शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अखेरचा लढा, पण निर्णायक द्या; काँग्रेसचे पेडणेवासीयांना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 14:58 IST

नपेक्षा लोकशाहीऐवजी एकाधिकारशाही येईल.

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे: नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशात आणि राज्यात प्रत्येक माणसाच्या मनात दहशत निर्माण केला आहे. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याविरोधात प्रत्येकाने लढणे अपेक्षित आहे. २०२४ सालची लोकसभा निवडणूक लढाई ही मुक्ती मिळवण्याची शेवटची लढाई आहे. त्यामुळे निर्णायक लढा द्या. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास भविष्यात लोकशाहीऐवजी एकाधिकारशाही निर्माण होईल, याचा प्रत्येक मतदाराने विचार करून बदल घडवून आणायलाच हवा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पेडणे येथे केले.

पेडणे येथील शासकीय विश्रामगृहात पेडणे गट काँग्रेस पक्षाकडून आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पाटकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप, इतर पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष एम. के. शेख, प्रदेश काँग्रेस सचिव विजय भिके, सचिव सुदिन नाईक, उत्तर गोवा सचिव प्रणव परब, युवाध्यक्ष जोएल आंद्रेद, पेडणे मतदारसंघ गटाध्यक्ष कृष्णा नाईक, सरचिटणीस अॅड. जितेंद्र गावकर, प्रकाश किनळेकर व इतर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष पाटकर म्हणाले की, भाजप सरकारने राज्यात मोठमोठे प्रकल्प आणून युवकांना भूलवत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. पेडणेतील मनोहर आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाला जमीन दिलेल्या भूमिपुत्रांना डावलून मोपा विमानतळावर परप्रांतीयांना रोजगार आणि नोकरी उपलब्ध करून दिली. भूमिपुत्रांना स्वतंत्र टॅक्सी काउंटरसाठी आपल्या हक्कांसाठी झगडावे लागत आहे.

पेडणेतील शासकीय विश्रामगृहात सोमवारी संध्याकाळी पेडणे मतदारसंघातील गट समितीतर्फे आयोजित कार्यकर्ता बैठक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नेते सखाराम परब यांनी केले. पेडणे मतदार संघाचे गटाध्यक्ष कृष्णा नाईक यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सरचिटणीस अॅड. जितेंद्र गावकर यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. काँग्रेसच्या या बैठकीत काँग्रेसचे पुरुष आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. रमाकांत खलप यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्याचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ, तिळारी कालवा, पेडणे तालुक्याला जोडणारा कोलवाळचा पूल, चांदल येथील जलशुद्धीकरण प्रकल्प ही काँग्रेस पक्षाची देणं आहेत. चारपदरी महामार्ग, पाणी, सौरउर्जा, पवनचक्कीद्वारे वीज निर्मिती ही काँग्रेसची कल्पना आहे. उत्तर गोव्यातून २५ वर्षात काँग्रेसचा खासदार नाही. त्यासाठी बदल अपेक्षित आहे. इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना अणुबॉम्बद्वारे जगाला आपली ताकद दाखवून दिली, देशाचे सामर्थ्य निर्माण कार्य काँग्रेसने केली. प्रगतीचा पाया कॉंग्रेसने रचला, काँग्रेसने देशाला सामर्थ्यवान सरकार दिले. आगामी निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी बुथ सक्रिय होणे आवश्यक आहे, असे अॅड. खलप म्हणाले.

महामार्गाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह

पेडणेतील महामार्ग भावी पिढी नष्ट करणार, एवढा दर्जाहीन बनवला आहे. कामानिमित्त दररोज या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची हाडे खिळखिळी बनत आहेत. तरीही भाजपच्या प्रलोभनांना भुलून युवक भाजपलाच साथ देत आहेत, हे दुर्देवी आहे, असे पाटकर म्हणाले. सुकेकुळण धारगळ येथील अपघातात स्थानिक आमदाराने राजकारण केले. एवढेच नव्हे, कथित आर्थिक व्यवहारही केला, असा आरोप केला. अशा प्रकारचे भ्रष्ट सरकार सत्ताभष्ट होण्यासाठी लोकांनीच पुढाकार घ्यायला हवा. विद्यमान खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना म्हादई का वाचवू शकले नाहीत, याचा जाब लोकोनी विचारायला हवा, असे पाटकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस