शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

गोव्यात आता शाळा प्रवेशाची लगबग, इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षांचे निकाल जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 13:48 IST

गोव्यात इयत्ता पहिली ते नऊवीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले असून शैक्षणिक प्रवेशासाठी खात्याने यंदा निर्बंध घातलेले आहेत.

पणजी - गोव्यात इयत्ता पहिली ते नऊवीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले असून शैक्षणिक प्रवेशासाठी खात्याने यंदा निर्बंध घातलेले आहेत. विद्यालयांनजीक राहणा-या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार असून देणग्या घेणा-या व्यवस्थापनांचे अनुदान होणार बंद केले जाईल. प्रवेशासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. सचिवालय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बैठकीत या गोष्टींना हिरवा कंदिल दाखवला असून वरील दोन्ही विषयांशी संबंधित परिपत्रके बुधवारी काढण्यात येणार आहेत.

सर्व सरकारी तसेच अनुदानित विद्यालयांना हे निर्बंध लागू होतील. शहरांमधील शाळा, विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पालक गर्दी करतात आणि शाळेपासून जवळ राहणा-या मुलांना अनेकदा प्रवेशापासून वंचित व्हावे लागते. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शाळाही पटसंख्येअभावी ओस पडतात. या गोष्टी टाळण्यासाठी हा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. 

प्राथमिक शाळेसाठी १ किलोमीटरपर्यंतच्या विद्यार्थ्यांना, शाळेसाठी 3 किलोमीटरपर्यंतच्या तर हायस्कूल प्रवेशासाठी 5 किलोमीटरपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. दहावीला शंभर टक्के निकाल मिळविणा-या विद्यालयांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश मिळावा, असा पालकांचा आग्रह असतो त्यासाठी घरापासून दूर विद्यालय असले तरी तेथे पाल्यांना पाठवण्याची तयारी असते. अशावेळी शहरांमधील काही मोजक्याच शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालक गर्दी करीत असतात. त्यामुळेच हे निर्बंध घालण्यात आलेले आहेत. 

शिशुवर्ग, इयत्ता पहिली किंवा पाचवीसाठी प्रवेशाकरिता काही शाळा व्यवस्थापने मोठ्या रकमेच्या देणग्या मागतात. अनेकदा शाळेसाठी इमारत बांधण्याच्या नावाखालीही देणग्या घेतल्या जातात. यासंबंधीच्या अनेक तक्रारी खात्याकडे सर्रास येत असत. सरकारने याची गंभीर दखल घेत अशा शाळांच्या व्यवस्थापनांवर दंडात्मक  किंवा प्रसंगी अनुदान बंद करण्याची कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे.

2017-18 च्या या शैक्षणिक अहवालातून काही आकडेवारी समोर आली आहे. त्याप्रमाणे राज्यात 1252 लोकांमागे एक प्राथमिक शाळा, 3515 लोकांमागे एक माध्यमिक शाळा आणि 13,505 लोकांमागे एक उच्च माध्यमिक विद्यालय आहे. प्राथमिक आणि मिडल स्कूल स्तरावर 24 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक तर माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर 21 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षण असे प्रमाण आहे.  राज्यातील शैक्षणिक वर्ष 4 जूनपासून सुरु होत असून त्या दिवशी शाळा सुरु होतील. 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीgoaगोवा