शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

पणजीतील मळा भागातील पूर रोखण्यासाठी उपाय योजना, जलस्रोत मंत्र्यांनी घेतली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 14:41 IST

मळा भागात दरवर्षी पावसाळ्यात पूर स्थिती उद्भवते. गेल्या पावसाळ्यात 25 घरांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालं.

पणजी - माजी केंद्रीय संरक्षण मंत्री तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी पंचवीस वर्षे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेले राजधानी पणजी शहर सर्वार्थाने पुढारलेले असले तरी शहराच्या मळा भागात पावसाळ्यात येणारी पुराची समस्या काही कमी झालेली नाही. पर्रीकर यांच्या निधनानंतर नवे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या पुढाकाराने मळा पूरस्थितीवर नुकतीच जलस्रोतमंत्र्यांनी बैठक घेऊन उपाय योजनांबाबत आठ दिवसांच्या आत अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

या बैठकीला महापौर उदय मडकईकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहरातील मळा भागात दरवर्षी पावसाळ्यात पूर स्थिती उद्भवते. गेल्या पावसाळ्यात 25 घरांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालं. दरवर्षी पावसात रुअ द औरे खाडीचे पाणी मळा भागातील घरांमध्ये शिरते आणि सखल भागातील घरांमधील कुटुंबांच्या सामानाचे अतोनात नुकसान होते. सखल भाग असल्याने या घरांना धोका निर्माण झालेला आहे. सलग मुसळधार पाऊस झाला आणि भरती असली की मांडवी नदीचे पाणी रुअ द औरें खाडीमध्ये येते आणि मळा येथील घरांमध्ये शिरते. हा प्रकार दरवर्षी होतो. गेल्या पावसात सात ते आठ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले होते. स्थानिक आमदार व महापौर यांनी या कुटुंबांची येथील एका लॉजमध्ये व्यवस्था केली होती. 

दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे महापालिका त्रस्त आहे. स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात यांनी याकामी पुढाकार घेतला असून जलस्रोतमंत्र्यांकडे मळ्यातील पुराच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या घरांचा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मंत्र्यांनी वरील बैठक बोलावली. वन खात्याच्या अधिकाऱ्यांना पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. पुढील आठ दिवसात खर्चाचे अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. इफ्फी संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे या गोष्टीचा पाठपुरावा केला जाईल, असे महापौर मडकईकर यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे ज्येष्ठ निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. बबन इंगोले यांनी मळा येथील पूर या विषयावर अभ्यास केला आहे. पाटो भागात काँक्रिटची जंगले उभी झाली असून याठिकाणी मोठ्या संख्येने खारफुटींचा संहार केला आहे. मळा येथे दरवर्षी येणाऱ्या पुराचे हेही एक प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले. इंगोले म्हणाले की, पाटो भागात छोटे-छोटे नाले होते ते कॉंक्रिटीकरणामुळे बुजविले गेले व या ठिकाणी मोठ्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. पाण्याला वाट मिळत नाही आणि त्यामुळे पूर येतो. इंगोले यांच्या मते या घरांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना व्हायला हव्यात. 

टॅग्स :goaगोवाIFFIइफ्फीfloodपूरManohar Parrikarमनोहर पर्रीकरRainपाऊस