शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गणेशोत्सव: विसर्जनस्थळी पुन्हा गणेशमूर्तीची आरती नकोच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 10:18 IST

प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मूर्तीला कोणत्याही परिस्थितीत एका जागेवरून हलवू नये. तसेच एकदा उत्तरपूजा झाली की त्या मूर्तीतले देवत्व जाते, त्यानंतर विसर्जनस्थळी नेऊन काही भाविक मूर्तीला आरती दाखवतात, असे करणे अयोग्यच.

- डॉ. अरुण देसाई

हल्लीच श्री नागेश महारुद्र संस्थान, बांदिवडे यांनी दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते गुरुजी यांना पंचांग कार्यशाळेसाठी पाचारण केले होते. गुरुजी म्हणजे एक अत्यंत साधे सरळ, मनमिळावू आणि निगर्वी व्यक्तिमत्त्व वाटले. ही कार्यशाळा अत्यंत छान पार पडली. या स्तुत्य उपक्रमासाठी मंदिर संस्थानचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. भारतीय पंचांग, भारतीय गणित, भारतीय खगोलशास्त्र हे किती खोलवर आहे, याचे थोडेसे प्रात्यक्षिकच गुरुजींनी यावेळी दाखवले. 

पहिल्या दिवशी पंचांग आणि ज्योतिषशास्त्राबद्दल असलेली थोडीशी जिज्ञासा आणि कुतूहल म्हणून कित्येक नवीन व्यक्ती कार्यशाळेत सहभागी होताना दिसल्या. गुरुजींनी यावेळी बारा राशींवर लिहिले जाणारे राशिभविष्य यावर एक विनोद केला. त्यावेळी ही मंडळी अत्यंत दिलखुलास हसली, पण त दिवशी ज्यावेळी कार्यशाळेची समाप्ती झाली त्यावेळी पंचागाची अचूकता, कार्यप्रणाली इत्यादीविषयी प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर आपले पूर्वज आपले गणित, खगोलशास्त्र किती महान होते व आहे हे जाणून या सर्व श्रोत्यांची छाती गर्वाने आणि अभिमानाने फुलून आली होती. रोजच्या धार्मिक निर्णयांचे शंका समाधान गुरुजींनी ओघवत्या शैलीत केले. या विषयावर एक अभ्यास त्यांनी कालसुसंगत' 'आचारधर्म' हा ग्रंथदेखील प्रसिद्ध केला आहे, त्याबद्दल माहिती दिली.

गणेश चतुर्थी हा गोमंतकीयांचा जणू जिव्हाळ्याचा विषय. याविषयीसुद्धा गुरुजींना कित्येकांन प्रश्न विचारले. त्याची योग्य समर्पक उत्तरे त्यांनी दिली. गणेश चतुर्थीचे पूजन एखाद्या आलेले असेल तर अचानक बंद केले तर चालते का? यावर उत्तर देताना गुरुजी म्हणाले, की गणेश चतुर्थी हा कुलाचार नसून ते देवकार्य आहे. त्यामुळे ते कधीही सुरू केले आणि कधीही बंद केले तरी चालते. 

काही कारणाने भाद्रपद शु. चतुर्थीला गणेश पूजन करता न आल्यास ते एका महिन्यानंतर केले तर चालते का? या प्रश्नाला उत्तर देताना गुरुजी म्हणाले की, गणेश चतुर्थी ही भाद्रपद शु. चतुर्थी या दिवशी करायची असते. ती नंतर पुढे ढकलून अन्य वेळी करण्यास कोणताही शास्त्राधार नाही. अशी काही अडचण आल्यास पूजा सरळ दुसऱ्या वर्षी करावी. 

मूळच्या संकल्पनेनुसार गणेशाची पूजा ही सकाळी स्थानिक मातीपासून मूर्ती बनवून तिला पिंजर गंधाने नाक डोळे तयार करून दिवसभर त्या मूर्तीची पूजा करून संध्याकाळी तिचे विसर्जन करायचे असते. पण कधी कधी गौरी आणि गणपती पूजन एकाच दिवशी आल्यामुळे गणेश पूजनाचा प्रसाद स्त्रियांचा उपवास असल्यामुळे त्यांना ग्रहण करता येत नाही, त्यामुळे सोय म्हणून गणपती दीड दिवसांचे करण्यात आले. आणि त्याचे स्वरूप थोडे मोठे होऊन हळूहळू पाच, सात, नऊ दिवस झाले. 

प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मूर्तीला कोणत्याही परिस्थितीत एका जागेवरून हलवू नये असे त्यांनी सांगितले. तसेच एकदा उत्तरपूजा झाली की त्या मूर्तीतले देवत्व जाते, त्यानंतर विसर्जनस्थळी नेऊन काही भाविक मूर्तीला आरती दाखवतात, असे करणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. सोयरसुतका वेळी घरातली पंचायतन पूजा शक्यतो ते दहा दिवस बंद ठेवू नये, तर दुसऱ्या कोणाकडून तरी करून घ्यावी. तीन दिवसांहून अधिक काळ पूजा न झाल्यास मूर्तीतील देवत्व कमी होते, असेही ते म्हणाले.

बाळाच्या जन्मानंतर मुलगा झाल्यास पेढे आणि मुलगी झाल्यावर बर्फी वाटणे इथून खऱ्या अंधश्रद्धेला सुरुवात होते, असे बोलणे कुठेतरी भाषणातून गुरुजींच्या कानावर पडले. त्यावर भाष्य करताना गुरुजी म्हणाले, की असे करणे ही अंधश्रद्धा नसून बर्फी वाटणे वगैरे हा एक संकेत आहे. मुलगी पुढे बारावी पास झाल्यानंतर आपण पेढेच बर्फी नाही आणि मुलाच्या लग्नाचे लाडू कधी असे विचारतो तर मुलीच्या लग्नाची बर्फी कधी असे विचारत नाही, तर तर तिथेपण विचारतो, अशी त्यांनी कोटी केली. 

अजून एक किस्सा सांगताना गुरुजी म्हणाले, की कुणीतरी त्यांना म्हणे विचारले की टीव्हीवर हल्ली रुद्राक्ष, माळा इत्यादी साहित्याची फार जाहिरात होते. तुमची ज्योतिषांची सध्या सगळीकडे चलती आहे. यावर गुरुजींनी मिश्किल उत्तर दिले. ते म्हणाले की, अशा जाहिराती हजार लोकांनी पाहिल्या त्यातल्या ५० लोकांनी त्यातले रुद्राक्ष, हर माळा इत्यादी विकत घेतले आणि पाच लोकांना त्यातून काहीतरी फायदा पण झाला असेल. पण त्याच टीव्हीवर साबणाच्या जाहिरातीत चाळीस वर्षांची स्त्री साबण वापरून वीस वर्षांची बनते, असे धादांत खोटे सांगितले जाते; अशा जाहिरातीवर तुमचा आक्षेप का नाही? असा प्रतिसवाल त्यांनी केला. सरकारी सुट्टया जाहीर करताना सुद्धा दाते पंचांगाचा उपयोग होतो, अशीही माहिती यावेळी मिळाली. 

इतर मंदिर संस्थानांनी सुद्धा या कार्यशाळेतून प्रेरणा घेऊन भारतीय संस्कृती, धर्म, खगोलशास्त्र इ. विषयी जनजागृती कार्यक्रम मुद्दाम घडवून आणावेत. तसेच याबाबतचे वेगवेगळे साहित्य, ग्रंथ संस्थानांतर्फे लोकांसाठी उपलब्ध करून द्यावे. असाही सूर येथे उमटला.

 

टॅग्स :goaगोवाGaneshotsavगणेशोत्सव