शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

अखेरचा लढा, पण निर्णायक द्या; काँग्रेसचे पेडणेवासीयांना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 14:58 IST

नपेक्षा लोकशाहीऐवजी एकाधिकारशाही येईल.

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे: नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशात आणि राज्यात प्रत्येक माणसाच्या मनात दहशत निर्माण केला आहे. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याविरोधात प्रत्येकाने लढणे अपेक्षित आहे. २०२४ सालची लोकसभा निवडणूक लढाई ही मुक्ती मिळवण्याची शेवटची लढाई आहे. त्यामुळे निर्णायक लढा द्या. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास भविष्यात लोकशाहीऐवजी एकाधिकारशाही निर्माण होईल, याचा प्रत्येक मतदाराने विचार करून बदल घडवून आणायलाच हवा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पेडणे येथे केले.

पेडणे येथील शासकीय विश्रामगृहात पेडणे गट काँग्रेस पक्षाकडून आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पाटकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप, इतर पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष एम. के. शेख, प्रदेश काँग्रेस सचिव विजय भिके, सचिव सुदिन नाईक, उत्तर गोवा सचिव प्रणव परब, युवाध्यक्ष जोएल आंद्रेद, पेडणे मतदारसंघ गटाध्यक्ष कृष्णा नाईक, सरचिटणीस अॅड. जितेंद्र गावकर, प्रकाश किनळेकर व इतर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष पाटकर म्हणाले की, भाजप सरकारने राज्यात मोठमोठे प्रकल्प आणून युवकांना भूलवत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. पेडणेतील मनोहर आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाला जमीन दिलेल्या भूमिपुत्रांना डावलून मोपा विमानतळावर परप्रांतीयांना रोजगार आणि नोकरी उपलब्ध करून दिली. भूमिपुत्रांना स्वतंत्र टॅक्सी काउंटरसाठी आपल्या हक्कांसाठी झगडावे लागत आहे.

पेडणेतील शासकीय विश्रामगृहात सोमवारी संध्याकाळी पेडणे मतदारसंघातील गट समितीतर्फे आयोजित कार्यकर्ता बैठक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नेते सखाराम परब यांनी केले. पेडणे मतदार संघाचे गटाध्यक्ष कृष्णा नाईक यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सरचिटणीस अॅड. जितेंद्र गावकर यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. काँग्रेसच्या या बैठकीत काँग्रेसचे पुरुष आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. रमाकांत खलप यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्याचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ, तिळारी कालवा, पेडणे तालुक्याला जोडणारा कोलवाळचा पूल, चांदल येथील जलशुद्धीकरण प्रकल्प ही काँग्रेस पक्षाची देणं आहेत. चारपदरी महामार्ग, पाणी, सौरउर्जा, पवनचक्कीद्वारे वीज निर्मिती ही काँग्रेसची कल्पना आहे. उत्तर गोव्यातून २५ वर्षात काँग्रेसचा खासदार नाही. त्यासाठी बदल अपेक्षित आहे. इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना अणुबॉम्बद्वारे जगाला आपली ताकद दाखवून दिली, देशाचे सामर्थ्य निर्माण कार्य काँग्रेसने केली. प्रगतीचा पाया कॉंग्रेसने रचला, काँग्रेसने देशाला सामर्थ्यवान सरकार दिले. आगामी निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी बुथ सक्रिय होणे आवश्यक आहे, असे अॅड. खलप म्हणाले.

महामार्गाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह

पेडणेतील महामार्ग भावी पिढी नष्ट करणार, एवढा दर्जाहीन बनवला आहे. कामानिमित्त दररोज या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची हाडे खिळखिळी बनत आहेत. तरीही भाजपच्या प्रलोभनांना भुलून युवक भाजपलाच साथ देत आहेत, हे दुर्देवी आहे, असे पाटकर म्हणाले. सुकेकुळण धारगळ येथील अपघातात स्थानिक आमदाराने राजकारण केले. एवढेच नव्हे, कथित आर्थिक व्यवहारही केला, असा आरोप केला. अशा प्रकारचे भ्रष्ट सरकार सत्ताभष्ट होण्यासाठी लोकांनीच पुढाकार घ्यायला हवा. विद्यमान खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना म्हादई का वाचवू शकले नाहीत, याचा जाब लोकोनी विचारायला हवा, असे पाटकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस