शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

अमित शहांच्या सभेत चैतन्याचा अभाव का? गर्दीही मर्यादितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 18:18 IST

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी  शनिवारी जी सभा घेतली, त्या सभेत चैतन्याचा अभाव दिसून आला. सभेला अपेक्षित प्रमाणात गर्दी झालीच नाही, शिवाय उपस्थित गर्दीमध्ये जे चैतन्य जागवण्याची गरज होती, त्यातही शहा कमी पडले.

पणजी : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी  शनिवारी जी सभा घेतली, त्या सभेत चैतन्याचा अभाव दिसून आला. सभेला अपेक्षित प्रमाणात गर्दी झालीच नाही, शिवाय उपस्थित गर्दीमध्ये जे चैतन्य जागवण्याची गरज होती, त्यातही शहा कमी पडले. धक्कादायक म्हणजे शहा यांचे भाषण सुरू झाले व मोठ्या संख्येने लोक माघारी जाण्यास आरंभ झाल्याचे आढळून आले. व्यासपीठावरील अनेक आमदारांच्याही हे लक्षात आले.

भाजपाच्या कोअर टीमच्या एका सदस्याने लोकमतला सांगितले, की शनिवारी अनेक ठिकाणी विवाह सोहळे होते आणि त्यामुळे लोकांची गर्दी कमी झाली. 30 ते 40 हजार गर्दी सामावून घेण्याची ज्या स्टेडियमची क्षमता आहे, त्या स्टेडियमवर फक्त 15 हजार लोक जमले. हे भाजपाचे बूथ कार्यकर्ता संमेलन आहे, असे जरी सांगितले गेले तरी, प्रत्यक्षात त्या संमेलनामध्ये कार्यकर्त्यांपेक्षा अन्य लोकच जास्त होते. कथित कार्यकर्ता संमेलनाचे रुपांतर भाजपाने शहा यांच्या जाहीर सभेत करून टाकले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चार मिनिटांचे भाषण झाले तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच जोश आला पण शहा बोलायला उभे राहिले आणि त्यांचे पहिले वाक्य सुरू होताच पर्रीकर हे व्यासपीठावरून उतरत आपल्या निवासस्थानी निघून गेले. आजारपणामुळे ते व्यासपीठावर जास्त वेळ बसू शकले नाही. पर्रीकर जाताच गर्दीतील बरेच लोक माघारी जाऊ लागले. यावेळी व्यासपीठावरील एका नेत्याने भाजपाच्या एका मंत्र्याला तुम्ही आणलेले लोक माघारी जाऊ लागले असे खासगीत सांगितले. तेव्हा ते आपण आणलेले लोक नव्हे, आपले लोक अजून बसून आहेत असे उत्तर त्या मंत्र्याने दिले.

अमित शहा यांच्या सभेविषयी लोकांत क्रेझ नव्हती. पंतप्रधान मोदी यांची सभा असती तर जास्त गर्दी झाली असती व शेवटपर्यंत सगळे लोक थांबले असते असे एका आमदाराने सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर हे भाषण करून माघारी गेल्यामुळे गर्दीमध्ये चुकीचा संदेश गेला अशी प्रतिक्रिया रविवार व सोमवारी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांत  व्यक्त झाली. 

काही आमदार आणि मंत्र्यांनी मतदारसंघातून जास्त लोक आणले नाही. काहीजणांनी आपण दीड ते अडीच हजार लोक मतदारसंघातून आणू असे भाजपाच्या कोअर टीमला सांगितले होते. प्रत्यक्षात पाचशे ते सहाशेच आणले. सत्तरी तालुक्यातूनही यावेळी जास्त गर्दी आली नाही. भाजपाने सभेला आलेल्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि खाद्य पदार्थ खाण्याची व्यवस्था व्यवस्थित केली होती. गर्दीमध्ये शिस्तही होती. स्टेडियमवरून मात्र खाली येऊन बसण्यास बऱ्याचजणांनी नकार दिला. ते स्टेडियममध्येच बसून राहिले. यामुळे एकाबाजूने सभास्थळी खुर्च्या रिकाम्या राहिल्या होत्या. अमित शहा यांचे भाषण गर्दीला चार्ज करू शकले नाही. जर त्यांनी खनिज खाणींचा प्रश्न ठराविक दिवसांत सुटेलच असे जाहीर केले असते तर गर्दीवर थोडा परिणाम झाला असता अशी प्रतिक्रिया खाणपट्ट्यातील  भाजपाचे काही आजी-माजी आमदार व्यक्त करत आहेत. श्रीपाद नाईक यांच्या भाषणात दम नव्हता. सुलक्षणा सावंत यांचे भाषण प्रभावी ठरले. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाManohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाBJPभाजपा