शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
3
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
4
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
5
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
6
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
7
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
8
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
9
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
10
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
11
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
12
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
13
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
14
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
15
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
16
इथिओपियातून दिल्लीत आली ज्वालामुखीची राख; तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक 
17
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
18
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
19
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
20
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
Daily Top 2Weekly Top 5

अखेरचा लढा, पण निर्णायक द्या; काँग्रेसचे पेडणेवासीयांना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 14:58 IST

नपेक्षा लोकशाहीऐवजी एकाधिकारशाही येईल.

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे: नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशात आणि राज्यात प्रत्येक माणसाच्या मनात दहशत निर्माण केला आहे. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याविरोधात प्रत्येकाने लढणे अपेक्षित आहे. २०२४ सालची लोकसभा निवडणूक लढाई ही मुक्ती मिळवण्याची शेवटची लढाई आहे. त्यामुळे निर्णायक लढा द्या. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास भविष्यात लोकशाहीऐवजी एकाधिकारशाही निर्माण होईल, याचा प्रत्येक मतदाराने विचार करून बदल घडवून आणायलाच हवा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पेडणे येथे केले.

पेडणे येथील शासकीय विश्रामगृहात पेडणे गट काँग्रेस पक्षाकडून आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पाटकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप, इतर पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष एम. के. शेख, प्रदेश काँग्रेस सचिव विजय भिके, सचिव सुदिन नाईक, उत्तर गोवा सचिव प्रणव परब, युवाध्यक्ष जोएल आंद्रेद, पेडणे मतदारसंघ गटाध्यक्ष कृष्णा नाईक, सरचिटणीस अॅड. जितेंद्र गावकर, प्रकाश किनळेकर व इतर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष पाटकर म्हणाले की, भाजप सरकारने राज्यात मोठमोठे प्रकल्प आणून युवकांना भूलवत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. पेडणेतील मनोहर आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाला जमीन दिलेल्या भूमिपुत्रांना डावलून मोपा विमानतळावर परप्रांतीयांना रोजगार आणि नोकरी उपलब्ध करून दिली. भूमिपुत्रांना स्वतंत्र टॅक्सी काउंटरसाठी आपल्या हक्कांसाठी झगडावे लागत आहे.

पेडणेतील शासकीय विश्रामगृहात सोमवारी संध्याकाळी पेडणे मतदारसंघातील गट समितीतर्फे आयोजित कार्यकर्ता बैठक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नेते सखाराम परब यांनी केले. पेडणे मतदार संघाचे गटाध्यक्ष कृष्णा नाईक यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सरचिटणीस अॅड. जितेंद्र गावकर यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. काँग्रेसच्या या बैठकीत काँग्रेसचे पुरुष आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. रमाकांत खलप यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्याचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ, तिळारी कालवा, पेडणे तालुक्याला जोडणारा कोलवाळचा पूल, चांदल येथील जलशुद्धीकरण प्रकल्प ही काँग्रेस पक्षाची देणं आहेत. चारपदरी महामार्ग, पाणी, सौरउर्जा, पवनचक्कीद्वारे वीज निर्मिती ही काँग्रेसची कल्पना आहे. उत्तर गोव्यातून २५ वर्षात काँग्रेसचा खासदार नाही. त्यासाठी बदल अपेक्षित आहे. इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना अणुबॉम्बद्वारे जगाला आपली ताकद दाखवून दिली, देशाचे सामर्थ्य निर्माण कार्य काँग्रेसने केली. प्रगतीचा पाया कॉंग्रेसने रचला, काँग्रेसने देशाला सामर्थ्यवान सरकार दिले. आगामी निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी बुथ सक्रिय होणे आवश्यक आहे, असे अॅड. खलप म्हणाले.

महामार्गाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह

पेडणेतील महामार्ग भावी पिढी नष्ट करणार, एवढा दर्जाहीन बनवला आहे. कामानिमित्त दररोज या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची हाडे खिळखिळी बनत आहेत. तरीही भाजपच्या प्रलोभनांना भुलून युवक भाजपलाच साथ देत आहेत, हे दुर्देवी आहे, असे पाटकर म्हणाले. सुकेकुळण धारगळ येथील अपघातात स्थानिक आमदाराने राजकारण केले. एवढेच नव्हे, कथित आर्थिक व्यवहारही केला, असा आरोप केला. अशा प्रकारचे भ्रष्ट सरकार सत्ताभष्ट होण्यासाठी लोकांनीच पुढाकार घ्यायला हवा. विद्यमान खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना म्हादई का वाचवू शकले नाहीत, याचा जाब लोकोनी विचारायला हवा, असे पाटकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस