शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आल्तीनो येथील चार घरे भर पावसात पाडण्यात आली, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई

By समीर नाईक | Updated: July 4, 2024 14:54 IST

सुमारे २००८ सालापासून या जागेच्या विषयावरुन न्यायालयीन घटला सुरु होता.

पणजी: आल्तिनो येथे श्री गणेश मंदिराच्या मागील भागात असलेली चार घरे पणजी महानगरपालिकेच्या मदतीने पाडण्यात आली. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. एकूण ४ घरे पाडण्यात आली असून, दोन घरे बुधवारी पाडण्यात आली, तर उर्वरीत दोन घरे गुरुवारी पाडण्यात आली.

 सुमारे २००८ सालापासून या जागेच्या विषयावरुन न्यायालयीन घटला सुरु होता. भाटकारने हा खटला दाखल केला होता, अखेर निर्णय भाटकारच्या बाजूने लागल्याने उच्च न्यायालयाने घरे पाडण्याचा आदेश जारी केला होता. येथील कुटूंबियांना घर खाली करण्यासाठी आठवड्याभराची मुदतही देण्यात आली होती. मनपातर्फे एक घर मोडण्यामागे ५०,००० रुपये वसूल करण्यात येणार असल्याचे देखील या कुटूंबियांना कळविण्यात आले होते, पण पैसे जास्त होत असल्याने या कुटूंबियांनी स्वत:च आपली घरे पाडली.

गेली ४५ वर्षे ही चार कुटूंबीय येथे राहत होती, पण आता त्यांची घरे भर पावसात पाडण्यात येत असल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. मनपाला या घरांनी कधीच घर कर भरलेला नाही, परंतु या घरांना विज व पाणी जोडणी मिळालेली होती. जर ही घरे बेकायदेशीर होती, तर या घरांना विज व पाणी जोडणी कशी मिळाली? याबाबतही चर्चा सुरु आहे. या घरातील एक युवक आताच पोलिस खात्यात भरती झाला आहे.

या बेघर झालेल्या कुटूंबियांनी आमदार बाबुश मोन्सेरात यांची भेट घेत याबाबत चर्चा केली होती, परंतु न्यायालयीन आदेश असल्याने मोन्सेरातही काहीच करु शकले नाही. तरीही बाबुश यांनी या कुटूंबियांना सर्वेापरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.