शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

आधी गावचे प्रश्न सोडवा, नंतर खाणींच्या दाखल्यांचे बघू; मये ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2024 11:49 IST

शेती-बागायतींच्या नुकसानीचा प्रश्नच

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: मये, वायंगिणी पंचायत क्षेत्रातील कामगारांचा प्रश्न, प्रदूषण, रोजगार यांसह शेतकऱ्यांचे प्रश्न आधी मार्गी लावा, त्यानंतरच खाण व्यवसाय सुरू करण्याबाबत विचार करावा, अशी भूमिका मये, वायंगिणी पंचायतीच्या ग्रामसभेत करण्यात आली. यासंदर्भात गावचे प्रश्न सुटल्याशिवाय ग्रामपंचायतीने कोणताही नहरकत दाखला देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

पंचायतीच्या नूतन वास्तूत आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत सरपंच सीमा आरोंदेकर, वासुदेव गावकर, विशांत पेडणेकर, सुवर्णा चोडणकर, वर्षा गडेकर, विनिता पोळे, दिलीप शेट, कनिवी कवठणकर आदींसह पंच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सरपंच सीमा आरोंदेकर म्हणाल्या की, 'पंचायत क्षेत्रात खाण व्यवसाय सुरू करण्यास पंचायतीने कोणत्याही प्रकारचा नाहरकत दाखला दिलेला नाही. यासंदर्भात पाहणी करण्यात येणार आहे. आवश्यक बाबींवर निश्चितपणे विचारमंथन केले जाईल. ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येतील, असे त्यांनी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्त्या प्रश्नांना उत्तरे देताना आपली भूमिका स्पष्ट केली.

नीलेश कारबोटकर यांच्यासह इतरांनी खाणींचा, कामगारांचा तसेच शेती बागायतींच्या नुकसानीचे प्रश्न उपस्थित केलेल्या गावातून होणारी वाहतूक आणि प्रदूषण याबाबतही ग्रामस्थांनी आपल्या भूमिकेशी ठाम राहताना गावाच्या हिताचे सर्व प्रश्न आधी मार्गी लावावेत, त्यानंतरच खाणींसंदर्भात विचार करण्यात यावा, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा नाहरकत दाखला खाणींना देऊ नये, अशा प्रकारचा ठराव मांडला. यावेळी इतर विषयांवरही ग्रामस्थांनी आपली मते मांडली. सचिव महादेव नाईक यांनी मागील ग्रामसभेतील अहवाल सादर केला. सरपंच व पंचायत मंडळाने चर्चेत सहभाग घेतला.

 

टॅग्स :goaगोवा