शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

बेकायदा बांधकामाविरोधात राज्यात भरारी पथकांची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:26 IST

सरकार अॅक्शन मोडवर : जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी; तालुकास्तरावर होणार पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी सरकारने तालुकास्तरावर भरारी पथके स्थापन केली आहेत. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष आदेश जारी करून तालुका स्तरावरील भरारी पथके तयार केली आहेत.

सात सदस्यांचा समावेश असलेली ही भरारी पथके तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एका तासाच्या आत कारवाई करतील. बेकायदेशीर बांधकामे, बेकायदेशीर डोंगर कापणी, जमिनीवर भराव टाकणे असे प्रकार थांबविण्यासाठी ही पथके नियुक्त करण्यात आली आहेत. उपजिल्हाधिकारी आणि मामलेदार या पथकाचे प्रमुख तर पोलिस निरीक्षक उपप्रमुख असतील. पालिकेचे मुख्य अधिकारी, गटविकास अधिकारी, तलाठी आणि इतर अधिकारी या पथकाचे सदस्य असणार आहेत. या पथकांचा संपर्क क्रमांक लोकांसाठी जाहीर करण्यात येणार आहे. लोकांच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करण्यासाठी ही पथके आहेत.

काही मंत्री, आमदारांना बेकायदा बांधकामे पाडलेली नको आहेत. मुख्यमंत्र्यांना तशी विनंतीही करण्यात आलेली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही हा विषय उपस्थित झाला होता. बांधकामे पडल्यास त्याचा फटका पुढील निवडणुकीत भाजपला बसू शकतो, असे काही मंत्री, आमदारांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठकीत दिले होते आदेश

रस्त्यालगतची बेकायदा व्यावसायिक बांधकामे हटवण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिलेली आहे. सरकार कोणतीही बेकायदा बांधकामे खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी २७ रोजी उच्चस्तरीय बैठकीनंतर दिला होता. हायकोर्टाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. बेकायदा व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. 

सरकार बेकायदा बांधकामांना थारा देणार नाही. बेकायदेशीर बांधकामांवर तसेच सरकारी व कोमुनिदाद जमिनींवरील अतिक्रमणांच्या बाबतीत १०० क्रमांकावर तक्रार आल्यास तलाठी, मामलेदार व उपजिल्हाधिकारी कडक कारवाई करतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते, त्या अनुषंगाने आदेश काढण्यात आलेला आहे.

कोमुनिदादींसाठी आता पूर्णवेळ प्रशासक नेमणार

पूर्णवेळ प्रशासक नेमून सर्व कोमुनिदादींचे कामकाज सुरळीत केले जाईल. कर्मचारी भरती तसेच शंभर टक्के संगणकीकरण केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी काल सर्व कोमुनिदादींची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, काही कोमुनिदादींमध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याचे आढळून आले आहे. मोठ्या व मजबूत कोमुनिदादींना स्वतंत्र कारकून, संगणक ऑपरेटर्स आदी कर्मचारी भरती करावी लागेल. सधन असलेल्या कोमुनिदादी हा खर्च उचलू शकतात. ज्यांना शक्य नाही त्यांना सरकार सहकार्य करील.

दरम्यान, उत्तर गोव्यातच सुमारे ७५ कोमुनिदादी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, रिक्त जागांवर भरती केल्यानंतर सर्व रेकॉर्ड योग्यरीत्या ठेवता येईल व कोमुनिदादींचे कामकाज सुरळीत होईल. संगणकीकरण व रेकॉर्ड मेंटेनन्स यासंबंधी कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा घेतली जाईल.

कोमुनिदादींचे काम उत्तर, दक्षिण व मध्य अशा तीन विभागांमधून चालते. कूळ कायद्याखाली कसण्यासाठी जमिनी दिल्या; परंतु काहींनी व्यावसायिक किंवा निवासासाठी त्या वापरल्या. या जमिनी महाराष्ट्र कृषी कूळ कायद्यातील तरतुदीप्रमाणे परत घेतल्या जाव्यात, अशीही मागणी या अधिवेशनात करण्यात आली होती.

अतिक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना तसेच कोमुनिदाद संहितेत कोणत्याही दुरुस्त्या करण्याआधी सरकारने कोमुनिदादींना विश्वासात घ्यावे, अशाही मागण्या आहेत.

मागण्यांवर चर्चा

गेल्या वर्षी कोमुनिदादींच्या झालेल्या अधिवेशनात बेकायदा बांधकामांसह अनेक विषय उपस्थित झाले होते. कोमुनिदाद जमिनींवरील अशा बेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी कोमुनिदाद अॅटर्नीना अधिकार बहाल केले जावेत, अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. एकूण १२ मागण्यांचे ठराव या अधिवेशनात संमत करण्यात आले होते. यातील काही मागण्यांवरही कालच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारPramod Sawantप्रमोद सावंत