विषयात लक्ष घालावे. सरकारमधील कुणाच्या आशीर्वादाने जर खंडणीराज सुरू झाले असेल तर तत्काळ ते बंद करावे, अन्यथा यापुढे गोव्यात हायप्रोफाईल रेस्टॉरंट सुरू करण्यास कुणीच व्यावसायिक पुढे येणार नाही. यातून गोव्याच्या पर्यटनाचे मोठे नुकसान होणार आहे. हणजूण येथे पर्यटकांवर काही जणांनी तलवारी व सुऱ्याने हल्ला केला. संबंधित पर्यटक गंभीर जखमी झाला आहे. याबाबतचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. केवळ गोव्यातच नव्हे तर देशाच्या विविध भागांमध्ये हा व्हिडीओ पोहोचला आहे. राष्ट्रीय दैनिकांतही बातमी झळकली आहे. 

गोव्यात कायद्याचे राज्य आहे की नाही, असा प्रश्न लोक विचारत आहेत. याबाबत चौकशी करून संबंधित पोलिसांना निलंबित केले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री सावंत यांनी काल दिला. त्यांची भूमिका स्वागतार्ह आहे. मात्र पर्यटकांना छळणे आणि स्थानिक यंत्रणेने रेस्टॉरंट व्यावसायिकांना छळणे हे समांतरपणे गोव्यात चालत आहे. याविरुद्ध व्यापक कारवाई करावी लागेल. पर्यटकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करावी लागेल. एखाद्या पर्यटकावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरदेखील पोलिस जर गंभीर कलमे लागू करणार नसतील तर ते धक्कादायकच म्हणावे लागेल. केवळ पोलिसांची बदली करून काम होणार नाही. पोलिस यंत्रणा कुणाबाबतच संवेदनशील नाही आणि पोलिसांमध्ये कायद्याची भीतीही राहिलेली नाही. पोलिसांचा वापर नको त्या कामासाठी सरकार करून घेते, त्यामुळे राजकारण्यांचा आशीर्वाद आपल्यावर आहे ही भावना किनारी भागातील अनेक पोलिसांमध्ये निर्माण झालेली आहे. काही रेस्टॉरंटमध्ये पोलिसांना पाठवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न अलीकडे होतोय. हा प्रयत्न कोण करतोय याच्याही मुळाशी मुख्यमंत्र्यांनी जाण्याची गरज आहे.

गोव्याचा खाण धंदा मध्यंतरी दोनवेळा बंद पडला आणि अनेक सामान्य कुटुंबे अडचणीत आली. पर्यटन धंदाही जर बंद पडला तर लाखो लोक बेरोजगार होतील. पर्यटनावरच अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. आपल्या घरातील खोल्या देश-विदेशी पर्यटकांना भाडेतत्त्वावर देऊन अनेक कुटुंबे गुजराण करत आहेत. पर्यटकांमुळे जलक्रीडा, टॅक्सी व्यवसाय, रेस्टॉरंट्स व हॉटेल्स चालतात. पेडणे व बार्देशच्या किनारपट्टीत इज व्यवसाय वाढलाय. त्याचे दुष्परिणाम गोमंतकीय समाजाला भोगावे लागत आहेत. मात्र आता पर्यटकांवर हल्ले, पर्यटकांचे सामान हॉटेलच्या खोल्यांमधून लुटणे, पर्यटकांच्या गाड्या अडविणे अशा पद्धतीनेही सतावणूक सुरू आहे. पर्यटकांची लूट जर सर्वबाजूने होऊ लागली तर पर्यटक अन्यत्र जाणे पसंत करतील. पर्यटकांनी एकदा पाठ फिरवली तर गोव्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते. हणजूण येथे ९ मार्च रोजी झालेली पर्यटक मारहाणीची घटना खूप गंभीर आहे. हॉटेलमध्ये झालेल्या वादानंतर पर्यटकांना तलवारीने मारले गेले, मात्र पोलिसांनी ३०७ कलम (खुनाचा प्रयत्न) लागू न करता ३२४ कलम लावून संशयित आरोपींना लगेच मोकळे सोडले होते. अनेकदा पर्यटक बिचारे घाबरून तक्रार करायला जात नाहीत. ते गोवा सोडणे पसंत करतात. हीच गोष्ट पोलिसांच्या व आरोपींच्या पथ्यावर पडत आहे.

अलीकडे वाहतूक पोलिस पर्यटकांची गाडी दिसली की, थांबवतात. वेगवेगळी कागदपत्रे मागतात, पैसे उकळतात. यापूर्वी एकदा पर्यटन मंत्री रोहन खंवटे व आमदार लोबो यांनीदेखील अशा प्रकारांविषयी चिंता व्यक्त केलेली आहे. गृहखाते अजूनही पर्यटकांचा छळ थांबवू शकलेले नाही. सावंत सरकार अधिकारावर येऊन याच महिन्याच्या अखेरीस वर्ष पूर्ण होईल. किनारी भागातील धुमाकूळ सरकार थांबवू शकत नसेल तर गोव्याच्या एकूणच प्रतिमेला गालबोट लागेल. मुख्यमंत्री सावंत यांना अधिकाधिक वेळ आता पोलिस दल सुधारण्यासाठी द्यावा लागेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत