शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

लोकसभा उमेदवार लवकर द्या; काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रभारी टागोरांकडे आग्रही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 08:58 IST

या मॅरेथॉन बैठकीत काहीजणांनी प्रदेशाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: लोकसभेसाठी लवकर उमेदवार द्या, तसेच राज्यसभा निवडणूकही पक्षाने लढवावीच, अशी आग्रही मागणी गुरुवारी काँग्रेस राज्य कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रभारी माणिकम टागोर यांच्याकडे करण्यात आली. तब्बल चार तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत काहीजणांनी प्रदेशाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. 

तिकीट जाहीर करण्याच्या बाबतीत पक्षाकडून नेहमीच विलंब होतो व त्याचा फटका उमेदवाराला बसतो. यावेळी याची पुनरावृत्ती होऊ नये. लवकर उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी बहुतांश पदाधिकाऱ्यांनी केली. विधानसभेत काँग्रेसचे केवळ तीन आमदार असले तरी पक्षाने राज्यसभेसाठीही उमेदवार द्यावाच असा सूर व्यक्त करण्यात आला. टागोर यांनी या भावना आपण श्रेष्ठींपर्यंत पोहोचवतो, असे आश्वासन दिले.वाढती महागाई, बेरोजगारी तसेच भ्रष्टाचार यामुळे जनता भाजप सरकारला कंटाळली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत गोव्यात दोन्ही जागांवर काँग्रेसला विजयाची संधी आहे, याकडे टागोर यांचे लक्ष वेधण्यात आले. काही पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

विरोधी, समविचारींनी एकत्र यावे: टागोर

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना टागोर म्हणाले की, पक्ष संघटना मजबूत करण्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. देशभरात विरोधी समविचारी पक्ष एकत्र येत आहेत. गोव्यातही हे व्हायला हवे. विधिमंडळ पक्षनेत्याला याबाबत मी मार्गदर्शन केले आहे. मोदी, शहा यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी एकत्र यायला हवे.टागोर म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवार द्यावा, अशी प्रत्येकाची भावना आहे. ही भावना श्रेष्ठींपर्यंत पोहोचवीन लोकसभेसाठी लवकर तिकीट देण्याचा प्रयत्न करू. उमेदवार निवडण्यासाठी पक्षाची जी प्रचलित पद्धत आहे त्यानुसारच निवड केली जाईल. 

टागोर यांनी अल्पसंख्याकांवर देशभरात जे हल्ले होत आहेत त्याचा निषेध केला. मणिपूर येथे चर्च जाळल्या तसेच काल परवा आदिवासींवर हल्ले केले. या घटनांचा बैठकीत निषेध केल्याचे ते म्हणाले.

आरजी सत्तेत की विरोधात? : अमित पाटकर

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, 'पक्ष मजबूत करण्याबाबत चर्चा विनिमयासाठी ही बैठक होती. लोकसभा निवडणुकीच्याबाबतीत कसे पुढे व एकूणच तयारी यासंबंधीही चर्चा झाली. गट स्तरावर पक्ष मजबूत केला जाईल. लोकसभा लढविण्यासाठी काहीजणांनी इच्छा व्यक्त केली आहे. परंतु लोकशाही पद्धतीनेच उमेदवारी दिली जाईल. अखिल भारतीय काँग्रेस समिती सर्वेक्षणासाठी पथक पाठवणार आहे. इच्छुक जरी जास्त असले तरी कोणालाही उमेदवारी दिली तरी एकत्रपणे काम करण्याची तयारी सर्वांनी दाखवली आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमांव म्हणाले की, 'बैठकीत सकारात्मक चर्चा झालेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीविषयी आम्ही बोललो. प्रभारींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार पक्ष मजबूत करण्यावर भर दिला जाईल. आगामी विधानसभा अधिवेशनात सरकारला जनतेच्या विविध प्रश्नांवरून आम्ही घेरणार आहोत.. फुटीर आमदारांच्या मतदारसंघांमधील प्रश्नही आम्ही प्रभावीपणे मांडणार आहोत.

सार्दिन अनुपस्थित

दरम्यान, पक्षाचे दक्षिण गोव्याचे फ्रान्सिस सार्दिन काल बैठकीला फिरकले नाहीत. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला होता. पत्रकारांकडे नंतर खुलासा करताना प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, तातडीच्या कामानिमित्त दिल्लीला जावे लागल्याने सार्दिन बैठकीला येऊ शकले नाहीत.'

 

टॅग्स :goaगोवाlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेस