शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

चतुर्थीला महाराष्ट्रातून होते पुरोहितांची आयात 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 12:26 PM

आराध्य दैवत तसेच प्रत्येकाला प्रिय असलेल्या गणेश चतुर्थीच्या सणाला गोवेकरांना पुरोहित मिळणे दुरापास्त झाल्याने तसेच दरवर्षी गणेश भक्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने गोवेकरांसाठी महाराष्ट्रातून पुरोहित चतुर्थीला आयात करण्याची वेळ आली आहे.

म्हापसा : आराध्य दैवत तसेच प्रत्येकाला प्रिय असलेल्या गणेश चतुर्थीच्या सणाला गोवेकरांना पुरोहित मिळणे दुरापास्त झाल्याने तसेच दरवर्षी गणेश भक्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने गोवेकरांसाठी महाराष्ट्रातून पुरोहित चतुर्थीला आयात करण्याची वेळ आली आहे. चतुर्थीसाठी गोवेकरांची गरज भागवून आणलेले पुरोहित मंगळवारी सकाळी परतीच्या वाटेवर निघून गेले.  

गोव्यात दरवर्षी सार्वजनिक गणोशोत्सवासोबत घरातील गणपतीची पूजा करणा-या भक्तांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात घरात गणपतीची पूजा करणा-यांची संख्या लाखाच्या घरात गेली आहे. वाढत्या संख्येबरोबर पुरोहितांची वाढती गरज भागवण्यासाठी म्हणावे त्या प्रमाणे पुरोहीत उपलब्ध नसल्याने त्यांच्या तुटवडा भासू लागला आहे. ब-याच पुरोहितांनी आपला पारंपरिक व्यवसाय सोडून इतर प्रकारच्या व्यवसायाला प्राधान्य दिल्याने तुटवडा भासण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. त्यामुळे पुरोहित आयात करण्यात आले होते.  

आयात केलेले पुरोहित चतुर्थीच्या दोन दिवस अगोदर दाखल व्हायला सुरुवात होतात. त्यांची संख्याही बराच मोठी असते. महाराष्ट्रातील पढंरपूर, नांदेड, कोल्हापूर, नाशिक सारख्या भागातून पुरोहित आणले जातात. तसेच कर्नाटकातील गोकर्ण, अंकोला या भागातून सुद्धा आणले जातात. चतुर्थीच्या काळातील त्यांचा वास्तव्याचा कालावधी पाच ते सात दिवसापर्यंतचा असतो. राज्यातील जास्त प्रमाणावरील गणपती पाच दिवसांचे असल्याने किमान पाच दिवसानंतर ते माघारी निघून जातात. यंदा सुद्धा चतुर्थीसाठी आणलेले बहुतेक पुरोहित मंगळवारी सकाळी परतीच्या वाटेवर निघून गेले. त्यांच्या राहण्यापासून ते इतर सर्व प्रकारची त्यांची व्यवस्था केली जाते. त्यांना आणण्यापूर्वी त्यांना देण्यात येणारी रक्कम सुद्धा निश्चित केलेली असते. 

सरासरीवर एक पुरोहीत जास्तीत-जास्त शंभर गणपतीचे पूजन दर दिवशी करीत असतो. पहाटे ४ वाजल्या पासून सुरू केलेली पूजा संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू असते. चतुर्थी नंतर दुस-या पंचमीच्या दिवशी अभिषेक करण्यात येत असतो. दुस-या दिवशीही पहिल्या दिवसा प्रमाणे उशीर होत असतो. दीड दिवस गणपतीच्या विसर्जनानंतर काही लोकांच्या घरात सत्यनारायण पूजेचे आयोजनही केले जाते. पुरोहीतांच्या सोयीनुसार सत्यनारायण पूजेचा वेळ ठरवण्यात येतो. त्यातून होणारा हा उशीर पुरोहितांच्या कमतरतेमुळे अटळ असतो. होत असलेल्या उशीरामुळे दुपारचा नैवेद्य संध्याकाळच्यावेळी ग्रहण करणे भाग पडत असते. 

गोव्यातील ब-याच गावांत असलेल्या देवस्थानच्या पुजा-यावर संबंधीत गावातील गणेश पूजन करण्याची जबाबदारी असते. गाव मोठा असला तर त्यांना दुस-या पुरोहिताचा वापर केल्या शिवाय पर्याय उपलब्ध नसतो. त्यामुळे ही आयात करणे भाग पडत असते. पुरोहितांची आयात करून सुद्धा अनेकांना वेळेवर पुरोहित मिळत नसल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी भक्तांनी कॅसेटचा वापर करायला सुरुवात केली. तर काही गावांनी स्वत:हून पूजा करण्यावर भक्तांनी भर दिला आहे. त्यामुळे घरात वेळेवर सगळी देवकृत्ये होत असतात अशी माहिती काही लोकांनी दिली.

गावातील सगळ्या लोकांशी सलोख्याचे संबंध असल्याने चतुर्थीला त्यांची गरज वेळेवर भागवावी लागते. त्यामुळे दरवर्षी किमान २५ पुरोहितांची गरज भासत असल्याची माहिती पुरुषोत्तम जोशी यांनी दिली. निर्धारीत वेळेत सगळ्यांच्या पूजा करणे शक्य होत नसल्याने गरज भागवण्यासाठी इतर राज्यातून पुरोहित आणावे लागतात. सगळ्यांच्या पूजा वेळेवर करुन द्याव्या लागतात असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवgoaगोवा