शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

गोव्यात ३१ मेपर्यंत कर्फ्यू कायम राहणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 16:02 IST

कर्फ्यूवेळी पूर्वीप्रमाणेच सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहतील, असे त्यांनी स्पष्ट  केले.

पणजी : राज्यात सध्या अस्तित्वात असलेला कर्फ्यू हा येत्या दि. ३१ मेपर्यंत कायम असेल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी येथे जाहीर केले. तसेच कोविडची तिसरी लाट आल्यास ती आल्यास यशस्वीपणे हाताळावी या हेतूने सरकारने पंधरा सदस्यीय टास्क फोर्सची नियुक्ती जाहीर केली आहे. 

मंत्रालयात बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्री विश्वजित राणे व महसुल  मंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. राज्यव्यापी कर्फ्यूची मुदत परवा २३ रोजी संपुष्टात येत होती पण सध्याची स्थिती पाहता दि. ३१ पर्यंत कर्फ्यू कायम ठेवावा असे ठरले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोविड नियंत्रणात येत आहे. गोमेकॉ इस्पितळातील ऑक्सीजनचा प्रश्नही सुटला आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. कर्फ्यूवेळी पूर्वीप्रमाणेच सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोविडच्या तिसऱ्या लाटेवेळी मुलांना त्रास होऊ शकतो असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. त्यामुळे आम्ही त्याविरुद्ध उपाययोजना सुरू केली आहे. पंधरा सदस्यीय टास्क फोर्सवर सरकारी व खासगी क्षेत्रातील डॉक्टरांना स्थान देण्यात आले आहे. मी स्वत: या फोर्सचा अध्यक्ष असून आरोग्य मंत्रीही त्यावर आहेत. या शिवाय गोमेकोचे डीन डॉ बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती स्थापन केली जाईल. कोविडच्या तिसऱ्या लाटेवेळी कोणत्या नव्या आरोग्य सुविधा उभ्या कराव्या लागतील याविषयी ही समिती शिफारशी करील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ब्लेक फंगससाठी स्वतंत्र वार्ड 

ब्लेक फंगसचे अजूनपर्यंत फक्त सहाच रुग्ण राज्यात आढळले आहेत. त्यापैकी एक रुग्ण हा कोविड व ब्लेक फंगस अशा दोन्ही कारणांमुळे दगावला, असे आरोग्य मंत्री राणे यांनी सांगितले. ब्लेक फंगसच्या रुग्णांसाठी बांबोळीच्या सुपरस्पेशालिटी इस्पितळात स्वतंत्र विभाग तयार केला जाईल. दिल्लीत वगैरे कोविड रुग्ण व ब्लेक फंगसचे रुग्ण यांच्यासाठी वेगळे वार्ड आहेत. तसेच मुलांवरील उपचारांसाठी ६० खाटांचा स्वतंत्र आयसीयू विभाग सुरू केला जाईल, असे राणे यांनी नमूद केले.

वादळामुळे १४६ कोटींची हानी 

दरम्यान, राज्यात जे तोक्ते वादळ येऊन गेले, त्यामुळे एकूण १६४ कोटी रुपयांची हानी झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मच्छीमार, शेतकरी, बागायतदार यांचे नुकसान झाले. या शिवाय वीज क्षेत्रातील साधनसुविधा मोडून पडल्या. मच्छीमारांना तीन दिवस मासेमारीसाठी जाता आले नाही, त्या हानीचाही समावेश १४६ कोटींमध्ये केला गेला आहे. लोकांची घरे मोडली, त्याचाही समावेश करण्यात आला आहे. हा सगळा अहवाल आम्ही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठवणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

तेजपालप्रश्नी हायकोर्टात 

तरुण तेजपाल यास सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले असल्याविषयी पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता, हे दु:खद आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. एका महिलेवर अन्याय झालेला असून सरकार त्याविरुद्ध लगेच उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. सत्र न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध आम्ही आव्हान याचिका सादर करणारच असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महिलेवरील अन्याय आम्ही सहन करणार नाही असे ते म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतcorona virusकोरोना वायरस बातम्या