शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

गोव्यात चतुर्थीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, जाणून घ्या नेमकं कसं असणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:55 IST

गोव्यात चतुर्थीसाठी येणाऱ्या गणेशभक्तांनी ४८ तास आधी मान्यताप्राप्त लॅबमधून घेतलेला कोविड चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सोबत आणल्यास क्वारंटाइन राहावे लागणार नाही.

पणजी - गणेश चतुर्थीसाठी गोवा सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. तसा आदेश महसूल सचिव संजय कुमार यांनी काढला आहे. अन्य राज्यांमधून गोव्यात चतुर्थीसाठी येणाऱ्या गणेशभक्तांनी ४८ तास आधी मान्यताप्राप्त लॅबमधून घेतलेला कोविड चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सोबत आणल्यास क्वारंटाइन राहावे लागणार नाही. अन्यथा १४ दिवस घरात क्वारंटाइन राहावे लागेल. गोव्यातील अनेक लोक नोकरी, धंद्यानिमित्त परराज्यात आहेत. दरवर्षी गणेश चतुर्थीला ते आपल्या गावी येत असतात.

शेजारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील अनेक लोक गोव्यात नोकरी, व्यवसायासाठी आहेत त्यांनाही गावी जाणे शक्य होणार नाही. अन्य राज्यांमध्ये सणासाठी जाणाऱ्यांनी गणेश उत्सव आटोपून गोव्यात परतताना एक तर कोविड निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणावा किंवा आल्यानंतर १४ दिवस होम क्वारंटाइन रहावे लागेल. सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फुटांपेक्षा अधिक उंचीची असू नये असे बजावले आहे. सार्वजनिक मंडळांनी करमणुकीचे कार्यक्रम, देखावे करण्यास मनाई आहे.

- कंटेनमेंट झोन किंवा कोविडमुळे सील केलेल्या भागांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला मनाई आहे.- चतुर्थीसाठी बाजारांवर पालिका, पंचायती यांनी देखरेख ठेवावी. गर्दी टाळण्यासाठी बाजाराची वेळ वाढवावी.- चित्रशाळांमध्ये गर्दी करु नये. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी चित्रशाळेत येऊ नये. तसेच चित्रशाळांनी २0 ऑगस्टपासूनच मूर्ती वितरण सुरु करावे.- गणेश मूर्तीसाठी राज्याची हद्द ओलांडून त्याच दिवशी २४ तासात परत गोव्यात आल्यास अशा व्यक्तीला चाचणी रिपोर्ट  किंवा क्वारंटाइनची गरज नाही.- सार्वजनिक मंडळांनी करमणुकीचे कार्यक्रम, देखावे करण्यास मनाई आहे. शक्य तो मंडळांनी आॅनलाइन दर्शनाची सोय करावी. या मंडळांना गणेशोत्सवास परवानगीबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी निर्णय घ्यावा.- सार्वजनिक गणेशमूर्ती बसविण्यासाठी तसेच विसर्जनाला ६ पेक्षा अधिक लोकांना परवानगी नाही. लोकांनीही एकमेकांच्या घरी जाणे टाळावे.- सार्वजनिक गणपतीच्या आरतीसाठी १0 पेक्षा अधिक गणेशभक्तांनी एकत्र येऊ नये. शारीरीक दुरीचे पालन करावे तसेच तोंडावर मास्क वापरावा.- सायंकाळी ५ ते रात्री १0 या वेळेतच विसर्जन करावे. विसर्जनासाठी पंचायती, पालिकांनी तासातासाच्या नियोजनाने वेळापत्रक तयार करावे.- गणेशमूर्ती नेणाऱ्या वाहनात पाचपेक्षा अधिक लोकांना परवानगी नाही.- भटजींनी शारिरीक दुरी तसेच मास्क परिधान वगैरे मार्गदर्शक तत्त्वें पाळावीत.

दहीहंडीस मनाई

येत्या मंगळवारी जन्माष्ठमी असून त्यानिमित्त बुधवारी होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे. जन्माष्टमीनिमित्त धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांनाही मनाई आहे. लोकांनी शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी जाऊ नये असे बजावण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या