शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

गोव्यात चतुर्थीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, जाणून घ्या नेमकं कसं असणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:55 IST

गोव्यात चतुर्थीसाठी येणाऱ्या गणेशभक्तांनी ४८ तास आधी मान्यताप्राप्त लॅबमधून घेतलेला कोविड चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सोबत आणल्यास क्वारंटाइन राहावे लागणार नाही.

पणजी - गणेश चतुर्थीसाठी गोवा सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. तसा आदेश महसूल सचिव संजय कुमार यांनी काढला आहे. अन्य राज्यांमधून गोव्यात चतुर्थीसाठी येणाऱ्या गणेशभक्तांनी ४८ तास आधी मान्यताप्राप्त लॅबमधून घेतलेला कोविड चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सोबत आणल्यास क्वारंटाइन राहावे लागणार नाही. अन्यथा १४ दिवस घरात क्वारंटाइन राहावे लागेल. गोव्यातील अनेक लोक नोकरी, धंद्यानिमित्त परराज्यात आहेत. दरवर्षी गणेश चतुर्थीला ते आपल्या गावी येत असतात.

शेजारी सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील अनेक लोक गोव्यात नोकरी, व्यवसायासाठी आहेत त्यांनाही गावी जाणे शक्य होणार नाही. अन्य राज्यांमध्ये सणासाठी जाणाऱ्यांनी गणेश उत्सव आटोपून गोव्यात परतताना एक तर कोविड निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणावा किंवा आल्यानंतर १४ दिवस होम क्वारंटाइन रहावे लागेल. सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फुटांपेक्षा अधिक उंचीची असू नये असे बजावले आहे. सार्वजनिक मंडळांनी करमणुकीचे कार्यक्रम, देखावे करण्यास मनाई आहे.

- कंटेनमेंट झोन किंवा कोविडमुळे सील केलेल्या भागांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला मनाई आहे.- चतुर्थीसाठी बाजारांवर पालिका, पंचायती यांनी देखरेख ठेवावी. गर्दी टाळण्यासाठी बाजाराची वेळ वाढवावी.- चित्रशाळांमध्ये गर्दी करु नये. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी चित्रशाळेत येऊ नये. तसेच चित्रशाळांनी २0 ऑगस्टपासूनच मूर्ती वितरण सुरु करावे.- गणेश मूर्तीसाठी राज्याची हद्द ओलांडून त्याच दिवशी २४ तासात परत गोव्यात आल्यास अशा व्यक्तीला चाचणी रिपोर्ट  किंवा क्वारंटाइनची गरज नाही.- सार्वजनिक मंडळांनी करमणुकीचे कार्यक्रम, देखावे करण्यास मनाई आहे. शक्य तो मंडळांनी आॅनलाइन दर्शनाची सोय करावी. या मंडळांना गणेशोत्सवास परवानगीबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी निर्णय घ्यावा.- सार्वजनिक गणेशमूर्ती बसविण्यासाठी तसेच विसर्जनाला ६ पेक्षा अधिक लोकांना परवानगी नाही. लोकांनीही एकमेकांच्या घरी जाणे टाळावे.- सार्वजनिक गणपतीच्या आरतीसाठी १0 पेक्षा अधिक गणेशभक्तांनी एकत्र येऊ नये. शारीरीक दुरीचे पालन करावे तसेच तोंडावर मास्क वापरावा.- सायंकाळी ५ ते रात्री १0 या वेळेतच विसर्जन करावे. विसर्जनासाठी पंचायती, पालिकांनी तासातासाच्या नियोजनाने वेळापत्रक तयार करावे.- गणेशमूर्ती नेणाऱ्या वाहनात पाचपेक्षा अधिक लोकांना परवानगी नाही.- भटजींनी शारिरीक दुरी तसेच मास्क परिधान वगैरे मार्गदर्शक तत्त्वें पाळावीत.

दहीहंडीस मनाई

येत्या मंगळवारी जन्माष्ठमी असून त्यानिमित्त बुधवारी होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे. जन्माष्टमीनिमित्त धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांनाही मनाई आहे. लोकांनी शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी जाऊ नये असे बजावण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या