शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

गोव्यात ३१ मेपर्यंत कर्फ्यू कायम राहणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 16:02 IST

कर्फ्यूवेळी पूर्वीप्रमाणेच सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहतील, असे त्यांनी स्पष्ट  केले.

पणजी : राज्यात सध्या अस्तित्वात असलेला कर्फ्यू हा येत्या दि. ३१ मेपर्यंत कायम असेल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी येथे जाहीर केले. तसेच कोविडची तिसरी लाट आल्यास ती आल्यास यशस्वीपणे हाताळावी या हेतूने सरकारने पंधरा सदस्यीय टास्क फोर्सची नियुक्ती जाहीर केली आहे. 

मंत्रालयात बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्री विश्वजित राणे व महसुल  मंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. राज्यव्यापी कर्फ्यूची मुदत परवा २३ रोजी संपुष्टात येत होती पण सध्याची स्थिती पाहता दि. ३१ पर्यंत कर्फ्यू कायम ठेवावा असे ठरले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोविड नियंत्रणात येत आहे. गोमेकॉ इस्पितळातील ऑक्सीजनचा प्रश्नही सुटला आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. कर्फ्यूवेळी पूर्वीप्रमाणेच सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोविडच्या तिसऱ्या लाटेवेळी मुलांना त्रास होऊ शकतो असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. त्यामुळे आम्ही त्याविरुद्ध उपाययोजना सुरू केली आहे. पंधरा सदस्यीय टास्क फोर्सवर सरकारी व खासगी क्षेत्रातील डॉक्टरांना स्थान देण्यात आले आहे. मी स्वत: या फोर्सचा अध्यक्ष असून आरोग्य मंत्रीही त्यावर आहेत. या शिवाय गोमेकोचे डीन डॉ बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती स्थापन केली जाईल. कोविडच्या तिसऱ्या लाटेवेळी कोणत्या नव्या आरोग्य सुविधा उभ्या कराव्या लागतील याविषयी ही समिती शिफारशी करील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ब्लेक फंगससाठी स्वतंत्र वार्ड 

ब्लेक फंगसचे अजूनपर्यंत फक्त सहाच रुग्ण राज्यात आढळले आहेत. त्यापैकी एक रुग्ण हा कोविड व ब्लेक फंगस अशा दोन्ही कारणांमुळे दगावला, असे आरोग्य मंत्री राणे यांनी सांगितले. ब्लेक फंगसच्या रुग्णांसाठी बांबोळीच्या सुपरस्पेशालिटी इस्पितळात स्वतंत्र विभाग तयार केला जाईल. दिल्लीत वगैरे कोविड रुग्ण व ब्लेक फंगसचे रुग्ण यांच्यासाठी वेगळे वार्ड आहेत. तसेच मुलांवरील उपचारांसाठी ६० खाटांचा स्वतंत्र आयसीयू विभाग सुरू केला जाईल, असे राणे यांनी नमूद केले.

वादळामुळे १४६ कोटींची हानी 

दरम्यान, राज्यात जे तोक्ते वादळ येऊन गेले, त्यामुळे एकूण १६४ कोटी रुपयांची हानी झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मच्छीमार, शेतकरी, बागायतदार यांचे नुकसान झाले. या शिवाय वीज क्षेत्रातील साधनसुविधा मोडून पडल्या. मच्छीमारांना तीन दिवस मासेमारीसाठी जाता आले नाही, त्या हानीचाही समावेश १४६ कोटींमध्ये केला गेला आहे. लोकांची घरे मोडली, त्याचाही समावेश करण्यात आला आहे. हा सगळा अहवाल आम्ही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठवणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

तेजपालप्रश्नी हायकोर्टात 

तरुण तेजपाल यास सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले असल्याविषयी पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता, हे दु:खद आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. एका महिलेवर अन्याय झालेला असून सरकार त्याविरुद्ध लगेच उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. सत्र न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध आम्ही आव्हान याचिका सादर करणारच असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महिलेवरील अन्याय आम्ही सहन करणार नाही असे ते म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतcorona virusकोरोना वायरस बातम्या