शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

गोव्यात आता शाळा प्रवेशाची लगबग, इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षांचे निकाल जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 13:48 IST

गोव्यात इयत्ता पहिली ते नऊवीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले असून शैक्षणिक प्रवेशासाठी खात्याने यंदा निर्बंध घातलेले आहेत.

पणजी - गोव्यात इयत्ता पहिली ते नऊवीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले असून शैक्षणिक प्रवेशासाठी खात्याने यंदा निर्बंध घातलेले आहेत. विद्यालयांनजीक राहणा-या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार असून देणग्या घेणा-या व्यवस्थापनांचे अनुदान होणार बंद केले जाईल. प्रवेशासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. सचिवालय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बैठकीत या गोष्टींना हिरवा कंदिल दाखवला असून वरील दोन्ही विषयांशी संबंधित परिपत्रके बुधवारी काढण्यात येणार आहेत.

सर्व सरकारी तसेच अनुदानित विद्यालयांना हे निर्बंध लागू होतील. शहरांमधील शाळा, विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पालक गर्दी करतात आणि शाळेपासून जवळ राहणा-या मुलांना अनेकदा प्रवेशापासून वंचित व्हावे लागते. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शाळाही पटसंख्येअभावी ओस पडतात. या गोष्टी टाळण्यासाठी हा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. 

प्राथमिक शाळेसाठी १ किलोमीटरपर्यंतच्या विद्यार्थ्यांना, शाळेसाठी 3 किलोमीटरपर्यंतच्या तर हायस्कूल प्रवेशासाठी 5 किलोमीटरपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. दहावीला शंभर टक्के निकाल मिळविणा-या विद्यालयांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश मिळावा, असा पालकांचा आग्रह असतो त्यासाठी घरापासून दूर विद्यालय असले तरी तेथे पाल्यांना पाठवण्याची तयारी असते. अशावेळी शहरांमधील काही मोजक्याच शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालक गर्दी करीत असतात. त्यामुळेच हे निर्बंध घालण्यात आलेले आहेत. 

शिशुवर्ग, इयत्ता पहिली किंवा पाचवीसाठी प्रवेशाकरिता काही शाळा व्यवस्थापने मोठ्या रकमेच्या देणग्या मागतात. अनेकदा शाळेसाठी इमारत बांधण्याच्या नावाखालीही देणग्या घेतल्या जातात. यासंबंधीच्या अनेक तक्रारी खात्याकडे सर्रास येत असत. सरकारने याची गंभीर दखल घेत अशा शाळांच्या व्यवस्थापनांवर दंडात्मक  किंवा प्रसंगी अनुदान बंद करण्याची कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे.

2017-18 च्या या शैक्षणिक अहवालातून काही आकडेवारी समोर आली आहे. त्याप्रमाणे राज्यात 1252 लोकांमागे एक प्राथमिक शाळा, 3515 लोकांमागे एक माध्यमिक शाळा आणि 13,505 लोकांमागे एक उच्च माध्यमिक विद्यालय आहे. प्राथमिक आणि मिडल स्कूल स्तरावर 24 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक तर माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर 21 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षण असे प्रमाण आहे.  राज्यातील शैक्षणिक वर्ष 4 जूनपासून सुरु होत असून त्या दिवशी शाळा सुरु होतील. 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीgoaगोवा