शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पणजीतील मळा भागातील पूर रोखण्यासाठी उपाय योजना, जलस्रोत मंत्र्यांनी घेतली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 14:41 IST

मळा भागात दरवर्षी पावसाळ्यात पूर स्थिती उद्भवते. गेल्या पावसाळ्यात 25 घरांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालं.

पणजी - माजी केंद्रीय संरक्षण मंत्री तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी पंचवीस वर्षे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेले राजधानी पणजी शहर सर्वार्थाने पुढारलेले असले तरी शहराच्या मळा भागात पावसाळ्यात येणारी पुराची समस्या काही कमी झालेली नाही. पर्रीकर यांच्या निधनानंतर नवे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या पुढाकाराने मळा पूरस्थितीवर नुकतीच जलस्रोतमंत्र्यांनी बैठक घेऊन उपाय योजनांबाबत आठ दिवसांच्या आत अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

या बैठकीला महापौर उदय मडकईकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहरातील मळा भागात दरवर्षी पावसाळ्यात पूर स्थिती उद्भवते. गेल्या पावसाळ्यात 25 घरांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालं. दरवर्षी पावसात रुअ द औरे खाडीचे पाणी मळा भागातील घरांमध्ये शिरते आणि सखल भागातील घरांमधील कुटुंबांच्या सामानाचे अतोनात नुकसान होते. सखल भाग असल्याने या घरांना धोका निर्माण झालेला आहे. सलग मुसळधार पाऊस झाला आणि भरती असली की मांडवी नदीचे पाणी रुअ द औरें खाडीमध्ये येते आणि मळा येथील घरांमध्ये शिरते. हा प्रकार दरवर्षी होतो. गेल्या पावसात सात ते आठ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले होते. स्थानिक आमदार व महापौर यांनी या कुटुंबांची येथील एका लॉजमध्ये व्यवस्था केली होती. 

दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे महापालिका त्रस्त आहे. स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात यांनी याकामी पुढाकार घेतला असून जलस्रोतमंत्र्यांकडे मळ्यातील पुराच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या घरांचा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मंत्र्यांनी वरील बैठक बोलावली. वन खात्याच्या अधिकाऱ्यांना पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. पुढील आठ दिवसात खर्चाचे अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. इफ्फी संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे या गोष्टीचा पाठपुरावा केला जाईल, असे महापौर मडकईकर यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे ज्येष्ठ निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. बबन इंगोले यांनी मळा येथील पूर या विषयावर अभ्यास केला आहे. पाटो भागात काँक्रिटची जंगले उभी झाली असून याठिकाणी मोठ्या संख्येने खारफुटींचा संहार केला आहे. मळा येथे दरवर्षी येणाऱ्या पुराचे हेही एक प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले. इंगोले म्हणाले की, पाटो भागात छोटे-छोटे नाले होते ते कॉंक्रिटीकरणामुळे बुजविले गेले व या ठिकाणी मोठ्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. पाण्याला वाट मिळत नाही आणि त्यामुळे पूर येतो. इंगोले यांच्या मते या घरांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना व्हायला हव्यात. 

टॅग्स :goaगोवाIFFIइफ्फीfloodपूरManohar Parrikarमनोहर पर्रीकरRainपाऊस