शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गोवा : म्हादईप्रश्नी मुख्यमंत्र्यांकडून म्हादई बचाव अभियानाच्या नेत्याशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 13:13 IST

कर्नाटक राज्याला पिण्याचे पाणी वापरण्यासाठी द्यावे पण ते केवळ म्हादईच्या खो-यातच वापरले जात असेल तरच मान्यता द्यावी, अशा प्रकारची भूमिका गोवा सरकार हळूहळू घेऊ लागले आहे.

पणजी : कर्नाटक राज्याला पिण्याचे पाणी वापरण्यासाठी द्यावे पण ते केवळ म्हादईच्या खो-यातच वापरले जात असेल तरच मान्यता द्यावी, अशा प्रकारची भूमिका गोवा सरकार हळूहळू घेऊ लागले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी सकाळी गोव्यातील म्हादई बचाव अभियानाचे सचिव राजेंद्र केरकर यांच्याशी कर्नाटकच्या मागणीबाबत चर्चा केली. 

गेली अनेक वर्षे कर्नाटक राज्यासोबत गोवा सरकार पाणीप्रश्नी भांडत आहे. कर्नाटक राज्याने म्हादई नदीवर अनेक धरणे बांधून शेतीसाठी पाणी वळविण्याची योजना कागदोपत्री आखली आहे. त्याचबरोबर कर्नाटकच्या काही भागांना पिण्यासाठीही पाणी हवे आहे. गेली अनेक वर्षे पाणी तंटा लवादासमोर म्हादईचा प्रश्न असून तिथे सुनावणी सुरू आहे. म्हादई पाणीप्रश्नी सध्या लवादासमोर महाराष्ट्र व कर्नाटक राज्य एकाबाजूला आणि गोवा राज्य विरुद्ध बाजूला अशी स्थिती आहे. 

कर्नाटक राज्याने आपल्याला पिण्यासाठीच पाणी द्या, अशी मागणी नव्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना साकडे घालून केली. गोवा सरकारला कर्नाटकने पत्रही लिहिले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे बुधवारी शहा यांना भेटले व त्यांनी म्हादईप्रश्नी झालेल्या विविध राजकीय नेत्यांच्या बैठकीतही भाग घेतला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बुधवारी रात्री गोव्यात परतले. गुरुवारी सकाळी त्यांनी म्हादई बचाव अभियानाचे नेते राजेंद्र केरकर यांच्याशी चर्चा केली. गेली अनेक वर्षे केरकर यांनी म्हादई पाणीप्रश्नाचा सखोल अभ्यास केला आहे. गोवा सरकार जागे होण्यापूर्वी पंधरा वर्षापासून केरकर, निर्मला सावंत, डॉ. नंदकुमार कामत आदी पर्यावरणप्रेमी म्हादई पाणी तंटाप्रश्नी चळवळ व जागृती करत आले आहेत. 

केरकर यांच्याशी मुख्यमंत्र्यांची बोलणी झाली तेव्हा केरकर याना सरकार कोणता निर्णय घेऊ शकते याची कल्पना आली. आम्ही पिण्यासाठी कर्नाटकला पाणी देण्यासाठी यापूर्वीही कधी विरोध केला नव्हता, अशी भूमिका आता गोवा सरकार घेऊ लागले आहे. म्हादई पाणीप्रश्नी गोवा सरकारची भूमिका मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गुरुवारी सायंकाळर्पयत कर्नाटक राज्याला कळवणार आहेत. लवादासमोर जो तंटा सुरू आहे, तो सुरूच राहील. त्याबाबत गोवा सरकार तडजोड करणार नाही. तसेच म्हादईच्या नदीचे पाणी दुस:या नदीच्या खो-यामध्ये नेऊ दिले जाणार नाही. म्हादईच्या खो:यात राहूनच जर पिण्यासाठी कर्नाटक राज्य पाणी वापरणार असेल तर त्यासाठी गोवा सरकारचा आक्षेप नसेल, अशी माहिती मिळाली.

राजेंद्र कारेकर

टॅग्स :goaगोवाenvironmentवातावरणManohar Parrikarमनोहर पर्रीकर